वादसभा । Vaadasabha
Sunday, August 9, 2026
रंगभूमीच्या पहाटेचे किमयागार: विष्णुदास भावे
Wednesday, July 15, 2026
कवी कालिदास : चिरंतन साहित्याप्रवाह
"आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श॥"
आषाढाचा पहिला दिवस. नभात काळेभोर मेघ दाटून आले आहेत. डोंगर-शिखरांना बिलगून बसलेले ते मेघ जणू एखाद्या खेळकर हत्तीने पर्वताला कवेत घेतल्याचा भास निर्माण करतात. विरहाने व्याकूळ झालेला यक्ष त्या मेघाकडे पाहतो आणि त्याच्या मनात आशेची एक नवी पालवी फुटते. तो त्या मेघालाच आपल्या प्रेयसीचा दूत बनवतो. केवळ दोन ओळी... पण डोळ्यांसमोर उभं राहतं एक जिवंत चित्र!
हीच महाकवी कालिदासांची जादू. ते फक्त निसर्गाचं वर्णन करत नाहीत, तर ते निसर्गाला बोलतं करतात. ते फक्त उपमा देत नाहीत, तर उपमांनाच अमरत्व देतात. त्यांच्या शब्दांतून ऋतू जिवंत होतात, पर्वत श्वास घेतात, नद्या गातात आणि मेघही दूत बनतात. म्हणूनच संस्कृत साहित्यातील प्रत्येक रसिकाच्या मनात कालिदासांचं स्थान आजही अढळ आहे.
याच कारणामुळे आषाढ शुद्ध प्रतिपदा हा दिवस केवळ पावसाच्या आगमनाचा नाही; तर तो भारतीय साहित्यविश्वातील या अमर प्रतिभेला अभिवादन करण्याचा दिवस आहे. म्हणूनच हा दिवस 'कालिदास दिन' म्हणून साजरा केला जातो.
कालिदासांच्या जीवनाची कथा म्हणजे अंधाराकडून तेजाकडे झालेला प्रवास. त्यांच्या जन्मकाळाबद्दल इतिहासकारांची वेगवेगळी मतं असली, तरी त्यांच्या प्रतिभेच्या तेजावर कोणाचाही मतभेद नाही. आख्यायिकेनुसार, लहानपणीच आई-वडिलांचं छत्र हरपल्यामुळे एका गवळ्याने त्यांचं पालनपोषण केलं. शिक्षणाची संधी न मिळाल्याने ते अशिक्षित राहिले. समाज त्यांच्याकडे बुद्धिहीन तरुण म्हणून पाहत होता. पण कधी कधी नियती आपल्या महान कलाकृतीची सुरुवात अगदी साध्या रेषेपासून करते. कालिदासांचं आयुष्यही असंच घडत गेलं.
कालिदासांचं साहित्य वाचताना जाणवतं की, ते केवळ कवी नव्हते; ते मानवी भावनांचे सूक्ष्म निरीक्षक होते. प्रेम, विरह, आनंद, करुणा, आशा, ऋतूंचे बदल, निसर्गाची लय या सगळ्यांना त्यांनी शब्दांत असं गुंफलं की, प्रत्येक वाचकाला त्यात स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. त्यांच्या लेखनाची सर्वात मोठी ताकद म्हणजे चित्रमयता. वाचकाला एखादा श्लोक वाचताना तो केवळ वाचल्यासारखा नाही, तर अनुभवल्यासारखा वाटतो.
त्यांच्या उपमा इतक्या प्रभावी आहेत की, संस्कृत साहित्यात आजही एक म्हण प्रचलित आहे, "उपमा कालिदासस्य", म्हणजेच उपमेचा विषय निघाला की, कालिदासांचीच आठवण होते.
त्यांच्या लेखणीतून हिमालय हा केवळ पर्वत राहत नाही; तर तो पृथ्वीचा मुकुट बनतो. मेघ हा फक्त पावसाळी ढग राहत नाही; तर विरही हृदयाचा सखा बनतो. शकुंतला ही केवळ नायिका राहत नाही; तर निरागस प्रेमाचं प्रतीक बनते. यामुळेच त्यांच्या साहित्याचा प्रभाव केवळ भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही.
