Showing posts with label family. Show all posts
Showing posts with label family. Show all posts

Monday, March 31, 2025

डॉ. आनंदीबाई जोशी: भारताच्या पहिल्या महिला डॉक्टरांचा प्रेरणादायी प्रवास

डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी या केवळ भारतातील पहिल्या महिला डॉक्टर नव्हत्या, तर त्या शिक्षण, धैर्य आणि समाजसुधारणेच्या दिशेने घडलेल्या महत्त्वाच्या प्रवासाचे प्रतीक होत्या. 31 मार्च 1865 रोजी पुण्यात जन्मलेल्या आनंदीबाईंच्या जीवनप्रवासाने अनेक महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले. त्या यमुना या नावाने जन्मल्या, मात्र विवाहानंतर त्यांचे नाव आनंदीबाई झाले. केवळ स्वतःसाठी नव्हे, तर संपूर्ण भारतीय स्त्री समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी मार्ग निर्माण केला.

त्यांच्या जीवनाची सुरुवात एका पारंपरिक कुटुंबात झाली, जिथे स्त्रियांनी शिक्षण घेणे दुर्मिळ होते. नऊव्या वर्षीच त्यांचा विवाह गोपाळराव जोशी यांच्याशी झाला, जे स्वतः एक प्रगतिशील विचारांचे होते. त्यांनी आनंदीबाईंना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. चौदाव्या वर्षी मातृत्वसुख लाभले, मात्र मुलाच्या आजारपणात योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. हा धक्का त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. त्यांनी ठरवले की अशा परिस्थितीत अन्य कोणत्याही आईला जावे लागू नये, आणि त्यामुळेच त्यांनी डॉक्टर होण्याचा निर्धार केला. त्या काळात स्त्रियांनी शिक्षण घेणेच कठीण होते, आणि डॉक्टर होणे तर कल्पनेपलीकडचे होते. मात्र, गोपाळरावांनी आनंदीबाईंना शिकण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला. त्यांनी अमेरिकेतील पेनसिल्व्हानिया विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्याकाळच्या मानसिकतेनुसार एका हिंदू स्त्रीने परदेशात जाऊन शिकणे हे समाजाला अजिबात मान्य नव्हते. लोकांनी टीका केली, विरोध केला, पण आनंदीबाईंनी निश्चय सोडला नाही. समाजाच्या विरोधाला न जुमानता त्या बोटीने एकट्याच अमेरिकेला रवाना झाल्या आणि सात समुद्र पार करत आपले शिक्षण पूर्ण केले. त्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर झाल्या आणि त्यांनी देशातील महिलांसाठी शिक्षण व आरोग्याच्या नव्या संधी निर्माण केल्या.

शिक्षणाच्या प्रवासात त्यांना अनेक अडथळे आले. अमेरिकेतील हवामानामुळे त्यांचे आरोग्य खालावत गेले. त्यांना क्षय झाला, पण तरीही त्या थांबल्या नाहीत. शिक्षण पूर्ण करून त्या भारतात परतल्या आणि आपल्या देशातील स्त्रियांसाठी वैद्यकीय सेवा देण्याचे स्वप्न पाहू लागल्या. दुर्दैवाने, त्यांच्या शरीराने साथ दिली नाही आणि अवघ्या 22व्या वर्षीच त्यांचे निधन झाले. मात्र, त्यांनी उभारलेला मार्ग पुढील पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरला. त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की, स्वप्नं पाहणं सोपं असतं, पण ती पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यांनी सामाजिक बंधनांना झुगारले, शिक्षणासाठी कठीण परिस्थितीतही प्रयत्न सुरू ठेवले आणि अपयश आलं तरी मागे हटल्या नाहीत. त्यांची कथा हे दर्शवते की शिक्षण हीच खरी शक्ती आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्याला आपले ध्येय गाठण्यासाठी झगडावे लागते.

आज, त्यांच्या जयंती निमित्त आपण त्यांच्या कार्याची आठवण ठेवून त्यांच्या धैर्याचा, मेहनतीचा आणि चिकाटीचा आदर्श घ्यायला हवा. त्यांनी निर्माण केलेला मार्ग आपण पुढे चालत राहिलो, तर भारतात आणखी असंख्य आनंदीबाई घडतील. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!


-मृण्मयी पाटस्कर


Friday, March 21, 2025

Verses of Eternity: Cherishing the Soul of Poetry


“That you are here, that life exists and identity; That the powerful play goes on, and you may contribute a verse”   -Walt Whitman 

Whitman expresses in the aforementioned lines his appreciation of mere existence and the idiosyncrasy of an individual. With a heart set to inspire future generations, he urges each individual to have complete freedom in selecting their "verse" and carve their name upon the echoes of eternity. March 21st is celebrated as World Poetry Day to honor the diversity in poetry from multiple angles, be it in preserving linguistic diversity and cultural heritage or how it acts as an artist’s voice in dynamic social changes, like Sylvia Plath who used poetry as a medium to challenge patriarchy and oppression. In order to harmonize the spirit’s rhythm, UNESCO declared World Poetry Day in 1999. Through dawns and dusks, the world has beheld those who spun words into eternity’s tapestry. Specifically William Shakespeare, Rumi, Robert Frost, Emily Dickinson, Sylvia Plath, Pablo Neruda, Homer, Rabindranath Tagore and countless voices that are immortal in the ink of history. 

“Where the mind is led forward by thee 

 Into ever-widening thought and action 

 Into that heaven of freedom, my Father, let my country awake” 

-Rabindranath Tagore 

The cited text is the closing lines of Tagore’s poem “Where the Mind is Without Fear”. The poet sketches echoes of a society where the young minds are progressive, with a flame that hungers for the oil of understanding. He prays to God to cultivate a nation where the seeds of freedom grow with the zeal of a rising sun. Now allow me to ask you this, when was the last time you read a poem? Not for school, not for a quick Instagram post, but to truly feel its essence, its depth, its soul? Let me guess, probably in the distant yesterdays. Poetry, an art that was once the lifeline of human expression, is being reduced to mere captions and hashtags in an era of short attention spans and viral content. Have we lost sight of its depth? Poetry serves as a gentle reminder to slow down, feel, and connect in a world that often walks over feelings, because every poem is like a lantern in the dark, guiding us back to ourselves. On this World Poetry Day let's celebrate the ability of words to inspire, heal, and remind us that poetry can speak even when all else is silent. 

 "We don’t read and write poetry because it’s cute. We read and write poetry because we are members of the human race. And the human race is filled with passion." -Prof. John Keating from The Dead Poets Society


-Arushi Yadav

Wednesday, March 19, 2025

रंगभान

मला मोहित करतात रंग, त्यांच्या छटा, त्यांचं दिसणं, त्यांचं असणं, सारंकाही. जगातले आणि आयुष्यातले रंग सारखेच असं वाटलं तेव्हा कळलं की एकेका आयुष्यानेच जग रंगीत होत राहातं, कधी प्रेमाने लाल, दुःखाने काळं किंवा स्थैऱ्याने पांढरंही. कोणताच रंग नसलेला 'ना'रंगी रंग जसा पाण्याला असतो तसा तुम्हां-आम्हालाही तो निसर्गदत्त असतो. जिथे जन्मावं, ज्या स्थितीत राहावं, वाढावं तिथला रंग पांघरत राहतो आपण. तो रंग नक्की ल्यावा मात्र ल्यावा तो विवेकाच्या गाळण्यातून गाळून. असा विचार केला तर किती सहज वितळून जातो पदराखाली जपलेला खोटा अभिमान, माणसातली आणि खरंतर मनातली दरी लीलया भरून काढतात हे रंग... मात्र पूर्वसुरींच्या अनुभवातून एक गोष्ट नक्की कळते की ह्या रंगांचं प्रयोजन फार व्यापक आहे, बघावा तसा पर्वत दिसावा तसेच हे रंगदेखील आहेत. सृष्टीच्या व्यापकतेचं वैभव हे रंगच तर दाखवतात. समुद्र आणि वाळवंटाचा रंग एक नाही म्हणूनच दोघांना त्यांचं-त्यांचं महत्त्व आहे, माहात्म्य आहे. ह्या रंगांकडे जेव्हा भौतिकदृष्ट्या बघतो तेव्हा खरंच अवाक् होऊन जातो. शरीरातल्या विशिष्ट पेशी दृष्याच्या रंगभानासाठी कारणीभूत ठरतात असं शास्त्र सांगतं. माणसा-माणसात त्यातले पुसटसे भेद आणि त्याचे आजारही सांगतं, ते खरं देखील आहे पण यावरून काही अंशांनी तरी माणसांची दृष्टी वेगळी असते हेच स्पष्ट होतं. हे कळल्यावर दृष्टी वेगळी असल्याने माणसांचा दृष्टिकोन वेगळा असणारच हे मनाला इतकं पटतं की मतभेदाची कित्येक कारणं समूळ मावळून जातात.

