Showing posts with label love. Show all posts
Showing posts with label love. Show all posts

Thursday, April 24, 2025

To Always Be; An Ode To Shakespeare

My friend complains about this summer day. Too hot, too still. She says, “I don’t know how I’m supposed to like any of this.” I tell her, “Then don’t. But let me be here while you hate it.” We sit on the steps, and I recite, half-laughing, “Shall I compare thee to a summer’s day? Thou art more lovely and more temperate.” The line lingers. Shakespeare’s summer was eternal; this one rather insufferable. But something shifts as we begin to talk about him—the ghost of a man who still lives in books and classrooms. 

A professor once said that Shakespeare  took the roots of all we feel, like envy, fear, and love beyond happiness and that is why he still feels relevant. He crossed the bridge of time and knew us deeply the way he understood the anatomy of emotions and bending words to fit this musing right. Musings that even if in his world took place in fantasy spaces, splurge and spill out of today’s small bits of life too, so much so that when I- tell my sister love is not for the faint-hearted or later say, “Good riddance,” after her heartbreak, I’m quoting him without realizing it. Shakespeare gave us the words for joy, grief, and all that lies between which is why his plays weren’t meant to be read; they were meant to be felt by being spoken about. Every word, every silence, every goosebump.

It’s been 461 years since his birth on April 23, 1564. Still, he endures, because he wrote what we couldn’t say. He asked, “To be or not to be,” and left us an answer in his legacy which is to say, to in a way, always be.


-Urvi Patil

Tuesday, April 15, 2025

जगणं, जपणं आणि जिणं-कला

मानवाला खरं तर जिवंत राहण्यासाठी अन्न, पाणी आणि प्राणवायू एवढ्याच गोष्टी पुरेशा होत्या; पण तरीही प्राचीन गुहाचित्रांचे अवशेष आणि शिल्पकलेचे नमुने आजही सापडतात. म्हणजेच प्राचीन काळात ‘कला’ ही विरंगुळा होती. मानवाच्या उत्क्रांतीसोबत कलेचं महत्त्व वाढत गेलं. मनातील गुंतागुंतीच्या आणि उत्कट भावनांना दिलेलं मूर्त स्वरूप म्हणजे ‘कला’. ही कला त्याच्या जगण्याला अर्थ देऊ लागली, आणि पुढे ती त्याच्या अर्थार्जनाचं साधनदेखील बनली. पण इतक्या बदलांनंतरही कलेचा आत्मा तसाच राहिला — त्याच उत्कट भावना, तेच कौशल्य, निर्मितीतून मिळणारा आनंद आणि समाधानही तेच. आणि हा आनंद केवळ कलाकारापुरताच मर्यादित राहत नाही; तर त्या कलेची अनुभूती घेणाऱ्या प्रत्येकापर्यंत पोहोचतो. चित्रकलेपासून ते शिल्पकलेपर्यंत आणि संगीतापासून ते नृत्यकलेपर्यंत — प्रत्येक कलेचं एक शास्त्र आहे; पण त्या शास्त्राची चौकट होत नाही. प्रत्येक कलेचे काही नियम आहेत; पण त्या नियमांची बंधनं होत नाहीत. कारण, कला स्वच्छंद असते!

कला माणसाला व्यक्त व्हायला मदत करते, माणसातलं माणूसपण जपते, पर्यायाने माणसालाच जपते. कला ही कलाकारांची ओळख बनते आणि कलाकृतींमध्ये कलाकाराच्या भावनांची, माणूसपणाची, अस्तित्वाची, झलक दिसत राहते.  मनापासून कलेची साधना करणाऱ्या कलाकाराला जसं समाधान मिळतं, तसंच कलेचा मनापासून आदर करणाऱ्या कलासक्तालाही मिळतं. प्रेक्षक किंवा श्रोते होणं तसं सोपं; पण खऱ्या अर्थाने कलासक्त होणं कठीण. कोणत्याही कलेबद्दल आत्मीयता बाळगणं, त्यामागच्या कष्टांची जाण असणं, कलाकाराचा आणि त्याच्या कलाकृतीचा मनापासून आदर करणं' म्हणजे कलासक्त होणं.