अभिज्ञानशाकुन्तलम् या नाटकाने युरोपातील विद्वानांनाही मंत्रमुग्ध केलं. अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले आणि जगभरातील साहित्यप्रेमींनी कालिदासांच्या प्रतिभेला वंदन केलं.
आजही कालिदासांचं साहित्य वाचताना आश्चर्य वाटतं. दोन हजार वर्षांपूर्वी लिहिलेले शब्द आजही इतके ताजे कसे वाटतात? याचं उत्तर त्यांच्या शैलीत दडलेलं आहे. त्यांनी निसर्गाला मानवी भावना दिल्या आणि मानवी भावनांना निसर्गाचं सौंदर्य. त्यामुळे त्यांच्या कविता केवळ वाचल्या जात नाहीत, तर त्या जगल्या जातात. म्हणूनच त्यांना 'उपमा सम्राट', 'कविकुलगुरू' अशा उपाधींनी गौरवण्यात आलं. त्यांच्या स्मरणार्थ मध्य प्रदेश शासनाचा 'कालिदास सन्मान' हा देशातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आजही दिला जातो.
आषाढातील पहिला मेघ जेव्हा आकाशात दाटून येतो, तेव्हा तो फक्त पावसाची चाहूल देत नाही; तर तो आपल्याला आठवण करून देतो त्या कवीची, ज्याने मेघालाच दूत बनवलं, ऋतूंना कविता बनवलं आणि शब्दांना चिरंतन सौंदर्य बहाल केलं. महाकवी कालिदास, ज्यांनी संस्कृत साहित्याला केवळ समृद्ध केलं नाही, तर वाचकांना जगाकडे पाहण्याची एक नवी, अधिक सुंदर दृष्टी दिली.
या महाकवीला विनम्र अभिवादन आणि कालिदास दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
- वेदिका काण्णव
Sunday, June 14, 2026
११० वर्षे, विचारांना व्यासपीठ देत
प्रिय वादसभा,
सप्रेम नमस्कार.
पत्रास कारण की, १९१६ पासून ते आजपर्यंत, "वादसभा" ही केवळ एक संस्था नाही तर एक वारसा आहे. अनेक विद्यार्थी आले, अनेक विचारधारा आल्या तरी तुझ्यातला नवखेपणा आणि तरीही सोबत असलेली परंपरा, तू कायम जपत आली आहेस. आजकालच्या जगात "तुम्ही कसे टिकून आहात" हा प्रश्न नेहमी केला जातो, पण तू तितक्याच जोमाने टिकूनच नाही तर सक्रिय सुद्धा आहेस. वादसभा ही कायमच प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी कार्यरत ठेवलेली संस्था आहे. इथल्या सर्व प्रमुख कार्यांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असतो, त्यामुळे तू एक संस्था म्हणून निराळी आणि विद्यार्थ्यांना आकर्षक अशी आहेस. अगदी स्वातंत्र्यपूर्वीच्या काळापासून ते आत्ताच्या नव्या शतकापर्यंत, तू सर्वांना सामावून घेऊन सर्व सदस्यांना माळेतल्या मोत्यांप्रमाणे एकमेकांशी जोडतेस.
इथे येणाऱ्या प्रत्येक नवीन सदस्याला असंच वाटतं की आपल्यातल्या काही कौशल्यांना इथे वाव मिळेल. पण तेवढेच नसून, तू प्रत्येक सदस्य हा माणूस म्हणून घडवतेस. इथे आम्ही स्पर्धा, कार्यक्रम, कार्यशाळा हे सगळं अनुभवतो.
एखादी नदी ही प्रवाही असेल तरच ती मातीला अधिक सुपीक बनवते. तसंच तू प्रत्येक सदस्याला तुझ्यासारखेच प्रवाही रहायला शिकवतेस. सतत काहीतरी नाविण्यपूर्ण करण्याच्या प्रेरणेमुळे आम्ही सर्व सदस्य आमच्याच भोवती आखलेलं रिंगण मोडून आकाशात झेप घेऊ शकतो. आणि असं काही करण्याच्या प्रयत्नात मदतीसाठी अनेक हात पुढे येतात ते तुझ्याच आजी आणि माजी सदस्यांचे. अगदी प्रोत्साहन देण्यापासून ते अपयशी झाल्यावर आधार देणारे, आणि आपल्यासाठी खणखणीत टाळ्या वाजवण्यापर्यंत सगळेच एकमेकांना सामावून घेतात. इथे बक्षीस मिळवणं महत्त्वाचं नसून सहभाग घेणं आणि काहीतरी नवीन करत राहणं, ह्यातच कौतुकाची एक थाप मिळते.