कोट्यावधी लोकांचं जीवन युगांपासून व्यापून राहिलेले धर्म म्हणे एका रंगाने दर्शविता येतात, हे रंगांचं केवढी माहात्म्य म्हणावं ! इथे आठवतो तो शाळेतला प्रयोग, प्रिझम मधून गेलेले सगळे रंग शेवटी पांढर्या रंगामधे परिणत होतात, तेचा वाटतं की शेवटी शुद्ध श्रद्धेच्या चौकटीतून गेलेले सगळेच रंग एकाच चैतन्यात मिसळणार आहेत. तेव्हा माझ्या रंगाचा मला अभिमान असला तरी दुसऱ्याच्या द्वेषाचं कारणच उरत नाही. म्हणून महत्व द्यायचं ते प्रत्येकाच्या स्वतंत्र असण्याला, दिसणं हे काळाच्या ओघात बदलत राहणारच असतं. शेवटी सगळे सारखाच श्वास घेतात, कुणाचा श्वास भगवा नसतो किंवा हिरवाही... जसा शब्दांसाठी अर्थ तसा रंगांसाठी भाव असतो. जे शब्दांतून सांगता येत नाही, अभिनयातून दाखवता येत नाही ते रंग दर्शवतात. कलाकाराच्या भावावस्थेपर्यंत नेणारी शिडी म्हणजे रंग. भान हरपून टाकणारे तसं भानावर आणणारेही रंगच. प्रत्येकाला आपलं आयुष्य बसवता येतं एखाद्या रंगामध्ये किंवा दोन-चार रंग मिसळून साकारलेल्या एखाद्या रंगामध्ये, मात्र त्याला धाडस हवं हे नक्की. नाही म्हटलं तरी आजच्या काळात प्रत्येकाच्या विचारांना एखादा रंग लागलेलाच असतो. अशा रंगांच्या छटा फार बोलक्या असतात. माणसाला अगदी सुरुवातीला चित्र काढता येत होतं पण तो तिथे थांबला नाही, पाना-फुलांच्या रसाने तो त्यामधे रंग भरू लागला, स्वतःचे क्षितिज स्वतः विस्तारू लागला. आजची परिस्थिती तशी फार वेगळी, पण हृदयाची तहान अगदी तिच. आयुष्यात रंग भरण्याची, आयुष्य रंगीत करण्याची. प्रत्येकाच्या मनातल्या रंगांना कर्माची जोड मिळतेच असं नाही, पण रंगांची ओढ मात्र कायम राहते, जशी मनात तशी इतिहासाच्या पानांवरही. कधी हातात नसलेले अनपेक्षित रंग उधळले जातात आणि नव्हत्याचं होतंदेखील होतं.

रस्त्याच्या कडेला फुलं विकून पोट भरण्याची ईच्छा उरात बाळगणाऱ्या मुलाच्या निरागस डोळ्यांत मला हेच रंग दिसतात किंवा त्याच्यासमोरून गाडीच्या खिडकीतून हात दाखवत जाणाऱ्या एखाद्या सोनूच्या डोळ्यातही अगदी तेचं रंग असतात. ए.सी.मधे बसलेल्या आणि रस्त्यावर झोपलेल्या माणसांच्या स्वप्नातही हेच रंग जाणवतात, खरंच माणसाचं अंतरंग इतकं रंगीत असतं का ? 


 -अनीश जोशी

Saturday, March 8, 2025

जागतिक महिला दिन!


हा केवळ उत्सव नाही, तर इतिहासाच्या पानांवर ठसठशीत उमटलेली एक खूण आहे—स्त्रियांनी मिळवलेल्या यशाची, स्वातंत्र्याची, आत्मसन्मानाची आणि अजूनही चालू असलेल्या संघर्षाची! या उत्सवाची सुरुवात रंजक आणि महत्त्वपूर्ण आहे. ८ मार्च ही तारीख निवडण्यामागे खास कारण आहे. १९०८ मध्ये १५०० महिलांनी न्यूयॉर्कमध्ये रस्त्यावर उतरून मोर्चा काढला होता. रशियातील महिलांनी ‘महिला दिवस’ साजरा करत पहिल्या विश्वयुद्धाचा विरोध केला होता. तर युरोपमध्येही महिलांनी ८ मार्च रोजी शांतीच्या समर्थनार्थ रॅली काढली होती.

महिलांनी आपल्या हक्कांसाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. २८ फेब्रुवारी १९०९ रोजी न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला, परंतु १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. भारतात, मुंबई येथे पहिला महिला दिन ८ मार्च १९४३ रोजी साजरा झाला. २०२५ सालच्या जागतिक महिला दिनाची संकल्पना आहे – ‘सर्व महिलांसाठी आणि मुलींसाठी : हक्क, समानता, सक्षमीकरण.’

परंतु ही केवळ घोषणा नसून स्त्रीत्वाने संपूर्ण जगाला घातलेली साद आहे—एक परिवर्तनाची मागणी. स्त्री शक्तीच्या सन्मानासोबत त्या शक्तीच्या न्यायाची हाक. इतिहासाच्या कपाटात अनेक कथा दडल्या आहेत. काही स्त्रियांनी क्रांती घडवली, काहींनी विद्रोह केला, तर काहींनी सहनशीलतेच्या कडेलोटावरही आत्मसन्मान जपला. ऋग्वेदातील गार्गी, मैत्रेयी, राणी लक्ष्मीबाई, रोजा पार्क्स, मदर तेरेसा, कल्पना चावला, सिंधुताई सपकाळ, मारिया क्युरी—अशा अनेक स्त्रिया जागतिक, राष्ट्रीय, शहरी, ग्रामीण स्तरावर आदर्श ठरल्या.

पण ८ मार्च हा दिवस फक्त या महान स्त्रियांना स्मरण्याचा आहे का? की नवीन उदाहरण घडवण्याची प्रेरणा घेण्याचा?

मला वाटते—दोन्हीही नाही.

या ओळखींच्या पलीकडे असलेल्या प्रत्येक स्त्रीला तिचे स्त्रीत्व मुक्तपणे जगता यावे, हाच या दिवसाचा खरा अर्थ. नेहमीप्रमाणे यावर्षीही ८ मार्च हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जाईल, पण या आनंदाच्या पलिकडेही एक कटू वास्तव आहे. आजही अनेक स्त्रिया अन्याय सहन करत आहेत, आत्मसन्मानाच्या आणि स्वातंत्र्याच्या एका खोल दीर्घ श्वासाची याचना करत आहेत. हे चित्र बदलायला किती काळ लागेल, हे काळच ठरवेल.