अलीकडचीच एक घटना — सोशल मीडियावर Studio Ghibli स्टाईल AI-Generated Imagesना अचानक पेव फुटलं. Ghibli या जपानी ॲनिमेशन स्टुडिओचं मूळ वैशिष्ट्य म्हणजे – प्रत्येक फ्रेम ही कलाकारांनी तासनतास घेतलेल्या मेहनतीतून साकारलेली असते आणि त्यातील बारकाव्यांमुळे प्रत्येक पात्राचं भावविश्व जिवंत झाल्याचं भासतं.

पण जिथे AIकडे भावना नाहीत, तिथे ह्या कृत्रिमतेला ‘कला’ म्हणावं का? ती केवळ नक्कल ठरते — आणि कलाकारांच्या कष्टांचा अपमानदेखील. अनेकांनी हा ट्रेंड फॉलो केला; पण खरे कलासक्त रसिक मात्र याला विरोध करत उभे राहिले. यामुळे सिद्ध झालं की कलेतील कृत्रिमता ही कलाकारालाही खटकते आणि कलासक्तालाही. कलाकार कलेला जिवंत ठेवतो, कला कलाकाराला जगवते, आणि कला माणसांच्या जगण्याला अर्थ देते.

ही जगण्या-जगवण्याची कला म्हणजे – मन रिझवणारा आणि कलासक्त रसिकांना थिजवणारा कौशल्यपूर्ण आविष्कार! म्हणूनच कलेमुळे जगणाऱ्या, कलेसाठी जगणाऱ्या आणि कलेला जीवन मानणाऱ्या, अशा सर्वांना — जागतिक कला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 


-अनुष्का बिराजदार.


Friday, March 21, 2025

Verses of Eternity: Cherishing the Soul of Poetry


“That you are here, that life exists and identity; That the powerful play goes on, and you may contribute a verse”   -Walt Whitman 

Whitman expresses in the aforementioned lines his appreciation of mere existence and the idiosyncrasy of an individual. With a heart set to inspire future generations, he urges each individual to have complete freedom in selecting their "verse" and carve their name upon the echoes of eternity. March 21st is celebrated as World Poetry Day to honor the diversity in poetry from multiple angles, be it in preserving linguistic diversity and cultural heritage or how it acts as an artist’s voice in dynamic social changes, like Sylvia Plath who used poetry as a medium to challenge patriarchy and oppression. In order to harmonize the spirit’s rhythm, UNESCO declared World Poetry Day in 1999. Through dawns and dusks, the world has beheld those who spun words into eternity’s tapestry. Specifically William Shakespeare, Rumi, Robert Frost, Emily Dickinson, Sylvia Plath, Pablo Neruda, Homer, Rabindranath Tagore and countless voices that are immortal in the ink of history. 

“Where the mind is led forward by thee 

 Into ever-widening thought and action 

 Into that heaven of freedom, my Father, let my country awake” 

-Rabindranath Tagore 

The cited text is the closing lines of Tagore’s poem “Where the Mind is Without Fear”. The poet sketches echoes of a society where the young minds are progressive, with a flame that hungers for the oil of understanding. He prays to God to cultivate a nation where the seeds of freedom grow with the zeal of a rising sun. Now allow me to ask you this, when was the last time you read a poem? Not for school, not for a quick Instagram post, but to truly feel its essence, its depth, its soul? Let me guess, probably in the distant yesterdays. Poetry, an art that was once the lifeline of human expression, is being reduced to mere captions and hashtags in an era of short attention spans and viral content. Have we lost sight of its depth? Poetry serves as a gentle reminder to slow down, feel, and connect in a world that often walks over feelings, because every poem is like a lantern in the dark, guiding us back to ourselves. On this World Poetry Day let's celebrate the ability of words to inspire, heal, and remind us that poetry can speak even when all else is silent. 