परंतु तू जशी कोमलपणे आपल्या सदस्यांना सांभाळून घेतेस तसंच वेळ पडल्यावर त्यांना जबाबदारीची जाणीव ही करून देतेस. आपल्यावर असलेला विश्वास, जबाबदारी ही फार महत्वाची गोष्ट असते ह्याची जाणीव आम्हा सर्वांना वेळोवेळी करून देतेस. त्याचबरोबर आपली जबाबदारी पार पडली की इतरांना मदत करण्याचे गुण तूच आमच्यात पेरले आहेत. आपल्याला मिळणाऱ्या प्रत्येक यशामागे अनेकांचे अमूल्य योगदान असते, तेव्हा प्रत्येक छोटे-मोठे काम ह्याला महत्त्व देण्याचा धडा आम्हाला मिळतो. Canva, एडिटिंग, social media सारख्या कार्यशाळांमधून आम्ही जगासाठीही तयार होतो.
कै. डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धा म्हणजे एक पर्वणीच असते. ही स्पर्धा दोन दिवसांसाठी भरत असली तरी त्यामागे अनेक महिन्यांची तयारी असते. स्पर्धेचे विषय हे आम्ही सदस्यच ठरवतो हे ऐकून मला आधी तर विश्वास बसला नव्हता. परंतु ती संपूर्ण प्रक्रिया अत्यंत कठीण आणि विचारांना चालना देणारी असते.
आज आम्ही जगाशी एकरूप होऊन आपल्या अवतीभोवती काय चालले आहे हे उघडपणे बघू शकतो, तसेच त्यावर आपले मत मांडू शकतो. एखाद्या विषयावर आपले मत घडवणे आणि ते मांडणे किती अवघड असते ह्याचे प्रात्यक्षिक आम्हाला तुझ्यामुळे कळते. परंतु तरीही मत मांडण्याचा आणि समोरच्याचे मत ऐकून त्याचा आदर करण्याचा मूलभूत भाव आमच्यात वेळोवेळी रुजवलास. ह्या शिकवणींमुळे तू आमच्या सर्वांमधला माणूस निर्माण करण्याचं काम अगदी चोख करत आली आहेस.
दरवर्षी तुझ्या प्रांगणात अनेक विद्यार्थी येतात आणि सोबत अनेक गोष्टींचं गाठोडे घेत निरोप घेतात. आम्हा सर्व सदस्यांना तू एका वटवृक्षासारखी सावली देतेस. आम्हाला एक टीम म्हणून एकमेकांचा आदर करायला, सामावून घ्यायला, एकमेकांना मदत करायला, तेवढ्याच हक्काने मदत मागायला, आणि सर्वांना घेऊन पुढे जाणे हे आम्हाला शिकवलेस. त्यामुळे आम्हाला लाभलेली टीम ही फक्त टीम न उरता एक कुटुंब बनते.
मला वाटते की तू एक संस्था म्हणून तुझ्या प्रत्येक सदस्याला प्रश्न विचारण्याचे धैर्य, सत्याचा शोध घेण्याची जिज्ञासा आणि मतभिन्नतेचा आदर करायला शिकवतेस. ह्याच तिन्हीमधून "वाद" जन्माला येतो. परंतु "वादे वादे जायते तत्त्वबोधः" ह्या तुझ्या ब्रीदवाक्यातून हेही शिकवतेस की ह्या वादातले तत्व नाहीसे झाले की तो वाद परिपूर्ण राहत नाही. कदाचित म्हणूनच आजही तू चिरंतन टिकून आहेस, कारण वादसभा माणसाच्या विचारस्वातंत्र्याला, प्रश्न विचारण्याच्या वृत्तीला आणि संवादाच्या संस्कृतीला सतत बळ देते आणि हाच तुझ्या कालातीत अस्तित्वाचा खरा पाया आहे. ह्यामुळेच आम्ही सर्व तुझ्याप्रती, तू दिलेल्या संस्कारांप्रती, कायम कृतज्ञ आहोत.
