Showing posts with label forest. Show all posts
Showing posts with label forest. Show all posts

Wednesday, November 5, 2025

अरण्यऋषी: मारुती चितमपल्ली

 


अस्तित्व शोधाच्या आंधळ्या वाटेवर धावत असताना एखादा मृदू स्वर कानी पडावा, आणि त्या स्वराने एखाद्याच्या जगण्याचं गाणं व्हावं. अगदी असचं झालं एका अवलिया सोबत, त्या अवलियाचं नाव मारुती भुजंगराव चितमपल्ली. चितमपल्ली हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षीशास्त्रज्ञ, वन्यजीव अभ्यासक तसेच व्यासंगी लेखक व रसिक म्हणून सर्वश्रुत आहेत. मूळचे तेलुगू भाषिक असलेल्या चितमपल्लींचा जन्म सोलापुरातला.

लहानपणापासूनच रानवाटा तुडवण्याची सवय असल्यानं त्यांना पक्ष्यांचा चिवचिवाट, झाडांचा गंध, प्राण्यांच्या हालचाली यात रमणं आवडायचं. यातूनच त्यांची निसर्गाबद्दलची जिज्ञासा आणि ओढ वाढली. आणि याच निसर्गप्रेमाने त्यांचा पुढील प्रवास निश्चित केला. कोइंबतूर येथील राज्य वनसेवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर, महाराष्ट्र शासनाच्या वनविभागात जवळजवळ छत्तीस वर्षे त्यांनी सेवा केली. कर्नाळा पक्षी अभयारण्य, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, नवेगाव राष्ट्रीय उद्यान या सगळ्यांच्या विकासात त्यांचे विशेष योगदान आहे. त्यांच्या विशेष प्रयत्नांमधून अनेक वन्यप्रजाती सुरक्षित राहिल्या, पक्ष्यांचे घर सांभाळले गेले आणि जंगलाचे संवर्धन झाले. आपल्या व्यावसायिक जीवनाचे धागेदोरे संशोधन विषयाशी जोडून त्यांनी ऋषिवत जीवन व्यतीत केलं. त्यामुळे लोक त्यांना 'अरण्यऋषी ' म्हणत.

चितमपल्ली जसे निसर्गाचे पुजारी त्याच प्रमाणे सरस्वतीचे देखील उपासक होते. देशोदेशीच्या दुर्मिळ ग्रंथांचा संग्रह करण्याचा छंद त्यांनी जोपासला. अठरा भाषा जाणणार्‍या या वनमहर्षीने आपला समृद्ध निसर्ग-जिवनानुभव तब्बल 25 ग्रंथांतून शब्दबद्ध केला आहे.यात 'पक्षी जाय दिगंतरा', 'रानवाटा', 'घरट्यापलीकडे', 'निळावंती', 'चैत्रपालवी' यांसारख्या ग्रंथांचा समावेश होतो.त्यांच्या लिखाणातून त्यांची सूक्ष्म निरीक्षणशक्ति, गाढा व्यासंग आणि संशोधक दृष्टी झळकते. तसेच शास्त्रीय ज्ञान आणि लालित्य यांचा सुरेख मेळ घातल्याने, वाचणार्‍याला त्यांचे लिखाण अजिबात रटाळ वाटत नाही. त्यांनी जवळपास एक लाख नवीन मराठी शब्दांना जन्म दिला, ज्यामुळे मराठी साहित्यात निसर्गचित्रणाची हिरवी वाट निर्माण झाली आहे. म्हणुनच समीक्षकांनी त्यांना ' वनविद्येचे तत्त्वज्ञ ललित गद्यकार ' अशी उपाधी दिली आहे. तर जी.ए कुलकर्णींनी " तुमच्या पावलांना रानवाटांची माहेरओढ आहे " असं म्हटलं आहे. 