 "We don’t read and write poetry because it’s cute. We read and write poetry because we are members of the human race. And the human race is filled with passion." -Prof. John Keating from The Dead Poets Society


-Arushi Yadav

Wednesday, March 19, 2025

रंगभान

मला मोहित करतात रंग, त्यांच्या छटा, त्यांचं दिसणं, त्यांचं असणं, सारंकाही. जगातले आणि आयुष्यातले रंग सारखेच असं वाटलं तेव्हा कळलं की एकेका आयुष्यानेच जग रंगीत होत राहातं, कधी प्रेमाने लाल, दुःखाने काळं किंवा स्थैऱ्याने पांढरंही. कोणताच रंग नसलेला 'ना'रंगी रंग जसा पाण्याला असतो तसा तुम्हां-आम्हालाही तो निसर्गदत्त असतो. जिथे जन्मावं, ज्या स्थितीत राहावं, वाढावं तिथला रंग पांघरत राहतो आपण. तो रंग नक्की ल्यावा मात्र ल्यावा तो विवेकाच्या गाळण्यातून गाळून. असा विचार केला तर किती सहज वितळून जातो पदराखाली जपलेला खोटा अभिमान, माणसातली आणि खरंतर मनातली दरी लीलया भरून काढतात हे रंग... मात्र पूर्वसुरींच्या अनुभवातून एक गोष्ट नक्की कळते की ह्या रंगांचं प्रयोजन फार व्यापक आहे, बघावा तसा पर्वत दिसावा तसेच हे रंगदेखील आहेत. सृष्टीच्या व्यापकतेचं वैभव हे रंगच तर दाखवतात. समुद्र आणि वाळवंटाचा रंग एक नाही म्हणूनच दोघांना त्यांचं-त्यांचं महत्त्व आहे, माहात्म्य आहे. ह्या रंगांकडे जेव्हा भौतिकदृष्ट्या बघतो तेव्हा खरंच अवाक् होऊन जातो. शरीरातल्या विशिष्ट पेशी दृष्याच्या रंगभानासाठी कारणीभूत ठरतात असं शास्त्र सांगतं. माणसा-माणसात त्यातले पुसटसे भेद आणि त्याचे आजारही सांगतं, ते खरं देखील आहे पण यावरून काही अंशांनी तरी माणसांची दृष्टी वेगळी असते हेच स्पष्ट होतं. हे कळल्यावर दृष्टी वेगळी असल्याने माणसांचा दृष्टिकोन वेगळा असणारच हे मनाला इतकं पटतं की मतभेदाची कित्येक कारणं समूळ मावळून जातात.

कोट्यावधी लोकांचं जीवन युगांपासून व्यापून राहिलेले धर्म म्हणे एका रंगाने दर्शविता येतात, हे रंगांचं केवढी माहात्म्य म्हणावं ! इथे आठवतो तो शाळेतला प्रयोग, प्रिझम मधून गेलेले सगळे रंग शेवटी पांढर्या रंगामधे परिणत होतात, तेचा वाटतं की शेवटी शुद्ध श्रद्धेच्या चौकटीतून गेलेले सगळेच रंग एकाच चैतन्यात मिसळणार आहेत. तेव्हा माझ्या रंगाचा मला अभिमान असला तरी दुसऱ्याच्या द्वेषाचं कारणच उरत नाही. म्हणून महत्व द्यायचं ते प्रत्येकाच्या स्वतंत्र असण्याला, दिसणं हे काळाच्या ओघात बदलत राहणारच असतं. शेवटी सगळे सारखाच श्वास घेतात, कुणाचा श्वास भगवा नसतो किंवा हिरवाही... जसा शब्दांसाठी अर्थ तसा रंगांसाठी भाव असतो. जे शब्दांतून सांगता येत नाही, अभिनयातून दाखवता येत नाही ते रंग दर्शवतात. कलाकाराच्या भावावस्थेपर्यंत नेणारी शिडी म्हणजे रंग. भान हरपून टाकणारे तसं भानावर आणणारेही रंगच. प्रत्येकाला आपलं आयुष्य बसवता येतं एखाद्या रंगामध्ये किंवा दोन-चार रंग मिसळून साकारलेल्या एखाद्या रंगामध्ये, मात्र त्याला धाडस हवं हे नक्की. नाही म्हटलं तरी आजच्या काळात प्रत्येकाच्या विचारांना एखादा रंग लागलेलाच असतो. अशा रंगांच्या छटा फार बोलक्या असतात. माणसाला अगदी सुरुवातीला चित्र काढता येत होतं पण तो तिथे थांबला नाही, पाना-फुलांच्या रसाने तो त्यामधे रंग भरू लागला, स्वतःचे क्षितिज स्वतः विस्तारू लागला. आजची परिस्थिती तशी फार वेगळी, पण हृदयाची तहान अगदी तिच. आयुष्यात रंग भरण्याची, आयुष्य रंगीत करण्याची. प्रत्येकाच्या मनातल्या रंगांना कर्माची जोड मिळतेच असं नाही, पण रंगांची ओढ मात्र कायम राहते, जशी मनात तशी इतिहासाच्या पानांवरही. कधी हातात नसलेले अनपेक्षित रंग उधळले जातात आणि नव्हत्याचं होतंदेखील होतं.