परंतु मला ठाऊक आहे की, काही पुरुषी क्रौर्याच्या पलीकडेही एक पुरुषी करुणेचा उजेड आहे. त्या पुरुषी ममत्त्वासाठी माझा हा लेख. स्त्रीत्वाच्या जाणिवेच्या शब्दांत अरुणा ढेरे म्हणतात—

"की हिला मातीचं बळ मिळो,

लहरी वादळाचं पिसाटपण

समजून रानावनात तगण्यासाठी...

की हिला पाखरांच्या संवादाचं सुख कळो...

वाढण्याच्या कळा सोसत पानांत येण्यासाठी...

ही होईल जर स्वतःच्या ओळखीइतकी खोल,

तर टिकवील आपोआपच स्वप्नांच्या शिरेशिरेतली ओल....”

एकीकडे मातीचं बळ आणि वादळाचं पिसाटपण अंगी रुजवणाऱ्या स्त्रीला, पाखरांच्या संवादाचं सुख कळण्याइतकी शांतीही मिळो. तिच्या स्वप्नाइतकीच तिला तिची खरी ओळखही कळो.

उत्सव होवो तिच्या आत्मसन्मानाचा, तिच्या कसोटीचाही—

ती स्त्री आहे म्हणून भोगाव्या लागणाऱ्या वेदनेचाही,

आणि ती स्त्री आहे म्हणूनच अनुभवता येणाऱ्या सर्जनत्वाचाही.


-प्रतीक्षा ओंबळे

Friday, February 14, 2025

स्नेहेन सर्वे वशाः।

मध्यायुगीनकाले मुघलः तथा हिन्दुराष्ट्राणाम्मध्ये  किञ्चिदपि स्नेहसम्बन्धाः नासन् । आक्रमणं युद्धं च एतासां सर्वासां परिस्थितौ  सामान्यजनानां जीवनम् अत्यधिकं कठिनं जातम्। कर्णावती सङ्ग्रामस्य मृत्योः पश्चात् राज्यपदे नियुक्ता। स्वराज्यं सङ्कटे दृष्ट्वा सहाय्यस्य अपेक्षया सा हुमायवे रक्षासूत्रं प्रेषितवती। अतः अन्ते रक्षासूत्रस्य कारणात् हुमायुः तस्यै सहाय्यं कृतवान्। द्वाभ्यां मुघलसम्राटाभ्यां सह युद्धं जातम्। तत्कारणात् हिन्दु -  मुघलसम्बन्धः दृढः जातः। अतः 'स्नेहेन सर्वे वशाः' एतदेव सत्यम्। ' स्नेह ' शब्दः नाम न केवलं प्रेम , आकर्षणम् अपि तु आत्मीयता, संवेदनशीलता तथा च बन्धुभावः। अग्रे ' सर्वे वशाः ' अत्र सूचितस्य सम्बन्धस्य अर्थः न केवलम् आकर्षणम् अपि तु उन्मुखता, वात्सल्यम्, आत्मीयतायाः सम्बन्धाः। सिन्धूताई- सपकाल-महोदया एव तस्य  समर्पकम् उदाहरणम् । रक्षणार्थं नैके बालकाः आक्रन्दन्ति, ते शिक्षणात् वञ्चिताः आसन्। एतेषां कृते सा मातृसमम् उत्तरदायित्वं निर्वहति। तान् आकाशे विहारार्थं प्रेरिता । तेषां बालकानां वशीकरणम् अपि सा स्नेहेन कृतवती। 

यस्याः कारणेन समाजस्य निम्नघटकाः आकाशे उड्डयनं कर्तुं शक्नुवन्ति तथा च साने गुरुजी नाम्ना ख्यातः महोदयः उक्तवान्,  स:एक एव सत्यधर्मः, विश्वाय स्नेहाभावः अर्पणीयः। तत्समानं व्यक्तिमत्वम् अस्ति आमटे - प्रकाशमहोदयस्य । समाजात् बहिष्कृतानाम् आदिवासिबान्धवानां कृते सः दीपस्तम्भः अभवत्। आदिवासिबान्धवानां कृते तस्य कार्यं अतुलनीयम्। तेषां कृते सः करनिर्मुक्तं शिक्षणम्, आरोग्यसुविधाः , व्यापारज्ञानम्, कृषिकार्यं, व्यवहारज्ञानं च स्नेहेन एव आरभत्। आदिवासी प्रभागतः आगता द्रौपदी मुर्मू यदा राष्ट्रपतिपदे नियुक्ता भवति, तदा आमटे -महोदयस्य कार्यपूर्तिः अभवत्, इति अहं मन्ये। तत् कारणात् भारतीयाः तथा आदिवासिबान्धवाः च वशाः।

यदा वयं ' सर्वे ' इति वदामः, तदा तस्य अर्थः मनुष्याः इति एव नास्ति, अपि तु पशवः, प्रकृतिः अपि अस्ति। एतान् सर्वान् अपि स्नेहेन वशीकर्तुं शक्यते। पशवः स्पन्दनं, स्पर्शं च अनुभवितुं समर्थाः। स्नेहपूर्णवर्तनस्य कारणात् ते अपि एकानिष्ठाः अभवन्। तेषां भूतदयां दर्शयित्वा ,  पालनपोषणेन आमटे महोदयः तान् आप्तान् कृतवान्। न केवलं आमटे महोदयः अपि तु महाडतः मेस्त्री  प्रेमसागर- महोदयः। तेषां गरुडसंवर्धनस्य कार्येण न केवलं गरुडान् अपि तु पयर्यावरणस्नेहिनः सः वशं कृतवान् ।

कम् अपि भारतीयं पश्यतु। सः ' वसुधैव कुटुम्बकम् ' इति धारणां मन्यते।  अतो भारतः रशियातः तैलं स्वीकरोति। चीनदेशः, यः रशियादेशस्य शत्रुपक्षः। तेन सह सामञ्जस्य विधेयकं करोति सःभारतः । रशिया - यूक्रेन युद्धे मध्यस्थः भवति। एतद् कारणात् भारतेन सम्पूर्णविश्वं वशीकृत्य सः शान्तिदूतस्य भूमिकां निर्वहति। अतः अहं मन्ये, स्नेहेन सर्वे वशाः। परन्तु  अहं विषयस्य द्वितीयं पक्षम् अपि वक्तुम् इच्छामि। यदि 'स्नेहेन सर्वे वशाः ' इति शक्यं तर्हि कुरुक्षेत्रे युद्धं न जातम् स्यात्। रावणवधस्य कर्तव्यम् एव पुरा न भूतं , कस्या अपि स्त्रीणां शोषणं न जातं स्यात्। न्यायालयं गत्वा  न्यायभिक्षायाः आवश्यकता न समुद्भूता। कौटिल्यः अपि उक्तवान् 'शत्रोः मित्रम्, शत्रुः एव ज्ञातव्यम्, तस्य नाशः करणीयः' । अतः एव अपि सत्यं स्नेहेन सर्वे वशाः?

          यथा संस्कृतसुभाषिते उक्तम् , 

बन्धनानि किल सन्ति बहूनि प्रेमरज्जुमयबन्धनमाहुः । दारुभेदनिपुणोऽपि षडङ्घ्रिः निष्क्रियो भवति पङ्कजकोशे ।।

एतस्य सुभाषितस्याधारेण चिन्त्यते, तर्हि  'स्नेहेन सर्वे वाशाः ' एतद् सत्यमेव।


-तन्वी चितळे

Sunday, February 9, 2025

करुणापुरुष बाबा आमटे


हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती!

गुरू ठाकूर यांच्या या उक्तीप्रमाणे, ज्यांनी आपले तन, मन, धन आणि संपूर्ण जीवन निराधारांसाठी, उपेक्षितांसाठी अर्पण केले, ते थोर मानवतावादी व परिवर्तनवादी समाजसेवक, ऋषितुल्य बाबा आमटे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वावर दृष्टिक्षेप टाकण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे हा लेख. खांडववनाचे रूपांतर नंदनवनात करणारे उतुंग व्यक्तिमत्त्व म्हणजेच मुरलीधर देवीदास आमटे उर्फ बाबा आमटे! त्यांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील एका समृद्ध घरात झाला. दारात सर्व सुखे हात जोडून उभी असतानाही, त्यांना अगदी लहानपणापासून गरीब आणि उपेक्षितांच्या परिस्थितीची जाणीव होती.

