Sunday, May 17, 2026

वळण

 


किट्ट काळोख पिऊन त्यात सामावलेली एक रात्र. आज चंद्राचा प्रकाश नव्हता. काही क्षणांपूर्वीच मुसळधार पावसाने रस्त्यांचे पाट केले होते. सगळीकडे वीज गेली होती. काही चांदण्या आकाशात लुकलुकत होत्या, पण शहरातल्या माणसांच्या गर्दीला तो उजेड पुरेसा नव्हता. मुसळधार पावसाच्या लाटेनंतर मागे उरलेल्या उन-उन पावसाच्या थेंबांना गाड्या धडकून जात होत्या. त्या गाड्यांच्या प्रकाशात मावेल तेवढाच रस्ता, तेवढीच दुनिया खरी वाटत होती. इतरत्र सारं जग जणू फक्त अंधारच आहे असं वाटत होत. 

अशा काळोखातच ज्योती वर्गातून बाहेर पडली. मोबाईलच्या तुटपुंज्या प्रकाशात वाट शोधत सगळीच मुले कोचिंग क्लास मधून खाली आली अन् अंधारातच आपापल्या रस्त्याने निघून गेली. ज्योतीलाही घरची ओढ होती. तीन दिवस सरावपरीक्षेने सगळ्यांचं जागरण घडवलं होतं. तिने घड्याळात पाहिलं. छोटा काटा बराच वेळ नऊ नि दहाच्या मध्ये घुटमळत होता, परंतु मोठा काटा भरभर धावत सहाला ओलांडून निघाला होता. ज्योतीला वेळ लक्षात येताच ती भरभर चालू लागली. पावसाचं पाणी पिऊन जमीन निसरडी झाली होती, त्यावर घट्ट पाय रोवत ज्योती चालू लागली. बसस्टॉप जवळ येताच तिने वेग कमी केला. आज बससाठी नेहमीसारखी गर्दी नव्हती. ज्योतीला तिच्या घरी पोहोचवणारी ही एकच बस होती, त्यामुळे ही बस चुकवणं तिला चालणारं नव्हतं. ती बस स्टॉप वर पोहोचली, नेहमीप्रमाणे काळे काका तिकडे उभेच होते, त्यांच्याकडे पाहून स्मित हास्य करत ज्योती बसची वाट पाहू लागली. 

रोजच काळे काका आणि ज्योती एकमेकांना या स्टॉपवर बघत होते; परंतु आजवर कधीही त्यांच्यात संवाद झाला नव्हता. नावे तेवढी फक्त कानावर पडली होती. तरीही एक ओळखीच नातं त्यांच्यात त्या क्षणिक हास्याने तयार केलं होतं. काही मिनिटांनंतर बस आली. बसच्या लाईटमुळे बस उघड्या डोळ्यांना दिसत नव्हती, तरीही सगळे घाईघाईने बसमध्ये चढले. ज्योतीही त्यांच्यामागून बसमध्ये चढली. आजचा हा प्रवास तिच्या आयुष्यात काय वळण आणणार होता याची तिला कल्पनाही नसेल. थोडा वेळ थांबून बस निघाली, लोकांनी तिकिटं काढली, ज्योतीनेही तिकीट काढले आणि गाणी ऐकत डोळे बंद करून शांत बसली. बाहेरचा अंधार मनातल्या गुढतेला साजेसा होता. थेंबाथेंबाने पाऊस बरसतच होता, खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याने ज्योतीचा डोळा लागला, तोच लहानगा पाण्याचा थेंब तिच्या चेहऱ्यावर पडताच ती उठली. तिने घड्याळाकडे पाहिले, तर साडेदहा वाजून गेलेले, इतका वेळ कसा झाला याचं तिला आश्चर्य वाटलं. तिने बाहेर पाहिले, आणि तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसेनासा झाला. ती अस्वस्थ झाली, बेचैन झाली. बस एका विचित्र अनोळखी रस्त्यावर चालली होती, नेहमीची दुकानं, घरं काहीच नाही. मघाशी पडलेला अंधार अधिकच गडद झालेला जाणवला. आजूबाजूला पाहता अरुंद रस्ता आणि त्यावर एकाच वेगात चाललेली ती एकटी बस. ज्योतीच्या मनाला हुरहूर लागली. रात्रीची वेळ होती, नेहमीप्रमाणे बसमध्ये गर्दी नव्हती, आणि रस्ता अनोळखी होता. तिने कंडक्टरला शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो दिसला नाही, उलट बसमधील इतर लोकांकडे पाहत ती अधिकच बेचैन होऊ लागली.