रस्त्याच्या कडेला फुलं विकून पोट भरण्याची ईच्छा उरात बाळगणाऱ्या मुलाच्या निरागस डोळ्यांत मला हेच रंग दिसतात किंवा त्याच्यासमोरून गाडीच्या खिडकीतून हात दाखवत जाणाऱ्या एखाद्या सोनूच्या डोळ्यातही अगदी तेचं रंग असतात. ए.सी.मधे बसलेल्या आणि रस्त्यावर झोपलेल्या माणसांच्या स्वप्नातही हेच रंग जाणवतात, खरंच माणसाचं अंतरंग इतकं रंगीत असतं का ? 


 -अनीश जोशी

Friday, February 14, 2025

स्नेहेन सर्वे वशाः।

मध्यायुगीनकाले मुघलः तथा हिन्दुराष्ट्राणाम्मध्ये  किञ्चिदपि स्नेहसम्बन्धाः नासन् । आक्रमणं युद्धं च एतासां सर्वासां परिस्थितौ  सामान्यजनानां जीवनम् अत्यधिकं कठिनं जातम्। कर्णावती सङ्ग्रामस्य मृत्योः पश्चात् राज्यपदे नियुक्ता। स्वराज्यं सङ्कटे दृष्ट्वा सहाय्यस्य अपेक्षया सा हुमायवे रक्षासूत्रं प्रेषितवती। अतः अन्ते रक्षासूत्रस्य कारणात् हुमायुः तस्यै सहाय्यं कृतवान्। द्वाभ्यां मुघलसम्राटाभ्यां सह युद्धं जातम्। तत्कारणात् हिन्दु -  मुघलसम्बन्धः दृढः जातः। अतः 'स्नेहेन सर्वे वशाः' एतदेव सत्यम्। ' स्नेह ' शब्दः नाम न केवलं प्रेम , आकर्षणम् अपि तु आत्मीयता, संवेदनशीलता तथा च बन्धुभावः। अग्रे ' सर्वे वशाः ' अत्र सूचितस्य सम्बन्धस्य अर्थः न केवलम् आकर्षणम् अपि तु उन्मुखता, वात्सल्यम्, आत्मीयतायाः सम्बन्धाः। सिन्धूताई- सपकाल-महोदया एव तस्य  समर्पकम् उदाहरणम् । रक्षणार्थं नैके बालकाः आक्रन्दन्ति, ते शिक्षणात् वञ्चिताः आसन्। एतेषां कृते सा मातृसमम् उत्तरदायित्वं निर्वहति। तान् आकाशे विहारार्थं प्रेरिता । तेषां बालकानां वशीकरणम् अपि सा स्नेहेन कृतवती। 