वादसभेचे हे वटवृक्ष असेच बहरत राहो हीच आम्हा सर्वांची इच्छा.
तुझीच सदस्या,
चैत्राली तुळजापुरकर
Friday, June 12, 2026
A Refuge of Ink and Hope
“Think of all the beauty still left around you and be happy”. These words were not written by a celebrated philosopher or a renowned thinker, but by an ordinary teenage girl trying to go about her life unnoticed by the Nazis. 1942 Germany was gripped by the turmoil of World War II, but this young girl had a deeper understanding of these extraordinary circumstances than most of us do in the modern era, even when the world is just one click away. Long before journaling gained popularity as an internet sensation for mental health, a young girl confided her innermost feelings in a diary, using it as a refuge to calm the raging storm in her head. It was from this silence and ink that ‘The Diary of a Young Girl’ was born, and that teenage girl was Anne Frank, who turned her thirteenth birthday gift from her father into something that would be remembered for generations to come.
The facts about World War II are easily available through official reports and documents, but Anne's writings offered a poignant portrayal of the experience of living in perpetual anxiety and being deprived of one's freedom. Anne Frank lost her life at the tender age of 15 at a concentration camp, but her writings became immortal in history as she drew attention to the cruelty of the Nazi policies and their strain on ordinary individuals, particularly Jews, with each passing day. Her journal provides a deeper understanding of the psychological and emotional repercussions of war than any textbook ever could. Through her writings, Anne gave a human face to World War II, reminding us that history is not just about facts but also about individual lives and aspirations.
Maintaining a diary in today’s world seems like a lost art, wherein tweets, reels, and stories rule the day, but Anne’s diary began as a private expression of her thoughts. She candidly described her life, her family, her companions, and their situation. It was at this point that she began to recognise her ambition to become a writer. Honouring his daughter’s wish to become an author, her father, Otto Frank, compiled and published her diary. Despite her world being restricted to four walls, her words pierced through them and have now been translated into over 70 languages.
Anne Frank stands as a witness to the ramifications of staying silent and the urgency of speaking up against injustice in a society where animosity still persists. Despite her brief life, her impact on the world endures eternally. She reminds us that our narratives and words matter, even amidst the most adverse situations, optimism can prevail. While living in the shadows, she left behind a light that we continue to see. The tragic story of Anne Frank is not merely about history; it also speaks about the potential of literary works to convey profound ideas. As she put it, “I can shake off everything as I write; my sorrows disappear, my courage is reborn”. Until then, may her diary continue to whisper the strength of a young girl who dared to dream.
Yours truly,
Just another young girl.