१९३४ मध्ये त्यांनी बी.ए. पदवी मिळवल्यानंतर, १९३६ मध्ये ते एल.एल.बी. झाले. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी समाजकार्यास सुरुवात केली. एका पावसाळी रात्री घरी परतत असताना, त्यांना कुष्ठरोगाच्या शेवटच्या टप्प्यात असलेला एक रुग्ण दिसतो आणि हा ध्येयवेडा तरुण कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आयुष्य वेचण्याचा निर्धार करतो. आपल्या पत्नीला आपल्या ध्येयाविषयी कल्पना देतो आणि कुष्ठरोगासंदर्भात विविध पुस्तके वाचतो, सखोल अभ्यास करतो, कुष्ठरोग्यांच्या रुग्णालयात विनोबा भावे यांच्या साहाय्याने प्रवेश मिळवतो आणि त्यांच्यावर उपचार करतो. काही दिवसांनी त्यांना असे लक्षात येते की, आपण कुष्ठरोग्यांच्या उपचारासाठी स्वतः वैद्यकीय प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. त्यानंतर कलकत्ता स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन येथील अभ्यास वर्गात पंडित नेहरूंच्या शिफारशीवर प्रवेश घेतात आणि कुष्ठरोगी रुग्णांवर उपचार करण्याचे वैद्यकीय प्रशिक्षण पूर्ण करतात.

कुष्ठरोगासंबंधित लसीची स्वतःच्या शरीरावर चाचणी करून घेतात. केवळ असामान्य माणूसच असे धाडस करू शकतो. आज विज्ञानाने एवढी प्रगती केली असून समाजात अजूनही कुष्ठरोगाबाबत गैरसमज आहेत, परंतू बाबा आमटे यांची ही जिद्द आणि सेवा आजही मार्गदर्शक ठरते. पुढे जाऊन त्यांनी १९५० मध्ये वरोडा आणि भोवतालच्या ६० गावांमध्ये ४,००० रुग्णांवर उपचार केले. केवळ उपचार करणे हे पुरेसे नाही, ही जाणीव त्यांना झाली आणि त्यातूनच आनंदवन उभारण्याची प्रेरणा मिळाली. राज्य सरकारकडून वरोडा जवळील भागात ५० एकर पडीक जमीन त्यांना मिळाली. अतिशय अडचणीची, किचकट जागा. पाण्याचा अभाव. अशातच दोन मुले, पत्नी साधनाताई, एक लंगडी गाय, एक कुत्रा, १४ रुपये रोख आणि ५० एकर नापिक जमीन असा त्यांचा संसार सुरू झाला.

ते दिवस अतिशय भयानक होते. जंगलातील पशूंचा त्रास, अन्नधान्याचा तुटवडा या सर्व संकटांवर मात करत बाबा आमटे आणि त्यांच्या पत्नी साधनाताई आमटे यांनी सहा कुष्ठरोग्यांना सोबत घेऊन एक विहीर खोदली आणि १९५१ मध्ये विनोबा भावे यांच्या शुभहस्ते आनंदवनाचे औपचारिक उद्घाटन झाले. विविध आव्हाने पेलत बाबांनी कालांतराने कुष्ठरोग्यांच्या मदतीने सहा विहिरी खोदल्या, जमीन साफ केली, पिकांची लागवड केली आणि आनंदवनाचे रूपच पालटले. आनंदवन हे नुसते उपचार केंद्रच नव्हते, तर ते आत्मनिर्भर व मानवतावादी माणूस घडवण्याचे पवित्र तीर्थक्षेत्र होते. माझ्या मते ते केवळ एक संस्थान नसून बाबांनी तयार केलेले आत्मनिर्भरतेचे एक मॉडेल आहे, जे भारतातील अन्य ठिकाणीही वापरले जाऊ शकते! आनंदवनासोबतच, कुष्ठरोग निर्मूलन अभियान, नर्मदा बचाव आंदोलन, पर्यावरण, आदिवासी हक्क इत्यादी असंख्य सामाजिक चळवळींमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या कामात पत्नी साधनाताई यांची अनमोल साथ त्यांना मिळाली. कुष्ठरोग्यांच्या सेवेसोबतच, त्यांच्या पुनर्वसन आणि स्वयंपूर्णतेकडेही त्यांनी विशेष लक्ष दिले.

सामाजिक कार्यासोबतच, त्यांनी त्यांच्या अनुभवांवर आधारित कसदार, प्रेरणादायी व वास्तववादी साहित्यनिर्मिती केली. 'ज्वाला आणि फुले' हा त्यांचा काव्यसंग्रह याचे उत्तम उदाहरण. बाबा आमटे यांनी आपल्या पुढच्या पिढीला नि:स्वार्थ समाजकार्याचा वारसा दिला. डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे यांनी आदिवासींसाठी लोकबिरादरी प्रकल्प, वन्यजीव संरक्षण आणि आरोग्य सेवा यामध्ये मोलाचे योगदान दिले. तर डॉ. विकास व भारती आमटे यांनी आनंदवनाचा विस्तार करण्यात भरीव कामगिरी केली. बाबांना रॅमन मॅगसेसे, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण यांसारखे विविध प्रतिष्ठित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

तसं पाहिलं, तर क्षणभरच असतं माणसाचं आयुष्य. त्यातही बहुतेक जण स्वतःपुरतेच जगत असतात; पण बाबा आमटे यांसारखी काही थोर माणसं एका आयुष्यातच हजारो जिवांना एक नवीन जीवन देऊन जातात. खरंच, आधार नसलेल्यांचे आभाळ बनण्यासाठी मन आकाशाएवढे विशाल असावे लागते. ९ फेब्रुवारी २००८ रोजी या महात्म्याने जगाचा निरोप घेतला. माझ्या मते, बाबा आमटे यांचा संपूर्ण जीवनप्रवास दररोज हजारो लोकांना लाखोवेळा प्रेरणा देतो. आयुष्यात सर्वोत्तम आनंद म्हणजे स्वतःच्या हितासाठी नाही, तर इतरांच्या भल्यासाठी कृत्यं करणे आणि समाजाच्या कल्याणासाठी योगदान देणे हे बाबांचं जीवन खूप प्रभावीपणे शिकवून जातं! 


"कोंडलेल्या वादळांच्या

ह्या पहा अनिवार लाटा

माणसांसाठी उद्याच्या

येथूनी निघतील वाटा...!"


विनम्र अभिवादन.


-आर्य सोनवणे

Friday, January 3, 2025

ज्ञानगंगा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

भारतातील स्त्रिया आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी पार पाडत आल्या आहेत. रसायनशास्त्राच्या औषधीविषयक, विश्लेषणात्मक व सेंद्रीय अशा तिन्ही शाखांमध्ये मोठे योगदान देणाऱ्या असीमा चॅटर्जी असोत किंवा लढाऊ विमान एकट्याने चालवणाऱ्या अवनी चतुर्वेदी असोत, आता असे एकही क्षेत्र उरलेले नाही जिथे महिलांनी आपल्या कामगिरीची छाप पाडलेली नाही. महिलांना यशस्वी होण्यासाठी आणि पंख पसरून उडण्यासाठी आभाळ खुले करून देणारी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे माता सावित्रीबाई फुले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि भारतातील स्त्रियांच्या आयुष्यात शिक्षणाची ज्योत पेटवली.