यस्याः कारणेन समाजस्य निम्नघटकाः आकाशे उड्डयनं कर्तुं शक्नुवन्ति तथा च साने गुरुजी नाम्ना ख्यातः महोदयः उक्तवान्,  स:एक एव सत्यधर्मः, विश्वाय स्नेहाभावः अर्पणीयः। तत्समानं व्यक्तिमत्वम् अस्ति आमटे - प्रकाशमहोदयस्य । समाजात् बहिष्कृतानाम् आदिवासिबान्धवानां कृते सः दीपस्तम्भः अभवत्। आदिवासिबान्धवानां कृते तस्य कार्यं अतुलनीयम्। तेषां कृते सः करनिर्मुक्तं शिक्षणम्, आरोग्यसुविधाः , व्यापारज्ञानम्, कृषिकार्यं, व्यवहारज्ञानं च स्नेहेन एव आरभत्। आदिवासी प्रभागतः आगता द्रौपदी मुर्मू यदा राष्ट्रपतिपदे नियुक्ता भवति, तदा आमटे -महोदयस्य कार्यपूर्तिः अभवत्, इति अहं मन्ये। तत् कारणात् भारतीयाः तथा आदिवासिबान्धवाः च वशाः।

यदा वयं ' सर्वे ' इति वदामः, तदा तस्य अर्थः मनुष्याः इति एव नास्ति, अपि तु पशवः, प्रकृतिः अपि अस्ति। एतान् सर्वान् अपि स्नेहेन वशीकर्तुं शक्यते। पशवः स्पन्दनं, स्पर्शं च अनुभवितुं समर्थाः। स्नेहपूर्णवर्तनस्य कारणात् ते अपि एकानिष्ठाः अभवन्। तेषां भूतदयां दर्शयित्वा ,  पालनपोषणेन आमटे महोदयः तान् आप्तान् कृतवान्। न केवलं आमटे महोदयः अपि तु महाडतः मेस्त्री  प्रेमसागर- महोदयः। तेषां गरुडसंवर्धनस्य कार्येण न केवलं गरुडान् अपि तु पयर्यावरणस्नेहिनः सः वशं कृतवान् ।

कम् अपि भारतीयं पश्यतु। सः ' वसुधैव कुटुम्बकम् ' इति धारणां मन्यते।  अतो भारतः रशियातः तैलं स्वीकरोति। चीनदेशः, यः रशियादेशस्य शत्रुपक्षः। तेन सह सामञ्जस्य विधेयकं करोति सःभारतः । रशिया - यूक्रेन युद्धे मध्यस्थः भवति। एतद् कारणात् भारतेन सम्पूर्णविश्वं वशीकृत्य सः शान्तिदूतस्य भूमिकां निर्वहति। अतः अहं मन्ये, स्नेहेन सर्वे वशाः। परन्तु  अहं विषयस्य द्वितीयं पक्षम् अपि वक्तुम् इच्छामि। यदि 'स्नेहेन सर्वे वशाः ' इति शक्यं तर्हि कुरुक्षेत्रे युद्धं न जातम् स्यात्। रावणवधस्य कर्तव्यम् एव पुरा न भूतं , कस्या अपि स्त्रीणां शोषणं न जातं स्यात्। न्यायालयं गत्वा  न्यायभिक्षायाः आवश्यकता न समुद्भूता। कौटिल्यः अपि उक्तवान् 'शत्रोः मित्रम्, शत्रुः एव ज्ञातव्यम्, तस्य नाशः करणीयः' । अतः एव अपि सत्यं स्नेहेन सर्वे वशाः?

          यथा संस्कृतसुभाषिते उक्तम् , 

बन्धनानि किल सन्ति बहूनि प्रेमरज्जुमयबन्धनमाहुः । दारुभेदनिपुणोऽपि षडङ्घ्रिः निष्क्रियो भवति पङ्कजकोशे ।।

एतस्य सुभाषितस्याधारेण चिन्त्यते, तर्हि  'स्नेहेन सर्वे वाशाः ' एतद् सत्यमेव।


-तन्वी चितळे

And Then There Was Her: The Queen of Crime

  Around a century and three decades ago, a little girl took up a voracious hobby of reading. Although her mother homeschooled her, the latt...