Showing posts with label injustice. Show all posts
Showing posts with label injustice. Show all posts

Wednesday, May 21, 2025

Anti-Terrorism Day


What a coincidence, right? When our country is doing everything in order to fight terrorism, we are setting an example of what 21st May Anti-Terrorism Day is commemorated for. This day in history was chosen in remembrance of our former Prime Minister Shri Rajiv Gandhi. He was assassinated with 14 other people on a plane by a suicide bomber who allegedly belonged to Srilanka based Terror organization in Sriperumbudur, near Chennai, on 21st May 1991. This day thereafter serves the purpose to raise awareness about the evils of terrorism and violence and promote peace and unity.


History is the witness to the catastrophic and morbid loss of lives of innocent people and, not to be forgotten, lives of our unsung brave soldiers. Terrorism isn’t a new chapter in the lives of people; it thrived through time. Nevertheless of advanced tech, advanced communication, or the internet, it thrived nevertheless. The history of terrorism in India dates back to 8 June 1980, with the Mandai Massacre in Tripura, which resulted in the killing of around 500 people. More recently, the Pahalgam Attack on 22nd April 2025 claimed 26 lives. Its consequences were visible to all. Terrorism has never done any good for a nation. A country’s strength lies in its ability to resolve conflicts through peace and integrity. Terrorism divides people; it takes away the most precious treasure of the country, which is “its youth”. In most cases the people involved in terrorism are young people, who are brainwashed by a few masterminds sitting at the top of the hierarchical pyramid. These leaders rarely sacrifice themselves; instead, they manipulate the naive to carry out their plans. The masterminds behind these heinous crimes have only one propaganda, and that is to influence the government or an international governmental organisation or to intimidate the public. Their only goal is manipulation, and in order to do so, they need manpower, and hence, they target the youth and convince them into committing crimes in the name of religion or duty.

Terrorism happens due to very minute things but results in devastating aftereffects. To begin with, the very cause of it is religious ideologies where one community thinks it is superior to the other. Social or economic inequalities, such as poverty , unemployment or lack of education, can push people to take extreme steps; Past psychological trauma in a person’s life, where a person thinks of taking revenge, to state an example from the past – the Pulwama attack, the perpetrator Adil Ahmad Dar joined the terrorist group to take revenge on the Indian Army because of an incident that took place in his life; State-sponsored terrorism also results in terrorism, where the government itself supports the terrorist groups and funds them to accomplish their strategic or geopolitical goals.

Regardless of how big the problem is, it can be solved. The first and foremost step towards cutting the roots of terrorism is by finding the roots and not clinging on to the branches of the tree. Addressing the root causes will help eradicate the problem; spreading awareness by strengthening education will help fight radical ideologies; improving economic opportunities so that nobody has to turn towards malpractices in lack of money and other resources; and strengthening the security and intelligence of the nation to prevent and respond to possible attacks.Concluding with what former President of the US, Mr Barack Obama, and spiritual leader of Tibetan Buddhism Dalai Lama, stated,

“Terrorism is a global problem that requires a global solution, and it is not a fight between religions or cultures. It is a fight between humanity and inhumanity."

For the sake of mankind, this evil has to be eradicated from its roots, or else the holy motherland will turn red.