माणूस हा जगातील एकमेव विचार करणारा प्राणी आहे. परंतु माणसाच्या बुद्धीला ज्ञानाची सांगड नसेल तर तो माणूस म्हणून ओळखला जाऊ शकतो का? असा प्रश्न सावित्रीबाई फुले आपल्या "त्यास मानव म्हणावे का?" या कवितेतून विचारतात. त्या म्हणतात:

ज्ञान नाही, विद्या नाही  

ते घेण्याची गोडी नाही  

बुद्धी असूनही चालत नाही  

त्यास मानव म्हणावे का?

या ओळींतून स्पष्ट होते की माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी जर काही उपयोगी असेल, तर तो विद्या-धर्म आहे. विद्या देणारा आणि विद्या घेणारा यांच्या एकत्रिकरणातूनच एक चांगला माणूस घडतो. विद्या देणारा हा धैर्यशील असतो, तर विद्या घेणारा शक्तिशाली व शहाणा बनतो. हा विचार समाजाला पटवून देणाऱ्या माता सावित्रीबाई फुले यांचा जन्म शिक्षणाच्या अभावाच्या काळात ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. शिक्षणाच्या प्रकाशाचा अभाव असलेल्या त्या काळात सावित्रीबाईंनी भारतात स्त्री शिक्षणाचा पाया रचला. आपण बऱ्याचदा म्हणतो, "आम्ही सावित्रीच्या लेकी, सावित्रीची मुलं," परंतु खरोखरच आपण सावित्रीबाईंच्या विचारांवर चालतो का? आजच्या युवा पिढीतील प्रयत्नांची आणि संयमाची कमतरता पाहता असे वाटते की संघर्षाच्या भीतीने जर सावित्रीबाईंनी त्यांचे ध्येय अर्धवट सोडले असते, तर आज आपल्या घरात शिक्षणाची गंगा वाहिलीच नसती. त्या काळात मुलींचा जन्म नकोसा वाटत असताना सावित्रीबाईंनी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन स्त्रियांना सक्षम आणि स्वावलंबी बनवले. पण आजही काही लोक शिक्षणाप्रती असलेल्या बेजबाबदारपणामुळे आणि समाजातील समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे वाटते की सावित्रीबाईंच्या कष्टांची आणि त्यागाची आपल्याला खरोखर जाणीव आहे का?

तरीही, सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या कमलादेवी चट्टोपाध्याय, मेधा पाटकर, चित्रा नाईक, शाहीन मिस्त्री यांसारख्या अनेक प्रेरणादायी व्यक्तींनी समाजातील दुष्ट रूढी-परंपरांना नाकारले आणि ज्ञानाचा मार्ग दाखवला. त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतातील अनेकांना स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळाली. त्यामुळेच द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदावर पोहोचल्या आणि गीता गोपीनाथ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक झाल्या, तसेच मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणूनही कार्यरत राहिल्या. सावित्रीबाईंच्या विचारांनीच आज मी माझे विचार लेखणीद्वारे मुक्तपणे मांडू शकते. त्यामुळे असं वाटतं:

सावित्रीचा घेऊनी वसा, गाठतो आम्ही उंच शिखरे  

दुष्ट परंपरेचा पिंजरा तोडूनी, मुक्त झाली पाखरे


ज्ञानगंगा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला वंदन आणि शतकोटी प्रणाम!


- श्रुती शिंदे

Tuesday, November 19, 2024

मतदानाचा हक्क, तुमची ताकद!


लोकशाहीचा खरा अर्थ म्हणजे लोकांनी लोकांसाठी निवडलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून चालणारे सरकार. आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला संविधानाने मतदानाचा हक्क दिला आहे. हा हक्क फक्त एक अधिकार नाही, तर एक जबाबदारी आहे, जी आपल्या देशाच्या भवितव्याला आकार देते. सरकारी निर्णयांवर व्यक्ती प्रभाव टाकू शकतील, अशा सर्वांत महत्त्वाच्या मार्गांपैकी एक म्हणजे मतदान. मतदान म्हणजे कार्यालयासाठी किंवा एखाद्या समस्येच्या प्रस्तावित निराकरणासाठी उमेदवाराची पसंती व्यक्त करण्याचा औपचारिक मार्ग. मतदान प्रामुख्याने राष्ट्रीय किंवा प्रादेशिक निवडणुकीसाठी होते; मात्र स्थानिक व लहान सामुदायिक निवडणुकाही सरकारमधील वैयक्तिक सहभागासाठी तितक्याच महत्त्वाच्या ठरतात. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू झाले. संविधानातील सर्वात महत्त्वाचे तत्त्व म्हणजे सार्वत्रिक मताधिकार. या अधिकारामुळे साधा सामान्य माणूस असो वा श्रीमंत, उच्चशिक्षित असो किंवा अशिक्षित, प्रत्येकाला मत देण्याचा समान अधिकार प्राप्त झाला. याच अधिकारामुळे आपल्या देशातील लोकशाहीचे मूळ मजबूत झाले. पंतप्रधानांपासून सरपंचांपर्यंतच्या निवडीचा अधिकार प्रत्येक नागरिकाला मिळाला. यामुळेच न्याय व हक्कांची जाणीव होऊ लागली आणि स्वातंत्र्याची खरी अनुभूती मिळाली.

आज भारताची लोकशाही जगातील सर्वोत्तम लोकशाही मानली जाते, याचे मुख्य कारण म्हणजे तिची प्रभावी निवडणूक प्रक्रिया. दर पाच वर्षांनी निवडणूक होत असल्याने प्रत्येक नागरिकाला आपल्या मतांच्या ताकदीची जाणीव होते. संविधानाने दिलेले समानता, न्याय, बंधुता, स्वातंत्र्य यांसारखे मूलभूत अधिकार अबाधित ठेवण्याचे सामर्थ्य आपण आपल्या मतदानाने सिद्ध करू शकतो. निवडणूक प्रक्रियेतून निवडून येणारा कोणीही असो, सत्ता कोणाचीही असो, संविधानाचे मुख्य तत्त्व कोणीही बदलू शकत नाही. म्हणूनच, आपल्या देशाच्या लोकशाहीवर अभिमान ठेवून, संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावणे ही आपली जबाबदारी आहे. आपल्या मतांत देशाला प्रगतीकडे नेण्याचे सामर्थ्य आहे. म्हणूनच म्हणतात, "मतदानाचा हक्क, तुमची ताकद!" मतदान हा अधिकार केवळ वैयक्तिक स्वातंत्र्यावर आधारित नसून, तो देशाच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा अधिकार जबाबदारीने वापरून देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे. "मतदानाचा हक्क, तुमची ताकद!" हे केवळ घोषवाक्य नाही, तर आपल्या जबाबदारीची जाणीव करून देणारी सत्यता आहे.

आपल्या एका मताने देशाच्या भवितव्याला आकार देता येतो. लोकशाहीची खरी ताकद तिच्या नागरिकांच्या सक्रिय सहभागात आहे. म्हणून आपण सर्वांनी आपापल्या कर्तव्याची जाणीव ठेवून मतदान करायला हवे. मतदान करणे म्हणजे केवळ आपला हक्क बजावणे नाही, तर देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा वाटा उचलणे आहे.

"आजचा मतदार, उद्याचा देश घडवणारा!"

जय हिंद! जय भारत!


-जिजाऊ शेळके

Friday, October 11, 2024

Honoring a Life Well-Lived: A Tribute to Ratan Tata

Ratan Naval Tata has been synonymous with innovation, philanthropy, and ethical business practices. When he left the globe, he left a mark. His legacy extends far beyond the corporate arena and touches the lives of crores of people through his commitment to social causes and visionary leadership. It is, however, the philanthropic legacy of Tata rather than purely his business acumen, which will serve as a more etched testament to his name. And indeed, in this respect, he was a very true philanthropist who keenly took interest in improving mankind. His philanthropic works could be varied—from health care and education to poverty and environmental sustainability. He made great contributions to the development of India and many other nations through the Tata Trusts, which he spearheaded.