मला असं वाटत कि 'निसर्ग' आणि 'माणूस' यांना जोडणारा दुवा म्हणजे चितमपल्ली आहेत. त्यांच्या लिखाणाने अनेक व्यक्ती प्रभावित झालेल्या पहायला मिळतात. माणसाने निसर्गाकडे जावं, त्याच्या कुशीत निजावं, त्याच्या विविधतेला स्पर्शून गंधित व्हावं. आणि हे निसर्ग प्रेमाचा सुकाळ असलेलं निसर्गाच गाव आयुष्याच्या प्रवासात कधीतरी शोधायला हवं. कारण त्यानंतर गवसलेलं ठिकाण हे परम विश्रांतीच आणि अनुपम शांतीच असेल. हाच विचार चितमपल्ली प्रत्येकाच्या मनात रुजवू पाहतात. 'निसर्ग' आणि 'साहित्य' या प्रांतात मुक्त विहार करणारं हे निसर्गाचं लेकरू जून 2025 मध्ये निसर्गाच्या कुशीत कायमच शांतपणे निजलं. परंतु, त्यांच कार्य आणि साहित्यसंपदा येणार्‍या पिढीसाठी संशोधनाची ब्लूप्रिंटच ठरेल. त्यामुळे त्यांच्या विचारांच्या शिदोरीतून प्रेरणा घेऊन असे अनेक 'मारुती' घडावेत हीच त्यांना वाहिलेली खरी आदरांजली असेल. या निसर्गाच्या लेकास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...


-वैष्णवी नागवडे

Thursday, June 5, 2025

Polymers of Our Progress


On this auspicious occasion of World Environment Day, let’s take a moment to delve in one of the strangest “Evolutionary” headlines you could imagine.

Breaking News! Slowly yet surely, humans have become the only animals who have shown the signs of digesting plastic without any side effects? Apparently, the new generation Beta, has begun adapting to the amount of plastic we consume, and slowly, maybe a few years later, our descendants will be able to digest it completely and make it biodegradable. Ironically, the ones who were contaminating the food chain, will now fix it. This ‘discovery’ has brought relief to countless plastic producers and recyclers.


Did you believe it? If you fell for it, welcome to the club. As plastic disposal remains an unsolved burning issue and masses are worried about the undisposable nature of this wretched material, despite the fact that none are actually concerned. People want a magical solution for its disposal. Moreover, microplastic is an even larger, yet oddly obscure, issue quietly bide their time to wreak havoc on our lives.


From food to fashion, from industry to medication. Microplastic has a wide reach. And wherever it reaches, it acts like a horcrux of plastic, making it immortal.


But what is microplastic? One widely accepted definition describes it as any plastic fragment between 1 nanometer and 5 millimeters in width. One nanometer is just a fraction of the width of a human hair, and 5 millimeters is about the width of a wedding ring.


Globally, an estimated 11 million tonnes of plastic waste leak into aquatic ecosystems each year, while microplastics accumulate in the soil from sewage and landfills due to the use of plastics in agricultural products. According to the UN Environment Programme, one estimate indicated that 2.7 million tonnes of microplastics seeped into the environment in 2020. This estimate is expected to double by 2040.


But what's the deal with microplastic today? On the occasion of World Environment Day, the spotlight turns to microplastic, on the theme of "Beat Plastic Pollution", a crisis whose reach has become dangerously widespread. Research says, from soil to air, from the rivers to the human blood, and from Mount Everest to the Mariana Trench. Microplastic has contaminated everything. And the worst part is it's affecting if it gets majorly accumulated. The leaching microplastic into oceans contaminates the aquatic life, which later contaminates food which humans and other organisms consume.


"As you sow, so shall you reap." A simple principle of Mother Nature. Easy to understand, easy to forget, but ruthlessly real.


But then what's the solution to this Microplastic dilemma? It would've been a magical solution if humans would've miraculously begun digesting plastic and rendering it biodegradable. But that’s just wishful thinking.


Nevertheless, the best possible solution can be rethinking a sustainable path with the help of a circular economy for plastic, meaning we need to rethink how we design, make, use and reuse plastics. Products must be designed to be used more than once, and to be recycled at the end of their life. This shift must involve everyone in the plastics value chain. A just transition is key to safeguarding waste pickers’ livelihoods and ensuring social fairness, leaving no one behind.


-Soham Sonar

Sunday, February 9, 2025

करुणापुरुष बाबा आमटे


हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती!