सगळे लोक शांत बसलेले होते, कोणीही अस्वस्थ हालचाल करत नव्हतं. खिडकीतून बाहेर पाहणाऱ्या माणसांच्या चेहऱ्यावर देखील कुठलाही अनोळखी भाव नव्हता. ज्योतीचा डोळा लागला त्यावेळी कदाचित बसने काही कारणांनी रस्ता बदलला असेल असं वाटून तिने वाट पाहण्याचे ठरवले. काही क्षण भूतकाळात विलीन झाले. गेला बराच वेळ बसने कोणताही स्टॉप घेतला नव्हता. बसच्या वाढत्या वेगाबरोबर ज्योतीच्या काळजात भीती वाढत चालली होती. तोच अचानक जोरात ब्रेक दाबला गेला. सगळेजण समोरच्या सीटवर आदळले गेले. ज्योतीने मान वरती केली अन् आजुबाजूला पाहिले, तिच्या बैचेनीत आणखीच वाढ झाली. धक्क्यातून सावरत सगळे प्रवासी एका क्षणात परत स्थिर झाले होते. कोणीही जागेवरून उठले नव्हते. ज्योती मात्र आता प्रचंड घाबरली होती, बाहेर पावसाने पुन्हा एकदा जोर धरला होता. बस का थांबली ते पाहायला ती भीती दाबत उठू लागली तेच तिचा हात कोणीतरी धरला. ज्योतीच्या काळजाचा ठोका चुकला. तिने मागे पाहिले, तर काळे काका तिच्या शेजारच्या सीट बसलेले होते, इतका वेळ ज्योतीच्या हे लक्षात कसे आले नाही याच विचाराने तिच्या जीवाचा थरकाप झाला. तिला काही कळायच्या आत काळे काका म्हणाले, " पुढे नको जाऊ, मांजर आडवं आलं होत, गेलं आता..." ते असं म्हणायला आणि बस पुन्हा सुरू व्हायला एकच वेळ होती. ज्योती सीटवर बसली. आता मात्र तिच्या मनातली हुरहूर अधिकच वाढली होती. तिने तिचा फोन उघडला आणि बस नेमकी कोठे आहे ते पहायचा प्रयत्न करत होती, परंतु फोन चालत नव्हता. तिने घरी फोन करायचा प्रयत्न केला, परंतु तेही शक्य झालं नाही.