-Nandini Dirsinala

Tuesday, April 15, 2025

जगणं, जपणं आणि जिणं-कला

मानवाला खरं तर जिवंत राहण्यासाठी अन्न, पाणी आणि प्राणवायू एवढ्याच गोष्टी पुरेशा होत्या; पण तरीही प्राचीन गुहाचित्रांचे अवशेष आणि शिल्पकलेचे नमुने आजही सापडतात. म्हणजेच प्राचीन काळात ‘कला’ ही विरंगुळा होती. मानवाच्या उत्क्रांतीसोबत कलेचं महत्त्व वाढत गेलं. मनातील गुंतागुंतीच्या आणि उत्कट भावनांना दिलेलं मूर्त स्वरूप म्हणजे ‘कला’. ही कला त्याच्या जगण्याला अर्थ देऊ लागली, आणि पुढे ती त्याच्या अर्थार्जनाचं साधनदेखील बनली. पण इतक्या बदलांनंतरही कलेचा आत्मा तसाच राहिला — त्याच उत्कट भावना, तेच कौशल्य, निर्मितीतून मिळणारा आनंद आणि समाधानही तेच. आणि हा आनंद केवळ कलाकारापुरताच मर्यादित राहत नाही; तर त्या कलेची अनुभूती घेणाऱ्या प्रत्येकापर्यंत पोहोचतो. चित्रकलेपासून ते शिल्पकलेपर्यंत आणि संगीतापासून ते नृत्यकलेपर्यंत — प्रत्येक कलेचं एक शास्त्र आहे; पण त्या शास्त्राची चौकट होत नाही. प्रत्येक कलेचे काही नियम आहेत; पण त्या नियमांची बंधनं होत नाहीत. कारण, कला स्वच्छंद असते!

कला माणसाला व्यक्त व्हायला मदत करते, माणसातलं माणूसपण जपते, पर्यायाने माणसालाच जपते. कला ही कलाकारांची ओळख बनते आणि कलाकृतींमध्ये कलाकाराच्या भावनांची, माणूसपणाची, अस्तित्वाची, झलक दिसत राहते.  मनापासून कलेची साधना करणाऱ्या कलाकाराला जसं समाधान मिळतं, तसंच कलेचा मनापासून आदर करणाऱ्या कलासक्तालाही मिळतं. प्रेक्षक किंवा श्रोते होणं तसं सोपं; पण खऱ्या अर्थाने कलासक्त होणं कठीण. कोणत्याही कलेबद्दल आत्मीयता बाळगणं, त्यामागच्या कष्टांची जाण असणं, कलाकाराचा आणि त्याच्या कलाकृतीचा मनापासून आदर करणं' म्हणजे कलासक्त होणं.

अलीकडचीच एक घटना — सोशल मीडियावर Studio Ghibli स्टाईल AI-Generated Imagesना अचानक पेव फुटलं. Ghibli या जपानी ॲनिमेशन स्टुडिओचं मूळ वैशिष्ट्य म्हणजे – प्रत्येक फ्रेम ही कलाकारांनी तासनतास घेतलेल्या मेहनतीतून साकारलेली असते आणि त्यातील बारकाव्यांमुळे प्रत्येक पात्राचं भावविश्व जिवंत झाल्याचं भासतं.

पण जिथे AIकडे भावना नाहीत, तिथे ह्या कृत्रिमतेला ‘कला’ म्हणावं का? ती केवळ नक्कल ठरते — आणि कलाकारांच्या कष्टांचा अपमानदेखील. अनेकांनी हा ट्रेंड फॉलो केला; पण खरे कलासक्त रसिक मात्र याला विरोध करत उभे राहिले. यामुळे सिद्ध झालं की कलेतील कृत्रिमता ही कलाकारालाही खटकते आणि कलासक्तालाही. कलाकार कलेला जिवंत ठेवतो, कला कलाकाराला जगवते, आणि कला माणसांच्या जगण्याला अर्थ देते.

ही जगण्या-जगवण्याची कला म्हणजे – मन रिझवणारा आणि कलासक्त रसिकांना थिजवणारा कौशल्यपूर्ण आविष्कार! म्हणूनच कलेमुळे जगणाऱ्या, कलेसाठी जगणाऱ्या आणि कलेला जीवन मानणाऱ्या, अशा सर्वांना — जागतिक कला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 


-अनुष्का बिराजदार.


Sunday, February 9, 2025

करुणापुरुष बाबा आमटे


हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती!

गुरू ठाकूर यांच्या या उक्तीप्रमाणे, ज्यांनी आपले तन, मन, धन आणि संपूर्ण जीवन निराधारांसाठी, उपेक्षितांसाठी अर्पण केले, ते थोर मानवतावादी व परिवर्तनवादी समाजसेवक, ऋषितुल्य बाबा आमटे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वावर दृष्टिक्षेप टाकण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे हा लेख. खांडववनाचे रूपांतर नंदनवनात करणारे उतुंग व्यक्तिमत्त्व म्हणजेच मुरलीधर देवीदास आमटे उर्फ बाबा आमटे! त्यांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील एका समृद्ध घरात झाला. दारात सर्व सुखे हात जोडून उभी असतानाही, त्यांना अगदी लहानपणापासून गरीब आणि उपेक्षितांच्या परिस्थितीची जाणीव होती.