गुरू ठाकूर यांच्या या उक्तीप्रमाणे, ज्यांनी आपले तन, मन, धन आणि संपूर्ण जीवन निराधारांसाठी, उपेक्षितांसाठी अर्पण केले, ते थोर मानवतावादी व परिवर्तनवादी समाजसेवक, ऋषितुल्य बाबा आमटे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वावर दृष्टिक्षेप टाकण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे हा लेख. खांडववनाचे रूपांतर नंदनवनात करणारे उतुंग व्यक्तिमत्त्व म्हणजेच मुरलीधर देवीदास आमटे उर्फ बाबा आमटे! त्यांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील एका समृद्ध घरात झाला. दारात सर्व सुखे हात जोडून उभी असतानाही, त्यांना अगदी लहानपणापासून गरीब आणि उपेक्षितांच्या परिस्थितीची जाणीव होती.

१९३४ मध्ये त्यांनी बी.ए. पदवी मिळवल्यानंतर, १९३६ मध्ये ते एल.एल.बी. झाले. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी समाजकार्यास सुरुवात केली. एका पावसाळी रात्री घरी परतत असताना, त्यांना कुष्ठरोगाच्या शेवटच्या टप्प्यात असलेला एक रुग्ण दिसतो आणि हा ध्येयवेडा तरुण कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आयुष्य वेचण्याचा निर्धार करतो. आपल्या पत्नीला आपल्या ध्येयाविषयी कल्पना देतो आणि कुष्ठरोगासंदर्भात विविध पुस्तके वाचतो, सखोल अभ्यास करतो, कुष्ठरोग्यांच्या रुग्णालयात विनोबा भावे यांच्या साहाय्याने प्रवेश मिळवतो आणि त्यांच्यावर उपचार करतो. काही दिवसांनी त्यांना असे लक्षात येते की, आपण कुष्ठरोग्यांच्या उपचारासाठी स्वतः वैद्यकीय प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. त्यानंतर कलकत्ता स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन येथील अभ्यास वर्गात पंडित नेहरूंच्या शिफारशीवर प्रवेश घेतात आणि कुष्ठरोगी रुग्णांवर उपचार करण्याचे वैद्यकीय प्रशिक्षण पूर्ण करतात.

कुष्ठरोगासंबंधित लसीची स्वतःच्या शरीरावर चाचणी करून घेतात. केवळ असामान्य माणूसच असे धाडस करू शकतो. आज विज्ञानाने एवढी प्रगती केली असून समाजात अजूनही कुष्ठरोगाबाबत गैरसमज आहेत, परंतू बाबा आमटे यांची ही जिद्द आणि सेवा आजही मार्गदर्शक ठरते. पुढे जाऊन त्यांनी १९५० मध्ये वरोडा आणि भोवतालच्या ६० गावांमध्ये ४,००० रुग्णांवर उपचार केले. केवळ उपचार करणे हे पुरेसे नाही, ही जाणीव त्यांना झाली आणि त्यातूनच आनंदवन उभारण्याची प्रेरणा मिळाली. राज्य सरकारकडून वरोडा जवळील भागात ५० एकर पडीक जमीन त्यांना मिळाली. अतिशय अडचणीची, किचकट जागा. पाण्याचा अभाव. अशातच दोन मुले, पत्नी साधनाताई, एक लंगडी गाय, एक कुत्रा, १४ रुपये रोख आणि ५० एकर नापिक जमीन असा त्यांचा संसार सुरू झाला.

ते दिवस अतिशय भयानक होते. जंगलातील पशूंचा त्रास, अन्नधान्याचा तुटवडा या सर्व संकटांवर मात करत बाबा आमटे आणि त्यांच्या पत्नी साधनाताई आमटे यांनी सहा कुष्ठरोग्यांना सोबत घेऊन एक विहीर खोदली आणि १९५१ मध्ये विनोबा भावे यांच्या शुभहस्ते आनंदवनाचे औपचारिक उद्घाटन झाले. विविध आव्हाने पेलत बाबांनी कालांतराने कुष्ठरोग्यांच्या मदतीने सहा विहिरी खोदल्या, जमीन साफ केली, पिकांची लागवड केली आणि आनंदवनाचे रूपच पालटले. आनंदवन हे नुसते उपचार केंद्रच नव्हते, तर ते आत्मनिर्भर व मानवतावादी माणूस घडवण्याचे पवित्र तीर्थक्षेत्र होते. माझ्या मते ते केवळ एक संस्थान नसून बाबांनी तयार केलेले आत्मनिर्भरतेचे एक मॉडेल आहे, जे भारतातील अन्य ठिकाणीही वापरले जाऊ शकते! आनंदवनासोबतच, कुष्ठरोग निर्मूलन अभियान, नर्मदा बचाव आंदोलन, पर्यावरण, आदिवासी हक्क इत्यादी असंख्य सामाजिक चळवळींमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या कामात पत्नी साधनाताई यांची अनमोल साथ त्यांना मिळाली. कुष्ठरोग्यांच्या सेवेसोबतच, त्यांच्या पुनर्वसन आणि स्वयंपूर्णतेकडेही त्यांनी विशेष लक्ष दिले.