बाहेर पाऊस अधिकच वाढू लागला. ज्योती बाहेर पाहत होती. अनेक मोठी मोठी झाडे सरसर करत मागे पडत होती. अचानक बस एका स्टॉपवर थांबली. एक म्हातारी बाई बस मध्ये चढली आणि पुन्हा क्षणातच बसने पुन्हा वेग धरला. ती म्हातारीबाई ज्योती जवळ आली, काही क्षण अगदी निरखून दोघींनी एकमेकींना पाहिलं अन् ती मागे जाऊन बसली. ज्योती बाहेर पाहू लागली, पुन्हा एकदा तिच्या काळजात धडकी भरली. तिच्या लक्षात आले की बस एकाच रस्त्यावरून पुन्हा पुन्हा फिरतीये. परंतु बस मधील इतर लोकांच्या जणू हे लक्षातच आले नव्हते. ज्योतीचा मात्र आता धीर सुटत चालला होता, ती कोणाचीही मदत घेऊ शकत नव्हती. धो धो पावसाचा आवाज कानात घुमत होता. इतक्यातच बस मध्ये एक गोंधळ उडाला. ज्योती ने मागे पाहिले अन् ती चकित झाली. मघाशी चढलेल्या म्हाताऱ्या बाई मोठ्यामोठ्याने ओरडत बस थांबवण्यासाठी विनवण्या करू लागली होती. ही बस आपल्याला संकटात घेऊन जात आहे, आपला जीव धोक्यात आहे, असे ती सगळ्यांना सांगत होती. कोणीही तिचं ऐकत नव्हतं, जणू काही तिचं ओरडणं कोणाच्या कानांना स्पर्शच करत नव्हतं. ती बाई तशीच ओरडत ज्योतिकडे आली अन् तिला म्हणाली," तू या बस मध्ये असायला नको होत..." त्या वाक्याने ज्योती चकित झाली. आता मात्र तिच्या मनात कोणतेही विचार येत नव्हते, ती स्तब्ध झाली. तिच्या पुढे ती म्हातारी बाई फक्त दिसत होती, तिचा आवाज मात्र तिला ऐकू येत नव्हता. बाहेर पाऊस सुरू होता, त्याच्याही आवाजाला कानांच्या संवेदनांनी नकार दिला. आत तीही भीतीने इतर माणसांसारखं पुतळ्याप्रमाणे बसून समोर घडत असलेला प्रकार फक्त पाहत होती. ती म्हातारी बाई वैतागून बस मधून उतरण्यासाठी सगळ्यांना विनंती करत होती. ज्योतीलाही मनातून बसमधून बाहेर पडावं असं वाटत होतं. पण हा प्रवास नेमका कुठे चालला आहे ते तिला कळत नव्हतं, तीच शरीर स्थिर होतं, मन अस्थिर होतं, बाहेर पडण्यासाठी धडपडत होतं. इतक्यात एक आवाज झाला, इतका वेळ शांत बसलेले प्रवासी आता उठले, अचानक अस्वस्थ वाटू लागले. बस मध्ये एकच गलका उडाला, सगळ्यांच्या चेहऱ्यावर कमालीचे भय होते. बसचा वेग कमी झाला आणि ज्योती भानावर आली. सगळे प्रवासी खिडकीतून वाकून काहीतरी पाहत होते. बस थांबली आहे हीच उतरण्याची संधी समजून ज्योती उतरण्यासाठी उठली, तिची नजर खिडकीतून बाहेर पडली आणि तीच धपकन खाली बसली. समोरच दृश्य पाहून तिला क्षणभर अंधारी आली...

इतका वेळ उतरण्यासाठी धडपड करणाऱ्या म्हातारीने बसमधून थेट उडी घेतली होती. ती पडताच बस क्षणभर थांबली, आणि पुन्हा वेग धरून पुढे चालू लागली. बस मधून बाहेर पडण्याचा ज्योतीचा निर्धार डगमगला. ती शांत बसून बाहेर बघत होती. बस पुन्हा पुन्हा एकच रस्त्यावरून जात होती, जणू एखाद्या गोष्टीला वेढा घालत होती. ज्योतीने डोळे बंद करून घेतले, तरीही बस मधले दृश्य, तो रस्ता आणि ती म्हातारी तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हती. ती प्रचंड घाबरली होती. शेजारी काळे काका इतका वेळ काहीही बोलले नव्हते, ज्योतीलाही कोणाला काही विचारावे असे वाटत नव्हते. ती शांत बसून राहिली. आता मात्र विचित्र घटनांची साखळीच जणू सुरू झाली होती. ज्योतीला तिच्या घरच्यांचे आवाज ऐकू येऊ लागले, त्या म्हातारीचे शब्द ऐकू येऊ लागले, पावसाचा आवाज कानावर पडू लागला, ती अस्वस्थ होत होती, तिचे मन या प्रसंगाशी लढताना हरले होते तेवढ्यात बस थांबली, आणि सगळे प्रवासी उतरू लागले.