The importance of his philanthropic works is immeasurable, be it to helping street vendors who were affected in the 26/11 attacks when they were working near the Taj hotel, owned by the Tata group, or be it the donation to IISc Bangalore for research on Alzheimer's disease. He not only donated 500 crore . rupees for the Covid relief fund but also opened the doors of the group's luxurious hotels for quarantine purposes to the government of Maharashtra for free of charge. At age  86, he opened a state-of-the-art hospital for small animals. He cared not only about humans but about the living beings, which could not express their problems either. A touching anecdote comes from Mr. Suhel Seth when he narrates that one quality about Tata is absolute compassion. In February 2018, he received an invitation to pick up a high-profile award at Buckingham Palace. He cancelled it in the eleventh hour when one of his beloved dogs fell ill. When King Charles was briefed about this, he said, “That’s a man. That’s the man Ratan is. That’s why the Tata group is what it is." This speaks volumes about his qualities and priorities in life.

Ratan Tata took over the charge of the Tata group from JRD Tata at a time when the country was going through drastic changes in the LPG reforms. The crisis did result in the company’s devaluation, but since then, Tata Group, under the leadership of Ratan Tata, has thrived, marking its presence across the globe. Under his leadership, the Tata group took over leading global companies like Toyota, Land Rover, Jaguar, and Corus. He took Tata Sons to new heights, but the most important achievement for him must have been to gain back the ownership of Air India airlines back to the Tata group. It was his way of paying tributes to his idol and inspiration, JRD Tata, who treated the airlines like his child back in the days when he started this new venture. Today, the Tata group owns more than 30 companies from various segments. He introduced the most affordable car in the world, popularly known as the Tata Nano. Tata’s main concern was about providing a safe vehicle to the Indian middle-class and lower middle-class families so that they didn't have to risk their lives while driving on the roads. So, the Tata group introduced ‘The Nano’, a car costing less than one lakh rupees. Ratan Tata was presented with the Padma Vibhushan by former president Shrimati Pratibha Patil in 2008. 

The day before yesterday, the great man left us at a time when his ideas and guidance were needed the most. Ratan Tata guided many young entrepreneurs, as he invested in more than 35 startups from his own earnings. He also mentored many such young minds that have the potential to write a brighter future for the country.

Each moment of life is a battle to achieve an objective in Ratan Naval Tata's life. He will be a testament to the human spirit for the ages to come and remind us to stick to our principles of ethical business practices, social responsibility, and the pursuit of a better world. Let us celebrate his life and extraordinary contributions to our society during this time of mourning.


A tribute from Vaadasabha...

Sunday, September 22, 2024

जागतिक नदी दिवस: एक पाऊल नदी संवर्धनाच्या दिशेने

सप्टेंबर महिन्यातील शेवटचा रविवार हा 'जागतिक नदी दिवस' म्हणून साजरा केला जातो. महत्वाचे म्हणजे आपल्या देशात अनेक नद्यांचे वाढदिवस देखील साजरे केले जातात.  जागतिक नदी दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव देणारे मार्क अँजेलो यांनी ब्रिटिश कोलंबिया मधल्या अनेक नद्या स्वच्छ केल्या. ते नेहमी म्हणायचे की "कोणतीही नदी वाचवण्याच्या पलीकडे गेलेली नाही" त्यांचं हे वाक्य आजही महत्वाचे वाटते.

नदी ही देशाच्या शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाची भूमिका बजावत असते. माणसाच्या अनेक महत्वाच्या दैनंदिन गरजा ह्या बहुधा नदीवर देखील अवलंबून असतात. प्रत्येक सजीव प्राण्यासाठी पाणी अत्यंत महत्वाचे आहे, त्यामुळे पाण्याला  जीवन म्हटलं जात. भारत देशात 100 हुन अधिक मुख्य नद्या तसेच त्याहून अधिक उपनद्या आहेत. जगातील कतार, युएई, मालदीव, बहरीन, कुवेत ह्या देशांमध्ये नदी वाहत नाही. परंतु भारतात अनेक नद्या आहेत व या नद्या फक्त आपल्याला पिण्यासाठीच पाणी देत नाहीत, तर पिकांनाही त्यांच्या द्वारे पाणी दिले जाते. राज्यातील भीमा, मिठी, मुळा, मुठा, पवना,गोदावरी अश्या एकूण 53 नद्या ह्या प्रदूषित झाल्याचे प्रदूषित मंडळाच्या अहवालात दिले आले आहे. मुख्यता हे प्रदूषण रोखण्यासाठी हरित लवादाने दिलेल्या निर्देशानुसार राज्य सरकारने 2018 मध्ये नदी पुनरुज्जीवन समिती स्थापन केली आहे व या समितीमार्फत राज्यातील प्रदूषित नद्यांचा कृती आराखडा तयार करून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सादर करण्यात आले आहे.

देशातील अनेक महत्वाच्या नाद्यांसोबत अनेक महत्वाच्या गोष्टी देखील जोडल्या गेल्या आहेत, त्यामुळे नदीचे पुरातन काळापासून मानवी जीवनाशी व संपूर्ण सजीव सृष्टीशी एक महत्वाचे नाते जोडले गेले आहे. आपण आत्तापर्यंत असे ऐकले आहे की भारतातील अनेक नद्या एकाच दिशेने वाहतात म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे. आणि बहुतांश नड्यांचा प्रवाह हा पश्चिमेकडून पूर्वेकडेच असतो परंतु आपल्या देशातील नर्मदा ही नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत नाही तर ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते.

एकंदरीत भारतातील व जगातील अनेक नाद्यांचा विविध पद्धतीचा इतिहास आहे. नदी जगली तर गाव जगेल असं म्हटलं जात त्यामुळे नदी जगवण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करणे महत्वाचे आहे. आजच्या ह्या जागतिक नदी दिवसाच्या निमित्ताने आपण प्रत्येकाने नदी संवर्धनाच्या दिशेने पाऊल उचलूया.

-Ramesh Kachare

Sunday, August 18, 2024

"नीट" चा निकाल नीटनेटका ?


तारीख जून,२०२४ - भारताचं पुढील ५ वर्षाच्या भविष्याचे चित्र उभं राहील, जेव्हा लोकसभेच्या निवडणूकीचा निकाल लागला. पण त्याच दिवशी लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात हरवलं, जेव्हा त्यांचा एक अनपेक्षित NEET UG परिक्षेचा निकाल लागला. हा. निकाल अनपेक्षितच होता. म्हणजे ज्या परीक्षेला कधीतरी पैकीच्या पैकी मार्क मिळवणारी मुलं असायची, तिथे ह्या वर्षी चक्क एक-दोन नव्हे, तर 67 मुलांना पैकीच्या पैकीच गुण मिळाले. एकाच परिक्षा केंद्रांत 6 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण, काही मुल उशिरा पोहोचली म्हणून त्यांना ग्रेस मार्क्स देणं, बिहार पेपर चोरीची घटना घडणं, सगळंच अगदी अनपेक्षित, आश्चर्यकारक !!

त्यानंतर काही विद्यार्थी सुप्रीम कोर्टात गेले, २५ हुन अधिक लोकांना पकडण्यात आलं, आपल्या राष्ट्रपतींनी त्यांच्या भाषणात ह्या घोटाळ्याचा उल्लेख केला, पण काही फरक पडलेला दिसत नाही.  दोन आठवड्यांपूर्वी प्राध्यापक पदासाठी घेण्या घेण्यात येणारी NET परीक्षा पेपर झाल्या नंतर त्याच्यात सुद्धा अनियमितता आढळून आली म्हणून रद्द करण्यात आली. त्यानंतर घेण्यात येणारी NEET PG परिक्षा सुद्धा रद्द केली, ती पण परिक्षेला २४ तास पण राहिले नसताना. ह्या सगळ्या परीक्षा होतात  National Testing Agency (NTA) या सरकारी संस्थेच्या देखरेखी खाली. हा प्रकार काही पहिल्यांदा घडत नाहीये. मागच्या ७ वर्षात पेपरफुटीची ७० प्रकरणं झाली आहेत, ज्या मध्ये १.७  कोटीहून जास्ती युवकांचं भविष्य असंच अंधारात हरवलं आहे. 