सामाजिक कार्यासोबतच, त्यांनी त्यांच्या अनुभवांवर आधारित कसदार, प्रेरणादायी व वास्तववादी साहित्यनिर्मिती केली. 'ज्वाला आणि फुले' हा त्यांचा काव्यसंग्रह याचे उत्तम उदाहरण. बाबा आमटे यांनी आपल्या पुढच्या पिढीला नि:स्वार्थ समाजकार्याचा वारसा दिला. डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे यांनी आदिवासींसाठी लोकबिरादरी प्रकल्प, वन्यजीव संरक्षण आणि आरोग्य सेवा यामध्ये मोलाचे योगदान दिले. तर डॉ. विकास व भारती आमटे यांनी आनंदवनाचा विस्तार करण्यात भरीव कामगिरी केली. बाबांना रॅमन मॅगसेसे, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण यांसारखे विविध प्रतिष्ठित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

तसं पाहिलं, तर क्षणभरच असतं माणसाचं आयुष्य. त्यातही बहुतेक जण स्वतःपुरतेच जगत असतात; पण बाबा आमटे यांसारखी काही थोर माणसं एका आयुष्यातच हजारो जिवांना एक नवीन जीवन देऊन जातात. खरंच, आधार नसलेल्यांचे आभाळ बनण्यासाठी मन आकाशाएवढे विशाल असावे लागते. ९ फेब्रुवारी २००८ रोजी या महात्म्याने जगाचा निरोप घेतला. माझ्या मते, बाबा आमटे यांचा संपूर्ण जीवनप्रवास दररोज हजारो लोकांना लाखोवेळा प्रेरणा देतो. आयुष्यात सर्वोत्तम आनंद म्हणजे स्वतःच्या हितासाठी नाही, तर इतरांच्या भल्यासाठी कृत्यं करणे आणि समाजाच्या कल्याणासाठी योगदान देणे हे बाबांचं जीवन खूप प्रभावीपणे शिकवून जातं! 


"कोंडलेल्या वादळांच्या

ह्या पहा अनिवार लाटा

माणसांसाठी उद्याच्या

येथूनी निघतील वाटा...!"


विनम्र अभिवादन.


-आर्य सोनवणे

Sunday, September 22, 2024

जागतिक नदी दिवस: एक पाऊल नदी संवर्धनाच्या दिशेने

सप्टेंबर महिन्यातील शेवटचा रविवार हा 'जागतिक नदी दिवस' म्हणून साजरा केला जातो. महत्वाचे म्हणजे आपल्या देशात अनेक नद्यांचे वाढदिवस देखील साजरे केले जातात.  जागतिक नदी दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव देणारे मार्क अँजेलो यांनी ब्रिटिश कोलंबिया मधल्या अनेक नद्या स्वच्छ केल्या. ते नेहमी म्हणायचे की "कोणतीही नदी वाचवण्याच्या पलीकडे गेलेली नाही" त्यांचं हे वाक्य आजही महत्वाचे वाटते.

नदी ही देशाच्या शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाची भूमिका बजावत असते. माणसाच्या अनेक महत्वाच्या दैनंदिन गरजा ह्या बहुधा नदीवर देखील अवलंबून असतात. प्रत्येक सजीव प्राण्यासाठी पाणी अत्यंत महत्वाचे आहे, त्यामुळे पाण्याला  जीवन म्हटलं जात. भारत देशात 100 हुन अधिक मुख्य नद्या तसेच त्याहून अधिक उपनद्या आहेत. जगातील कतार, युएई, मालदीव, बहरीन, कुवेत ह्या देशांमध्ये नदी वाहत नाही. परंतु भारतात अनेक नद्या आहेत व या नद्या फक्त आपल्याला पिण्यासाठीच पाणी देत नाहीत, तर पिकांनाही त्यांच्या द्वारे पाणी दिले जाते. राज्यातील भीमा, मिठी, मुळा, मुठा, पवना,गोदावरी अश्या एकूण 53 नद्या ह्या प्रदूषित झाल्याचे प्रदूषित मंडळाच्या अहवालात दिले आले आहे. मुख्यता हे प्रदूषण रोखण्यासाठी हरित लवादाने दिलेल्या निर्देशानुसार राज्य सरकारने 2018 मध्ये नदी पुनरुज्जीवन समिती स्थापन केली आहे व या समितीमार्फत राज्यातील प्रदूषित नद्यांचा कृती आराखडा तयार करून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सादर करण्यात आले आहे.