एक बसस्टॉप होता, पूर्णपणे धुळीने माखलेला, सुकलेल्या झाडांची त्याला आरास होती, लुकलुकणारा एक दिवा कुठेतरी कोपऱ्यात जळत होता. ज्योतीने काळे काकांकडे पाहिले, त्यांनी पुन्हा तेच नेहमीचे स्मितहास्य केले. ज्योतीने इशारा समजला आणि ती बसमधून उतरू लागली. पायाखाली कुठे निसरडी फरशी, तर कुठे पाय रुतवणारा चिखल... ज्योती वाट काढत चालू लागली. मागे वळून पाहण्याची तिच्यात हिंमत नव्हती, तरीही तिने मागे काळे काकांकडे पाहिले, परंतु काका तिकडे नव्हते. तिने आजुबाजूला पाहिले, काका कुठेच नव्हते. एका क्षणात ते दिसेनासे झाले. ज्योती आता पळू लागली तेच तिचा पाय निसटला आणि ती पडतच होती की तिचे डोळे उघडले.

मुसळधार पावसाने रस्त्यात झाड पडले होते, तो रस्ता चुकवत दुसऱ्या वाटेने बस नेहमीच्या मार्गाला लागली होती. वीज परत येऊन दिवे पेटले होते, व शहर पुन्हा चमकत होतं. पावसाने वातावरण थंड केले होते. ज्योती मात्र घामाघूम झालेली होती. घड्याळात सव्वा दहा वाजले होते. ज्योतीने खिडकीतून बाहेर पाहिले, तिचा स्टॉप आला होता. विचित्र स्वप्नातून आपली सुटका झाली, आता या बसमधूनही सुटका व्हावी या विचाराने ती लगबगीने उठली. कोणाकडेही न पाहता ती समोर बघत चालण्याचा प्रयत्न करत होती. परंतु तिच्या तिरप्या कटाक्षाने एक चेहरा हेरला. म्हातारी, बस मधून उडी घेणारी म्हातारी शेजारी बसली होती. ज्योती पाहून न पाहिल्यासारखे करत लगबगीने चालू लागली तोच तिची नजर त्या म्हातारीला हेरण्याचा प्रयत्न करू लागली. त्यांच्या हातात काहीतरी होतं... एक फ्रेम, जन्म-मृत्यूची तारीख लिहीलेली फ्रेम‌... आणि त्यावरचा चेहरा तिला ओळखीचा वाटला... ते स्मितहास्य काळे काकांचंच होतं... ती म्हातारी बाई त्या फोटोला कवटाळून शांत बसली होती.


-प्रांजल काटकर

Thursday, May 7, 2026

Tagore: A Man ahead of his Time


Just as he said, it's simple to be happy but difficult to be simple. He has inspired generations through his poems, plays and quotes to spread peace, happiness and wisdom. And we tend to treat him like a monument- a bearded sage carved in stone, meant to be revered but not really engaged with. Dusting off the mythology is when you find a man who was incredibly ahead of his time, Late Nobel Laureate, Shri. Rabindranath Tagore. 

Take a look at how we view education today. We are finally realizing that castigating children in concrete boxes to endlessly memorize textbooks is breaking their intent to ever love what they learn. Tagore figured this issue a century ago. He realised that education is something which should be more of an experience than straightup learning. So he built 'Shantiniketan' because he believed learning should happen in the dirt, under trees, and in rhythm with the actual world. We call it "alternative learning" now; to him, it was just common sense.r

Then there’s his worldview. We live in an era obsessed with drawing hard lines between "us" and "them." Tagore saw the cracks in that mindset early on. He openly criticized the cult of false nationalism, warning that putting the idea of a nation above basic humanity was a deleterious and dreadful attempt to claim power. It was a deeply unpopular opinion then, and frankly, it still is. But as we grew as a nation, Indians relived the cause of 'Vasudhaiva Kutumbakam' because today, we as a country are actively pushing the philosophy of Vasudhaiva Kutumbakam, meaning 'the world is one family' on the global stage.

