Sunday, September 22, 2024

जागतिक नदी दिवस: एक पाऊल नदी संवर्धनाच्या दिशेने

सप्टेंबर महिन्यातील शेवटचा रविवार हा 'जागतिक नदी दिवस' म्हणून साजरा केला जातो. महत्वाचे म्हणजे आपल्या देशात अनेक नद्यांचे वाढदिवस देखील साजरे केले जातात.  जागतिक नदी दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव देणारे मार्क अँजेलो यांनी ब्रिटिश कोलंबिया मधल्या अनेक नद्या स्वच्छ केल्या. ते नेहमी म्हणायचे की "कोणतीही नदी वाचवण्याच्या पलीकडे गेलेली नाही" त्यांचं हे वाक्य आजही महत्वाचे वाटते.

नदी ही देशाच्या शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाची भूमिका बजावत असते. माणसाच्या अनेक महत्वाच्या दैनंदिन गरजा ह्या बहुधा नदीवर देखील अवलंबून असतात. प्रत्येक सजीव प्राण्यासाठी पाणी अत्यंत महत्वाचे आहे, त्यामुळे पाण्याला  जीवन म्हटलं जात. भारत देशात 100 हुन अधिक मुख्य नद्या तसेच त्याहून अधिक उपनद्या आहेत. जगातील कतार, युएई, मालदीव, बहरीन, कुवेत ह्या देशांमध्ये नदी वाहत नाही. परंतु भारतात अनेक नद्या आहेत व या नद्या फक्त आपल्याला पिण्यासाठीच पाणी देत नाहीत, तर पिकांनाही त्यांच्या द्वारे पाणी दिले जाते. राज्यातील भीमा, मिठी, मुळा, मुठा, पवना,गोदावरी अश्या एकूण 53 नद्या ह्या प्रदूषित झाल्याचे प्रदूषित मंडळाच्या अहवालात दिले आले आहे. मुख्यता हे प्रदूषण रोखण्यासाठी हरित लवादाने दिलेल्या निर्देशानुसार राज्य सरकारने 2018 मध्ये नदी पुनरुज्जीवन समिती स्थापन केली आहे व या समितीमार्फत राज्यातील प्रदूषित नद्यांचा कृती आराखडा तयार करून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सादर करण्यात आले आहे.

देशातील अनेक महत्वाच्या नाद्यांसोबत अनेक महत्वाच्या गोष्टी देखील जोडल्या गेल्या आहेत, त्यामुळे नदीचे पुरातन काळापासून मानवी जीवनाशी व संपूर्ण सजीव सृष्टीशी एक महत्वाचे नाते जोडले गेले आहे. आपण आत्तापर्यंत असे ऐकले आहे की भारतातील अनेक नद्या एकाच दिशेने वाहतात म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे. आणि बहुतांश नड्यांचा प्रवाह हा पश्चिमेकडून पूर्वेकडेच असतो परंतु आपल्या देशातील नर्मदा ही नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत नाही तर ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते.

एकंदरीत भारतातील व जगातील अनेक नाद्यांचा विविध पद्धतीचा इतिहास आहे. नदी जगली तर गाव जगेल असं म्हटलं जात त्यामुळे नदी जगवण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करणे महत्वाचे आहे. आजच्या ह्या जागतिक नदी दिवसाच्या निमित्ताने आपण प्रत्येकाने नदी संवर्धनाच्या दिशेने पाऊल उचलूया.

-Ramesh Kachare

No comments:

Post a Comment

हिंदी साहित्य जगत का एक अविस्मरणीय नाम : श्री हरिवंशराय बच्चन

 जीवन की हर पीड़ा को शब्दों में ढ़ाल देना, और फिर उन्हें गीत बना देना, यही कला थी हरिवंशराय बच्चन जी की। हरिवंशराय बच्चन हिंदी कविता का वह न...