देशातील अनेक महत्वाच्या नाद्यांसोबत अनेक महत्वाच्या गोष्टी देखील जोडल्या गेल्या आहेत, त्यामुळे नदीचे पुरातन काळापासून मानवी जीवनाशी व संपूर्ण सजीव सृष्टीशी एक महत्वाचे नाते जोडले गेले आहे. आपण आत्तापर्यंत असे ऐकले आहे की भारतातील अनेक नद्या एकाच दिशेने वाहतात म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे. आणि बहुतांश नड्यांचा प्रवाह हा पश्चिमेकडून पूर्वेकडेच असतो परंतु आपल्या देशातील नर्मदा ही नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत नाही तर ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते.

एकंदरीत भारतातील व जगातील अनेक नाद्यांचा विविध पद्धतीचा इतिहास आहे. नदी जगली तर गाव जगेल असं म्हटलं जात त्यामुळे नदी जगवण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करणे महत्वाचे आहे. आजच्या ह्या जागतिक नदी दिवसाच्या निमित्ताने आपण प्रत्येकाने नदी संवर्धनाच्या दिशेने पाऊल उचलूया.

-Ramesh Kachare

Wednesday, September 18, 2024

Green Hydrogen: Game-Changer For the Future of Fuels?


“Green hydrogen is emerging as a promising addition to the world’s energy landscape.” 
-Narendra Modi

According to the Standford University, there’d still be gas and coal left by the time oil runs out in 2052. But if gas production is increased to fill the energy gap left by oil, then those reserves will only give an additional eight years, taking us to 2060. Therefore, as PM Modi says, “the time for action is here and now". The fact is humans currently possess the technology to utilize hydrogen fuel instead of fossil fuels, but the technology is on the primary stage. The technology, which is not on the primary stage is electric automotives. But considering their less efficiency, leaching occurring due to the lithium-ion battery, and their negative environmental production-friendly techniques, they are (no offence) useless. The International Conference on Green Hydrogen was established by various stakeholders in the energy and environmental sectors, government bodies, international organisations, and industry leaders. The significance of this conference was to strengthen the green hydrogen agenda, facilitate global collaboration, and drive progress toward a sustainable energy future.

At the conference, PM Narendra Modi emphasized the growing realization that climate change is not just a matter of the future, but its impact can be felt now. He said that energy transition and sustainability have become central to global policy discourse. The Prime Minister briefed that India was among the first G-20 nations to fulfill its Paris commitments on green energy. He said these commitments were fulfilled nine years ahead of the target of 2030. Throwing light on the advancements in the past 10 years, the Prime Minister said that India’s installed non-fossil fuel capacity increased nearly 300% and solar energy capacity got over a 3,000% boost. PM Modi underlined that we are not resting on these achievements and the nation remains focused on strengthening existing solutions while also looking at new and innovative areas, saying this is where the of green hydrogen comes into the picture.

There were 25 key speakers at the conference, including Dr. Sunita Satyapal, Director of Hydrogen and Fuel Cell Technologies at the U.S. Department of Energy; Prof. G. D. Yadav, a distinguished professor from the Institute of Chemical Technology; Dr. Sachchida Nand, a leader in chemical engineering from IIT Bombay; and international figures like Bernt Nordman, head of Climate Program at WWF Finland; Mr. Gan Kim Yong, Deputy Prime Minister of Singapore; and Jorgo Chatzimarkakis, CEO of Hydrogen Europe. 

The discussions emphasised the use of electrolysers and better use of sea water and municipal waste water for producing green hydrogen. Key areas of focus involved innovation in hydrogen storage solutions and the decarbonisation of hard-to-electrify industries such as steel, refineries, and heavy-duty transportation. The potential for green jobs was discussed, and skill enhancement in green hydrogen technology was a key note of the conference. Discussions on investment in research, development, and infrastructure of green hydrogen were followed. 