Even the women he wrote about, like Charulata or Binodini weren't just quiet, obedient props. They were messy, deeply flawed, and fiercely independent. They wrestled with their own desires in a society that heavily preferred them to be invisible.

We celebrate Gurudev as an icon of the past, but his ideas are painfully relevant right now. The truth is, we haven't outgrown Tagore at all. We're honestly still just trying to figure out how to live in the future he already saw.


-Soham Sonar 

Saturday, April 25, 2026

Gamification: Life on Points


Over the past few years, the way we live, learn and work has undergone a fascinating transformation. Earlier, games just used to be played for fun and enjoyment, but today they have started to seep into our everyday life. From learning a language to fitness, games have made their way in every aspect via collecting points, unlocking levels and earning badges. This subtle blending of play with purpose is what we call the ‘Gamification’ of everyday life.

At first glance, it seems harmless and even exciting. Think about how satisfying it feels when an app congratulates you for completing a task or when the progress bar fills up after finishing a lesson. Suddenly, studying or exercising feels less like a chore and more like a challenge. Most of them feel motivated simply because they want to maintain streaks and reach new levels.

This pull comes from how gamification taps into basic human psychology. Humans naturally enjoy competition, rewards, and a sense of achievement. Video games have always used these ideas to keep players engaged, and companies started applying these techniques to everyday tasks, to make them more engaging and enjoyable. Apps like Habitica turns your to-do list into a role-playing game where completing tasks earns experience points.

Yet, as these game-like elements weave deeper into our lives, some questions naturally arise. When every activity becomes a system of rewards and points, are we still doing things for their real value, or just for the virtual prizes? For example, someone might exercise just to keep their streak alive rather than to genuinely care for their health. In some cases, people may even feel pressured or anxious if they break a streak or fail to achieve a goal. 

Building on those concerns is the issue of balance. Gamification can be a powerful tool for motivation, but it should not replace intrinsic motivation, which is the inner desire to learn, grow, and improve. When used wisely, gamification can make boring tasks more engaging and help people build good habits. When overused, it risks turning meaningful activities into a constant race for points and rewards.

Ultimately, this gamification of everything reveals how technology is reshaping our daily behaviour. It can push us to learn new skills, stay active, and manage our time better. But it also reminds us to pause and ask ourselves: Are we playing the game, or is the game playing us? In the end, perhaps the best approach is to enjoy the motivation that gamification provides while remembering that real life isn’t just about points, badges, or streaks. Sometimes the most meaningful achievements are the ones that don’t appear on a scoreboard.

-Apoorva Taru

Saturday, April 11, 2026

ज्योतिबा फुले : अन्यायाविरुद्ध उभा राहिलेला परिवर्तनाचा विचारवंत


 "विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतिविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले; इतके अनर्थ एका अविद्येने केले".

याचा अर्थ होतो की, शिक्षणाशिवाय बुद्धी नष्ट होते, बुद्धीशिवाय नीती नष्ट होते, नीतीशिवाय प्रगती थांबते, प्रगतीशिवाय धन नष्ट होते आणि धनाशिवाय शूद्र नष्ट होतात; इतके अनर्थ फक्त अशिक्षेमुळे होतात.

ज्योतिबा फुले हे १९व्या शतकातील ते नाव आहे ज्यांनी क्रांती घडवली. १९व्या शतकात जेव्हा मुलींना शिक्षण देणे पाप मानले जात होते, त्या काळात ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि आपल्या पत्नीला शिक्षण देऊन त्यांना शिक्षिका बनवले. त्या काळात ही काही सामान्य गोष्ट नव्हती. हे संपूर्ण रूढीवादी आणि ब्राह्मणवादी विचारसरणीविरुद्ध उचललेले ठाम पाऊल होते. यासाठी त्यांना मोठा संघर्ष आणि विरोध सहन करावा लागला, पण त्यांनी हार मानली नाही आणि त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले.