-Anaya Ramtirth
Thursday, May 28, 2026
स्वातंत्र्यवीर सावरकर : कलम और क्रांति के पुरोधा
भारत की स्वतंत्रता में अनेक वीरों ने अपना लहू अर्पण किया है। आज, हमारे वीरों की अमर साँसों से ही हमारे भारत देश का झंडा गर्व से लहरा रहा है। इन्हीं में से एक महारथी भारत माँ के लिए अपना प्रेम दर्शाने हेतु, वह लिखते है -
*तुजसाठी जनन ते मरण,*
*तुजविण जनन ते मरण |*
*तुज सकल चराचर शरण*
*स्वतंत्रते भगवती ||*
यह महानुभाव इन चंद पंक्तियों में देशभक्त के जीवन का सार बताते है। वह भारत माता को संबोधन करते हुए यह कहते हैं कि भारत माँ के लिए मरना, अर्थात् हमेशा के लिए अमर हो जाना है। इस महाकवि ने भारत भूमि की स्वतंत्रता के लिए अपने विचारों से भारतवासियों को जागृत किया। ऐसे महान विचारों के स्वामी थे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जी।
आज से १४३ साल पहले भागूर गाँव में एक मध्यमवर्गीय मराठी परिवार में सावरकरजी का जन्म हुआ। विनायक सावरकर से ‘स्वतंत्र्यवीर सावरकर’ तक का उनका प्रवास यहाँ से शुरू हुआ था, तथा इस प्रवास में उनके मार्गदर्शक बने उनके पिता, दामोदर सावरकर जी। सावरकर जी की माता, राधाबाई सावरकर का सावरकर जी के जन्म के ९ साल बाद ही कॉलेरा महामारी के कारण देहावसान हो गया। राधाबाई की मृत्यु के उपरांत दामोदर पंत ने ही उनके ४ बच्चों की परवरिश करने की ज़िम्मेदारी उठाई। दामोदर पंत स्वयं वेद, उपनिषद के ज्ञाता थे, और उससे बढ़कर एक देशभक्त थे। अपने बच्चों में देशभक्ति और हिंदुस्तान के प्रति प्रेम एवं स्नेह का भाव जागृत करने में उनका महत्वपूर्ण योगदान था। उनका सपना था कि आगे चलकर उनके बच्चे देश की सेवा हेतु कुछ अच्छा कार्य करें। इसीलिए बचपन से ही उनमें जोश, निडरता, धैर्य तथा सुविचार के बीज बोने के लिए उन्होंने उन्हें महाभारत तथा रामायण के पाठ पढ़ाए। इसके साथ उन्होंने छत्रपति शिवाजी महाराज की शौर्यगाथाएँ भी सुनाई ताकि बच्चों के मन में देशप्रेम पले और आज़ादी की चिंगारी प्रज्वलित हो उठे। स्वतंत्र्यवीर सावरकर जी के बालपन पर इस सबका अच्छा प्रभाव पड़ा और तभी से उनके मन में स्वतंत्रता का भाव जाग उठा।
जन्म से ही सावरकर जी को काव्यलेखन करने की एक अगम्य सौगात मिली थी। समाज में जागृति फैलाने के लिए उन्होंने कलम को ही अपना शस्त्र बना दिया। ११ वर्ष की आयु तक उनकी देशभक्ति पर कविताएँ कई अखबारों में प्रकाशित होने लगी। यहीं से उनकी ध्येय प्राप्ति का संघर्षमय समय आरंभ हुआ। जब वह विद्यालय में गए, तब उनकी इस देशभक्ति की विचारधारा से उन्होंने उनके सहपाठीयो को भी प्रभावित कर दिया। १८९५ के आस-पास राम मंदिर और बाबरी मस्जिद को लेकर दंगे हुए, इस दौरान हिंदुओं पर अन्याय हुआ, इससे बेचैन होकर १२-१३ वर्ष के युवा वीर सावरकर जी ने अपने साथियों के साथ इन अत्याचारों का विरोध किया। प्रसिद्ध लेखक विक्रम संपत द्वारा सावरकर जी पर लिखित चरित्र ‘सावरकर’ इस पुस्तक में भी इस घटना का प्रमाण मिलता है। १८९७ में चापेकर बंधू को डब्ल्यू. रैंड की हत्या करने के कारण फाँसी की सज़ा सुनाई गई, यह सुन युवा वीर सावरकर जी ने प्रतिज्ञा ली कि इस सज़ा का बदला लेने के लिए वह खुद अंग्रेज़ो का डटकर सामना करेंगे और उन्हें घुटने टेकने पर मजबूर करेंगे।