International partnership is critical for promoting green hydrogen’s impact on decarbonization. Scaling up production, minimizing costs, and building infrastructure can happen faster through global cooperation. India is willing to become the global hub for the production, utilization, and export of green hydrogen. The National Green Hydrogen Mission is giving an impetus to innovation, infrastructure, industry, and investment. Experts discussed the need for public policy support, urging scientists and innovators to propose changes that would further boost the sector. This includes the creation of regulatory frameworks that support green hydrogen adoption in public transport, shipping, and other sectors. The role of green hydrogen in achieving climate goals was underscored, with discussions on how hydrogen can contribute to reducing global carbon footprints and help nations fulfill their commitments under international climate agreements.

-Soham Sonar

Wednesday, June 5, 2024

आता प्रश्न मोगलीच्या कुटुंबाचा आहे...

लहानपणापासूनच मोगली हा जीवा-भावाचा विषय. त्याचे सिनेमे, पुस्तकं याचं जणू पारायणच केलेलं, पण जेव्हा आज रशिया - युक्रेन, इस्राएल - पॅलेस्टाईन यात पृथ्वी नष्ट होताना दिसते, दिल्ली चं तापमान ५०शी गाठतं तेंव्हा मनी एकच प्रश्न सतावतो आता जर मोगली आला तर तो राहणार तर राहील कुठे? अमेझॉन च्या खोऱ्यात ते पण आगीत खाक झालेलं, की आमचा सह्याद्रीत की अजून कुठे .? पण जेव्हा हा कुतुहल असणारा कल्पक प्राणी पर्यावरणाला मोकळा श्वास घेऊ देत नाहीये, निसर्गाकडे हॉलिडे स्पॉट म्हणून बघतोय, हेच कशाला 

             जिथे कधी होते गोकुळ 

             तिथे आज झाली दशा 

            म्हणे वसुंधरा तुला मानव

             कुठली ही चढली नशा....

जेव्हा या ओळी समोर येतात तेव्हा यक्ष प्रश्न समोर येतो तो म्हणजे, आता प्रश्न मोगलीच्या कुटुंबाचा  ...!


           आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं. भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे. इथे धर्म, भाषा, सण, परंपरा, खाद्यपदार्थ यांचं जे वैविध्य आहे; तसं जगात कुठल्याच देशात नाही. हे आता इथे लिहिण्याचं कारण म्हणजे या सगळ्या गोष्टी शिकवताना एक गोष्ट मात्र कायमची आपल्याला सांगायची राहून गेलीये. किंबहुना ती गोष्ट या सगळ्यांपेक्षा महत्त्वाची, उल्लेख करण्याजोगी आहे हेच कुणाला कधी वाटलं नाहीये आणि हेच आपलं दुर्दैव आहे. ही गोष्ट म्हणजे आपल्या जगण्याला खरा अर्थ देणारी आपली जैवविविधता.

          आपला देश जैवविविधतेच्या बाबतीत जगातील टॉप 17 देशांत येतो. पण तरीही मोगली कशाला तर साधे पक्षी, प्राणी यांना निवारा नाही.नाही म्हणजे आधी च्या काळी असलेलं त्यांचं अधिराज्य संपुष्टात येऊ लागलंय..आज पिंडाला शिवायला कावळा नाही अशी वेळ ...एक काळ असा होता की जिकडे तिकडे चिमण्यांची शाळा भरलेली दिसायची, राष्ट्रीय प्राणी आणि पक्षी संपुष्टात आलेले नव्हते , 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' अशी वृत्ती होती , झाडे लावा झाडे जगवा असा नारा देण्याची गरजच नव्हती कारण माणूस अप्पलपोटी होऊन स्वतःच्या गरजा भागवत नव्हता.