लहानपणापासूनच महात्मा ज्योतिबा फुलेंनी जातिवाद आणि भेदभाव अनुभवला होता. ते थॉमस पेनच्या "राइट्स ऑफ मॅन" या पुस्तकाने प्रेरित झाले होते, ज्यामध्ये पेन यांनी लिहिले होते की सर्व माणसं जन्मतः समान असतात. प्रत्येक माणसाला स्वतःचे "नैसर्गिक हक्क" असतात, ते कोणतीही सत्ता हिरावून घेऊ शकत नाही. या पुस्तकाने फुले अधिक संवेदनशील झाले. भारतात जेव्हा ब्रिटिश राजवट होती, तेव्हा फुलेंनी तत्कालीन व्हाइसरॉय लॉर्ड रिपन यांना पत्र लिहून मागणी केली होती की कर (टॅक्स) चा ५०% हिस्सा शिक्षणावर खर्च करावा.

फुले जातिवादाचे कट्टर विरोधक होते. वर्ष होते १८६८. शूद्र–अतिशूद्रांना सार्वजनिक तलाव आणि विहिरीतून पाणीही घेऊ दिले जात नव्हते. त्या वेळी फुलेंनी आपल्या घरातील विहीर सर्वांसाठी खुली केली. फुलेंच ठाम मत होते की पाण्यावर सर्वांचा हक्क आहे आणि ही विहीर तुम्हाला आजही पाहायला मिळेल, त्यांच्या पुण्यातील घरात, ज्याला "फुले वाडा" म्हणून ओळखले जाते.

ज्योतिबा फुले यांचे प्रसिद्ध पुस्तक "गुलामगिरी" यात त्यांनी अस्पृश्यता, जातिप्रथा, वर्णव्यवस्था आणि शूद्र–अतिशूद्रांचा इतिहास व त्यांच्या शोषणाबद्दल लिहिले. फुले यांनी केवळ सामाजिकच नाही तर आर्थिक प्रश्नांवरही आवाज उठवला. "शेतकऱ्यांचा आसूड" हे पुस्तक लिहून त्यांनी शेतकऱ्यांच्या शोषणावर आपले विचार स्पष्ट केले आणि ब्रिटिश धोरणांवर प्रश्न उपस्थित केले. बडोद्याचे महाराज श्री. सयाजीराव गायकवाड यांनी ज्योतिबा फुले यांच्या "शेतकऱ्यांचा आसूड" या पुस्तकाचे ऐकून त्यांच्या विचारांची प्रशंसा ही केली.

फुले हे इतिहासाचे अभ्यासक आणि विचारवंत होते. त्यांनी १८६९ मध्ये रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची उपेक्षित समाधी शोधून काढली. याचबरोबर त्यांनी शिवाजी महाराजांवर पोवाडा ही लिहिला आणि तो लोकांपर्यंत पोहोचवला. त्या काळात शिवाजी महाराजांची प्रतिमा लोकांमध्ये धूसर होत चालली होती, तेव्हा फुलेंनी त्या प्रतिमेस पुन्हा जनतेसमोर उभे केले.

१९व्या शतकात परंपरागत आणि रूढीवादी मानसिकता समाजावर इतकी प्रभावी होती की, ज्या स्त्रीच्या पतीचा मृत्यू होत असे, तिला पुन्हा विवाह करण्याची परवानगी नव्हती आणि तिचा सामाजिक बहिष्कार केला जात होता. अशा वेळी फुले यांनी विधवा पुनर्विवाहाला समर्थन दिले. त्या काळात फुलेंच हे पाऊल रूढीवादी मानसिकता आणि परंपरागत चालत आलेल्या व्यवस्थेला मोठे आव्हान देणारे होते, याच काळात फुले यांनी १८७३ साली पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या समाजाचा मुख्य उद्देश होता सत्याचा शोध घेणारा समाज निर्माण करणे, जो समाजातील रूढीवादी परंपरांवर तर्काच्या आधारावर प्रश्न उपस्थित करेल, जातिव्यवस्थेला आव्हान देईल आणि समाजातील शोषणाविरुद्ध आवाज उठवेल. सत्यशोधक समाज घडवून फुलेंना विज्ञानवादी दृष्टिकोन समाजात पेरायचा होता. त्या काळात पूजा-पाठ आणि लग्नासारख्या संस्कारांवर पंडित–पुजार्‍यांचे पूर्णपणे वर्चस्व होते. त्यांच्या शिवाय हे कार्य पूर्ण होत नव्हते आणि दक्षिणेच्या नावाखाली लूट चालत होती. विशेषतः खालच्या जातीतल्या लोकांसाठी पंडित–पुजार्‍यांकडून लग्न करणे फार कठीण होते. फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून साध्या-सरळ पद्धतीने, पंडित–पुजार्‍यांशिवाय विवाह करण्याची प्रथा सुरू केली. या माध्यमातून त्यांनी सामाजिक बदल घडवून आणला.