ह्या सगळ्याचा त्रास होतोय तो त्या मेहनती आणि योग्य विद्यार्थ्यांना, जे आपले कित्येक महिने, वर्ष घालवतात, त्यांची स्वप्ने पूर्ण करायला,  पण पदरी येते, ती निराशाच. चूक त्यांची नाहिये, मेहनत घेण्यात ते कुठेही कमी पडले नाहिये, चूक आहे ती ह्या व्यवस्थेची, जी पैसे खाऊन बसली आहे. ह्या सगळ्या व्यवस्थेचा जर सगळ्यात जास्ती कोणाला फायदा होतो, तर ते परिक्षांसाठीचं कोचिंग क्लासेसचे व्यावसायिक,  जे ह्याच मुलांच्या पालकांकडून अमाप पैसे घेतात. हे अक्षरशः एक मार्केट झालं आहे जिथे यशाचं आमिष दाखवून मुलांना आणि त्यांच्या पालकांना आकर्षित केलं जातं, स्वतःच्या 'कंपनी' कडे.  हे पालक आणि मुलं या क्लासेस कडे आकर्षित होतात, ते वाढलेल्या स्पर्धेमुळे. मुलांना शाळेत असल्या पासूनच अमूक कोचिंग तमुक क्लास लावले जातात, बऱ्याच वेळेला त्या मुलांची इच्छा नसताना सुद्धा त्या मुलांना बऱ्याच वेळेला माहीत सुद्धा नसतं, की त्यांना काय करायचय, काय बनायचय, पण ह्या वाढलेल्या स्पर्धमुळे त्यांना बळजबरीने ह्या परीक्षांच्या फेऱ्यात ढकललं जातं. आणि मग ह्याचा फायदा उचलतात हे कोचिंग क्लासेस, जे ह्या परिक्षांचा, आणि पर्यायाने शिक्षणाचा बाजार मांडतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी ह्या परिक्षा देतात,पण सीट, काही हजारच असतात. मग प्रवेश मिळण्याच्या भीती पोटी हे पालक आणि मुलं फसतात ह्या कोचिंग क्लासेस च्या 'गॅरंटिड सक्सेस' च्या आमिषा मध्ये. कोटा सारखी शहरं फॅक्टरी बनले आहेत, जिथे विद्यार्थ्यांमधील गुण न हेरता, त्यांचं एखाद्या असेंब्ली लाइन वर मास प्रोडक्शन चालू आहे,  त्यांना डॉक्टर आणि इंजिनियर बनवण्यासाठी.

मग ह्या स्पर्धेच्या जगात जर एखाधा परिक्षेत अपयश आलं; तर त्या अपयशाच्या भीतीने आत्महत्या करणाऱ्यांचं प्रमाण वाढत आहे. आता तर ह्या वाढलेल्या स्पर्धेचा ताण अगदी शाळकरी मुलांवर दिसायला लागलाय. म्हणूनच की काय आपल्या सरकारने शालेय विद्यार्थ्यांचं ओझ कमी करण्यासाठी सगळे विषय एकाच पुस्तकात समाविष्ट केले आहेत, ज्याने करून त्यांची दप्तरं हलकी होतील. पण त्याने त्यांच्या मनावरचा ताण आणि भीती कमी होणार आहे का? ते आपल्याला मोजता यायचं नाही, कारण, जसं थ्री इंडियटस् मधला रँचो म्हणतो तसं, दुदैवाने मेंदुवरचं प्रेशर मोजण्याचं यंत्र आपल्याला बनवता आलेलं नाही. बालपण, हे निरागसतेचं प्रतिक असतं, आणि बालपणाचा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे शाळा. पण आता मात्र याच निरागस मुलांची शाळा ही शिक्षणातल्या गैरप्रकारांची बाराखडी गिरवते आहे. मुलांच विकास करण्याऐवजी ह्या शाळा, ज्यांना राजकारण्यांनी, व्यवसायिकांनी फक्त त्यांच्या उत्पन्नाचं स्त्रोत बनवून ठेवलय, शाळेच नाव मोठं करण्यावर लक्ष देतात, आणि त्यासाठी ते चुकीच्या पद्धतींचा वापर करत आहेत. पैसे घेऊन मुलांना पास करणं, पबलिसिठी साठी बोर्डाच्या परिक्ष मध्ये गैरप्रकार असतील, आणि अजून किती तरी, ज्याची आपल्याला कल्पना सुध्दा नसेल. दुसऱ्या बाजूला, काही शाळा मुलांकडे बिलकुल लक्ष देत नाहीत त्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडून देतात.  मुलांना काय करावं, कसं करावं काहीच समजत नाही. आणि ह्या अश्या दोन्ही वातावरणांमध्ये वाढलेली मुलं बऱ्याच वेळा पुढे जाऊन ह्या घोटाळ्यांमध्ये, गैरप्रकारां मध्ये सामील होतात किंवा त्याला बळी पडतात.

विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल अश्या ह्या वातावरणामध्ये जेव्हा हे असे घोटाळे घडतील, तेव्हा ह्या सगळ्यांतून वाट काढणाऱ्या त्या मेहनती मुलांनी काय करायचं? आणि NEET सारख्या परिक्षा, ज्या ह्या देशाचे डॉक्टर घडवतात, त्यात जर असे घोटाळे झाले, तर हे देशाची आरोग्यव्यवस्था पोकळ नाही का करणार? येणाऱ्या काळात अश्या परिक्षांमध्ये पेपरफुटी, घोटाळे ह्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी कडक कायदे व त्यांची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे. असं नाही झालं, तर ह्या येणाऱ्या अपयशामुळे वाढणाऱ्या नैराश्याला आणि आत्महत्यांना जबाबदार कोण? ही व्यव्यवस्था, हे कोचिंग क्लासेस की ही स्पर्धा?

-Ashmit Gupte 

Wednesday, July 17, 2024

वारी माणुसकीची..! वारी एकतेची..! वारी प्रेमाची...!!!


आव मोठा, भाव खोटा 

   जनात- मनात 

   दुजा भाव कशासाठी

   तुझ्यात माझ्यात ,

   जनतेला घेऊनिया 

   जातो संग संग... 

   माणसात माणूस दिसता 

तोचि पांडुरंग.....


               खरंतर आषाढी एकादशी व वारी यांची सुरुवात कधी झाली? कशी झाली? याचं महत्त्व नेमकं काय? या सर्व प्रश्नांचा इतिहास खरंतर खूप मोठा आहे. पण मला वाटतं की या वरील ओळी या संदर्भात सर्वच काही व्यक्त करतात.. माणसांपासून माणूस दूर होत जाणाऱ्या आजच्या या समाजात, एखादी व्यक्ती प्रगती करताना त्याचा पाय खेचणाऱ्या आजच्या समाजात, माणुसकी हरवलेल्या आजच्या समाजात, थोडक्यात खोटे मुखवटे चढवून काळाच्या पटलावर चालणाऱ्या आजच्या याच समाजाला आषाढी एकादशी एक सुंदर उत्तर आहे असं मला वाटतं.

             लाखोंच्या संख्येने जेव्हा वारकरी संप्रदाय तहान- भूक- ऊन- पाऊस- थंडी या कशाचीच परवा न करता हातात झेंडे, निशाणी घेऊन, डोक्यावर तुळस घेऊन आणि ओठी फक्त 'हरि' नामाचा जप करत कोणताच भेदभाव न करता जेव्हा आपल्या पांडुरंगाचे तेजोमय रूप पाहण्यासाठी पंढरीची वाट धरतो तेव्हा खऱ्या अर्थाने जातीधर्माचे असंख्य बंधारे आपोआप तुटतात आणि प्रेमरूपी चंद्रभागेचं पाणी पांडुरंगाच्या पायाशी जाऊन पोहोचत आणि मग 28 युगं भक्तांच्या प्रेमापोटी विटेवर उभा राहिलेला माझा पांडुरंग सुद्धा सुखावतो...!