महाविद्यालय में शिक्षण लेने के कारण सावरकर जी ने १९०२ में पूना के नामवंत महाविद्यालय फ़र्गसन कॉलेज में दाखिला लिया। वहीं उन्होंने एक गुप्त संगठन बनाया, जिसे उन्होंने ‘मित्र मेळा’ नाम दिया, जिसे बाद में ‘अभिनव भारत सोसायटी’ से जाना गया। ७ अगस्त १९०५ में कलकत्ता में छिड़े स्वदेशी आंदोलन को उत्तेजना देने के लिए पूना में दशहरा के समय रावण दहन के साथ विदेशी वस्त्रों का भी दहन किया गया। अभिनव भारत सोसायटी में उन्होंने अंग्रेजों के विरुद्ध शस्त्रों की तस्करी में महत्वपूर्ण भूमिका निभाई। इसके साथ ही, उन्होंने १८५७ के स्वतंत्रता संग्राम को ‘Sepoy Mutiny’ कहे जाने का खुलकर विरोध किया। ‘इंडिया हाऊस इन लन्दन’ में शिक्षा ग्रहण करते समय वह भारतीयों को अंग्रेजों के खिलाफ जागरूक और संगठित करने का कार्य भी करते रहे। इन सभी गतिविधियों के कारण अंग्रेज़ सरकार ने उन्हें कारावास की सज़ा सुनाई। ८ जुलाई १९१० में जब उन्हें ब्रिटिश जेल से मार्सेल, जहाज़ से भेजा गया तब उन्होंने जहाज़ के शौचालय में से स्वयं को मुक्त किया, किंतु उन्हें फ्रांस में पकड़ा गया। इसी वजह से उन्हें काला पानी की सज़ा सुनाई गई। सावरकर जी पर वहाँ बहुत अत्याचार किए गए। उन्हें मारा गया, खाने - पीने से वंचित रखा गया, किंतु अपने देश के लिए उन्होंने यह सब सहा। जेल की दीवारों पर सुंदर काव्य तथा गद्य की रचना कर भारत माता के प्रति अपने प्रेम को दर्शाया। ‘माझी जन्मठेप’ यह आत्मचरित्र, ‘सागरा प्राण तळमळला’ यह गीत एवं ‘The Indian War of Independence, 1857’ यह राष्ट्रवादी लेख, आदि का लेखन जेल में किए। इस लेखन दौरान उन्होंने अपना छद्म नाम ‘चित्रगुप्त’ रखा, ताकि अंग्रेज़ो को उनके इस लेखन की भनक न लगे। १० वर्षों तक वहाँ रहने के बाद उन्हें रत्नागिरी जेल में भेजा गया। १९२४ में उन्हें जेल से रिहा किया गया, लेकिन उन पर अधिकारियों की निगरानी थी। इसी दौरान सावरकर जी ने भारतवासियों में मतभेद की भावना मिटाने का निश्चय कीया।
१९३१ में रत्नागिरी में पतित पावन मंदिर की स्थापना हुई, परंतु मंदिर में अछूतों का प्रवेश निषेध माना गया। इस जातिभेद के खिलाफ सावरकर जी ने आवज़ उठाई। उन्होंने पंडितों तथा समाज में जातिभेद की संकीर्ण सोच का विरोध किया तथा सभी वर्गों और जातियों के लोगों के लिए मंदिर के द्वार खुलवाकर सामाजिक समानता का संदेश दिया। यह भारत का पहला मंदिर था जो दलित, लोहार, सोनार, आदि सब जाती के लोगों के लिए खुला था। स्वयं को देश की सेवा में समर्पित करने के बाद, १ फरवरी १९६६ में सावरकर जी ने अन्न - जल का त्याग किया और आत्मार्पण के मार्ग को स्वीकारा। हमारे भारत देश के इस स्वातंत्र्यवीर को उनके जन्मदिवस पर शत-शत नमन।
-आर्यन पाध्ये
रंगभूमीच्या पहाटेचे किमयागार: विष्णुदास भावे
आपले स्वप्न, रंगभूमीवर साकार करण्याची जिद्द बाळगतो; तो एक किमयागार! एक मोठे ध्येय रंगीत पडद्यावर साकार होण्याच्या आधी ते रुजले जाते त्या क...
-
दरवेळी युद्ध सुरू होतं तेव्हा एकच भाषा ऐकू येते, “ही शेवटची लढाई आहे.” सुरक्षेसाठी. सन्मानासाठी. सीमांसाठी. अस्तित्वासाठी. पण मग वर्षे जातात...
-
माझी मराठी माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई l तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई ll फक्त मराठी नाही! तर जी आपली मातृभाष...
-
रक्ताच्या नात्यांमध्ये ईर्ष्या, अहंकार, अभिमान-दुराभिमान, अट्टाहास, मानापमान, ह्या सगळ्या गोष्टी आडव्या आल्या आणि रक्ताचं नातं बाजूला सारू...