          खरं तर निसर्ग आपल्याला त्याच्या अंगाखांद्यावर मनसोक्तपणे बागडू देत आलाय. त्याचा सगळा खजिना त्यानं आपल्याला खुला केलाय. पण, आपण त्यालाच बोचकारतोय. त्यामुळे, निसर्गही कोपलाय. त्यानं काही छोटे मोठे धक्के देऊन इशारा दिलाय. तरिही आपल्याला जाणीव नाहीये. निसर्गानं आता माणसाशी युद्ध पुकारलंय. पुढच्या काही वर्षांत न भुतो न भविष्यती असं संकट माणसासमोर उभं ठाकणार आहे. कोरोनाच्या संकटापासून सुरक्षित राहायला आपल्याकडे घर तरी होतं. पण, आताच आपण निसर्गावरचा अत्याचार थांबवला नाही तर भविष्यात येणाऱ्या संकटापासून वाचायला डोक्यावरचं छत आणि पायाखालची जमीनही नसेल. आता कित्येक लोकं हा अंदाज वर्तवत तर आहेतच की काही हजारो वर्षांनी पृथ्वी संपूर्ण जलमय होईल पण खर तर याची सुरुवात आपणच केलीये, प्रगतीच्या नावाखाली निसर्गात ढवळा-ढवळ करून.

          गेल्या काही वर्षांत जगानं तापमान वाढ, दुष्काळ, महापूर, सुनामी, चक्रीवादळ, भूस्खलन, अशी संकटं अनुभवली आहेत. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोरोना काळात  माणसाचा निसर्गातील हस्तक्षेप कमी झाला आणि निसर्गाचे थक्क करणारे चमत्कार दिसू लागले. चंदीगढमधून दिसणारा हिमालय, मुंबईच्या समुद्रात बऱ्याच वर्षांनी दिसलेले डॉल्फिन, मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांत थोडी फार अनुभवायला मिळणारी शुद्ध हवा याचं आपल्याला मोठं कौतुक वाटतंय. पण, तरीही या गोष्टी कायम राहाव्यात यासाठी आपण कणभरही प्रयत्न करत नाही. एवढं होऊन सुद्धा पिंजऱ्यातून बाहेर पडलेल्या कल्पक प्राण्याने सुविधा करता करता पुन्हा हानी ही सुरूच केली. मग ते रस्ते बांधणीत लाखोंनी झाडें तोडणे असो किंवा पुन्हा नद्या,नाले, समुद्र यांच्या जवळ घर बांधणी असो. प्लास्टिक, प्रदूषण या गोष्टी तर बोलण्याच्या पलीकडे निघून गेल्यात. श्वास घ्यायला सुद्धा कही वर्षात 'प्रायव्हेट झाड' अशी संकल्पना यायला वेळ  लागणार नाही. 

         या वर उपाय एकच, मानवाला जितका निसर्गात हस्तक्षेप कमी करता येईल तितका कमी करणं , पर्यावरण पूरक गोष्टीच वापरणं. यामुळे हानी कमी होईल अशी आशा, कारण आपल्या चुका महाकाय रुप घेऊन आपल्यावर येऊन धडकत आहेत. आपण स्वतः जागे होणे व इतरांना, ज्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे त्यांना, गदागदा हलवून जागे करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या गोष्टींचे उत्पादन व वापर थांबवणे, तशा गोष्टींचे नवीन शोध न लावणे, पृथ्वीवर जंगलांचे क्षेत्रफळ वाढवणे, जलप्रदूषण, वायुप्रदूषण कमी करणे, अपारंपारिक उर्जास्रोतांचा वापर करणे अशा अनेक गोष्टी आपल्याला सहजच करण्यासारख्या आहेत. अगदीच काही नाही तर प्लॅस्टिकचा वापर कायमस्वरूपी थांबवणे, आठवड्यातून एक दिवस कुठलेही वाहन न वापरणे व पर्यावरणपूरक एक झाड लावणे, जोपासणे व वाढवणे हे तर आपल्याला नक्कीच करता येईल. हे सगळं तर बालवाडी पासून पुस्तकात शिकतोय फक्त ते आमलात आणता आलं पाहिजे,ह्या गोष्टींची जर आपल्याला सवय झाली तर पर्यावरण रक्षिणे व ते वृद्धिंगत होणे हे आपले श्वास घेण्यासारखे नित्यकर्म होईल व प्रत्येक दिवसच पर्यावरण दिवस होईल. त्यासाठी वेगळा दिवस साजरा करायची गरजच पडणार नाही. आणि मोगलीच्या जीवनाचाही प्रश्न सुटेल,नाही का?

- Tanvi Chitale 

And Then There Was Her: The Queen of Crime

  Around a century and three decades ago, a little girl took up a voracious hobby of reading. Although her mother homeschooled her, the latt...