              आज या समाजात प्रत्येक क्षेत्रातच बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात. स्त्रियांवर होणारे अन्याय- अत्याचार, तृतीयपंथीयांच्या हक्कांची केली जाणारी गळचेपी, जातीनिहाय केले जाणारे राजकारण, आपापल्या जातीभोवती बांधल्या जाणाऱ्या भिंती, प्राणी- पक्षी- झाडे यांच्या केल्या जाणाऱ्या कत्तली, यांसारख्या गोष्टीमुळे समाज सर्व अर्थाने ढवळून निघाला आहे. एकमेकांबद्दलची वाढत जाणारी इर्ष्या असूया या गोष्टी वाढत चालल्या आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि जगद्गुरु तुकोबा यांनी पसरवलेला मानवतेचा संदेश कुठे ना कुठेतरी आज संपतं आहे.पण तरीही..

              कोरोनाच्या काळात संपूर्ण जग ठप्प झालं असताना, संपूर्ण जग थांबल असताना, खऱ्या अर्थाने माणूस माणसापासून लांब होता तरीही एकत्र येऊन अनेक हातांनी या काळात दिवे लावले, हातात घंटा, टाळ घेऊन 'हम सब एक है' अशी हाक दिली त्यावेळेला ज्ञानेश्वरांची मानवतेची शिकवण पाहायला मिळाली.

          'खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे' या उक्तीची आपल्याला प्रचिती आषाढी एकादशीच्या वारीतून येते. सर्व संतांनी आपल्याला सर्व धर्म समभाव हा मंत्र सांगितला आणि मग या एकादशीपासून वारीपर्यंतचा प्रवास सुरू झाला असावा. हिच वारी वर्षांनुवर्षे चालत आहे न थकता, न थांबता, अशीच युगानुयुगे चालत राहील. जी मानवतेची असेल..एकतेची असेल.. प्रेमाची असेल....!

  हीच शिकवण लक्षात घेऊन समाजातले वाद- विवाद संपून प्रेमाची बीजे पेरली जातील तेव्हा खऱ्या अर्थाने प्रत्येक माणसाला पांडुरंग हा प्रत्येकामध्ये दिसायला लागेल आणि मग ही वारी माणसापासून माणसापर्यंतची असेल..!!

 -Shivam Jadhav

Wednesday, May 15, 2024

जागतिक कुटुंब दिवस


घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती

इथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती

कवयित्री विमल लिमये यांनी केवळ चार ओळीत कुटुंबाची केलेली सुंदर व्याख्या केली आहे. कुटुंब हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. शास्त्रीय भाषेत कुटुंब म्हणजे एकमेकांशी नाते असलेल्या माणसांचा समूह. माणसा-माणसांमधील नाती ही जन्मानंतर, विवाहानंतर किंवा दत्तक घेतल्यानंतर निर्माण होतात. कुटुंबसंस्था एकत्र अथवा विभक्त अशी दोन्ही प्रकारची असू शकते. विभक्त कुटुंबसंस्थेत आई-वडील, पती-पत्नी, मुलगा-मुलगी असे प्राथमिक घटक असतात. विभक्त आणि विस्तारित असे सामान्यपणे कुटुंबाचे दोन  प्रकार आहेत. पण आजच्या बदलत्या काळात केवळ वरील नात्यांवर आधारित समूहांना कुटुंब म्हणण्याची पद्धत मागे पडली आहे. जीवाला जीव देणारी, प्रेम करणारी, मानसिक, शारीरिक आधार देणाऱ्या माणसांना कुटुंब म्हणण्याची प्रथा पडली आहे.  

ह्या वर्षी,  'विविधता आत्मसात करणे आणि कुटुंब बळकट करणे' ही  संकल्पना केंद्रस्थानी ठेवून त्यानुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. ह्या विषयाकडे पाहताना मला विविधतेचे वेगवेगळे कंगोरे दिसतात ते म्हणजे,  एकच व्यक्ती निभावत असलेल्या भूमिका ज्या एकाच कुटुंबातल्या वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींना सांभाळतात, मार्गदर्शन करतात. दुसरी म्हणजे सामाजिक लैंगिक लोकांना समाजात, कुटुंबात स्वीकारून, कुटुंब व्यवस्था बळकट करणे. तिसरी म्हणजे, समाजातील, विविध कुटुंबातील रूढी, परंपरा ह्यांचा अंतर्भाव करून कुटुंब बळकट करणे. मुळात विविधता म्हणजे केवळ वेगवेगळी माणसे होत नसून त्या माणसांसोबतच त्यांची असणारे स्वभाव, मत, आर्थिक, सामाजिक, न्यायिक, राजकीय, लैंगिक भिन्नता तसेच त्यांच्या रूढी परंपरा, वैचारिक बैठक ह्या सगळ्या गोष्टींचा स्वीकार करून कुटुंब व्यवस्था बळकट करणे अपेक्षित आहे. 

आपली भारतीय संस्कृती मातृदेवो भव, पितृ देवो भव ह्याचे संस्कार लहान पणापासूनच देत असते. कुटुंब वास्तव जगात कसं जगावं हे आपल्याला पदोपदी शिकवीत असत. एक माणूस म्हणून घडवीत असतं. गप्पा मारणे, फिरायला बाहेर जाणे, एकत्र टीव्ही पाहणे, जेवण करणे, एकमेकांसोबत वेळ घालवणे, ह्या तश्या पाहायला गेल्या तर छोट्या छोट्या गोष्टी पण फार मोठा परिणाम आपल्यावर करतात.  कोविड काळात ह्या सगळ्याचा आपण अनुभव घेतलाच आहे. आकाशाच्या अनेक छटांप्रमाणे असणारी  मनाने निर्मळ आई, फणसासारखा वरून काटेरी पण आतून गोड असे बाबा , अधिकार गाजवणारी ताई, गोंडस लहान भाऊ , घरात वय होवूनही दरारा असणारे आजोबा, नेहमी पाठीशी घालणारी आजी ही अशी माणसं आहेत वेळ पडली तर आपल्या करता काहीही  करतील. ह्यांची साथ असेल तर कोणत्याही संकटातून बाहेर आपण पडू शकतो. अश्या कुटुंबात आपण अनेक गोष्टी शिकतो. थोरा- मोठ्यांचा आदर करण्यापासून ते भावंडांसोबत भांडत गोष्टी शेअर करण्यापर्यंत. पडत - धडपडत आपण मोठे होतो. आपल्याकडे तर एकत्र कुटुंब पद्धती आहे. बऱ्याचदा नात्यांची नावं देखील आपल्याला माहीत नसतात. पूर्वी पत्रव्यवहार आणि आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात WhatsApp, Instagram, Facebook समुहांद्वारे आपण आजही कुटुंबासोबत जोडले गेलो आहोतच की. 

कुटुंब हा तो वटवृक्ष आहे ज्याच्या सानिध्यात आपण मोठे होतो आणि जो आपल्या पंखाखाली आपण सुरक्षित ठेवतो. एक उत्तम माणूस घडवण्याचे काम परिवार करीत असतो. कोरोना काळात आपल्याला नव्याने समजलेली नात्यांची किंमत, जपत पुढे वाटचाल करूया. 

 तुम्हा सर्वांना जागतिक कुटुंब दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

- Divya Maujekar 

And Then There Was Her: The Queen of Crime

  Around a century and three decades ago, a little girl took up a voracious hobby of reading. Although her mother homeschooled her, the latt...