ज्योतिबा फुले यांचे सामाजिक जीवन जितके कठीण होते तितकेच त्यांचे वैयक्तिक जीवनही कठीण होते. जेव्हा त्यांनी मुलींना शिक्षण देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्याला विरोध केला आणि त्यांना घराबाहेर काढले. अनेक अडचणींवर मात करून फुलेंनी आपले कार्य सुरू ठेवले. त्यांचे कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. फुलेंनी सामाजिक रूढीवादी परंपरांना तर्काच्या आधारावर आव्हान दिले. फुले कधीही कोणत्याही समुदाय किंवा जातिविरुद्ध नव्हते, तर ते त्या विचारसरणीविरुद्ध होते ज्याने समाजावर शतकानुशतके अन्याय केला, आपले वर्चस्व आणि नियंत्रण ठेवले. आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत, स्वतंत्र आहेत आणि सामाजिक दबावाशिवाय आपले जीवन जगत आहेत, तर ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वांमुळेच ते शक्य झाले आहे. महात्मा फुले आणि सावित्रीमाई त्या प्रत्येक मुलीचा आवाज आहेत, जिच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते, जिच्यावर आजही समाजाकडून अन्याय आणि भेदभाव केला जातो.

त्या काळात पुरुषसत्ताक मानसिकता समाजावर प्रचंड प्रभावी होती. स्त्रियांना कमी समजणे आणि धर्माच्या नावाखाली स्त्रियांना एका मर्यादित चौकटीतच राहायला भाग पाडले जात होते. अशा परिस्थितीत ज्योतिबा फुलेंनी आपल्या पत्नीला शिक्षण दिले आणि शिक्षिका बनवले. ही गोष्ट फुलेंना त्या काळातील इतर पुरुषांपासून वेगळी ठरवते, कारण ते फक्त या पुरुषसत्ताक विचारसरणीला मान्य करणारे नव्हते, तर त्यांनी आपल्या कृतीतूनच त्या विचारांना छेद दिला. आपल्या घरातील विहीर शूद्र–अतिशूद्रांसाठी खुली करणे, यावरूनच फुले किती मानवतावादी आणि संवेदनशील होते हे दिसून येते.

११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांची २०० वी जयंती आहे. खरं सांगायचं तर ही फक्त एक तारीख वाटत नाही, तर एक आठवण करून देणारा दिवस वाटतो की आजही या देशात समानता आणि शिक्षणाबद्दल बोललं जातं, पण अजूनही आपण खूप मागे आहोत आणि बरंच काही बदलणं बाकी आहे. फुले यांनी ज्या समाजाचं स्वप्न पाहिलं होतं, ते आजही अपूर्ण आहे....

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दीत पदार्पण करतांना त्यांना विनम्र अभिवादन.


-आर्यन पालके

वळण

  किट्ट काळोख पिऊन त्यात सामावलेली एक रात्र. आज चंद्राचा प्रकाश नव्हता. काही क्षणांपूर्वीच मुसळधार पावसाने रस्त्यांचे पाट केले होते. सगळीकडे...