१९३४ मध्ये त्यांनी बी.ए. पदवी मिळवल्यानंतर, १९३६ मध्ये ते एल.एल.बी. झाले. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी समाजकार्यास सुरुवात केली. एका पावसाळी रात्री घरी परतत असताना, त्यांना कुष्ठरोगाच्या शेवटच्या टप्प्यात असलेला एक रुग्ण दिसतो आणि हा ध्येयवेडा तरुण कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आयुष्य वेचण्याचा निर्धार करतो. आपल्या पत्नीला आपल्या ध्येयाविषयी कल्पना देतो आणि कुष्ठरोगासंदर्भात विविध पुस्तके वाचतो, सखोल अभ्यास करतो, कुष्ठरोग्यांच्या रुग्णालयात विनोबा भावे यांच्या साहाय्याने प्रवेश मिळवतो आणि त्यांच्यावर उपचार करतो. काही दिवसांनी त्यांना असे लक्षात येते की, आपण कुष्ठरोग्यांच्या उपचारासाठी स्वतः वैद्यकीय प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. त्यानंतर कलकत्ता स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन येथील अभ्यास वर्गात पंडित नेहरूंच्या शिफारशीवर प्रवेश घेतात आणि कुष्ठरोगी रुग्णांवर उपचार करण्याचे वैद्यकीय प्रशिक्षण पूर्ण करतात.

कुष्ठरोगासंबंधित लसीची स्वतःच्या शरीरावर चाचणी करून घेतात. केवळ असामान्य माणूसच असे धाडस करू शकतो. आज विज्ञानाने एवढी प्रगती केली असून समाजात अजूनही कुष्ठरोगाबाबत गैरसमज आहेत, परंतू बाबा आमटे यांची ही जिद्द आणि सेवा आजही मार्गदर्शक ठरते. पुढे जाऊन त्यांनी १९५० मध्ये वरोडा आणि भोवतालच्या ६० गावांमध्ये ४,००० रुग्णांवर उपचार केले. केवळ उपचार करणे हे पुरेसे नाही, ही जाणीव त्यांना झाली आणि त्यातूनच आनंदवन उभारण्याची प्रेरणा मिळाली. राज्य सरकारकडून वरोडा जवळील भागात ५० एकर पडीक जमीन त्यांना मिळाली. अतिशय अडचणीची, किचकट जागा. पाण्याचा अभाव. अशातच दोन मुले, पत्नी साधनाताई, एक लंगडी गाय, एक कुत्रा, १४ रुपये रोख आणि ५० एकर नापिक जमीन असा त्यांचा संसार सुरू झाला.

ते दिवस अतिशय भयानक होते. जंगलातील पशूंचा त्रास, अन्नधान्याचा तुटवडा या सर्व संकटांवर मात करत बाबा आमटे आणि त्यांच्या पत्नी साधनाताई आमटे यांनी सहा कुष्ठरोग्यांना सोबत घेऊन एक विहीर खोदली आणि १९५१ मध्ये विनोबा भावे यांच्या शुभहस्ते आनंदवनाचे औपचारिक उद्घाटन झाले. विविध आव्हाने पेलत बाबांनी कालांतराने कुष्ठरोग्यांच्या मदतीने सहा विहिरी खोदल्या, जमीन साफ केली, पिकांची लागवड केली आणि आनंदवनाचे रूपच पालटले. आनंदवन हे नुसते उपचार केंद्रच नव्हते, तर ते आत्मनिर्भर व मानवतावादी माणूस घडवण्याचे पवित्र तीर्थक्षेत्र होते. माझ्या मते ते केवळ एक संस्थान नसून बाबांनी तयार केलेले आत्मनिर्भरतेचे एक मॉडेल आहे, जे भारतातील अन्य ठिकाणीही वापरले जाऊ शकते! आनंदवनासोबतच, कुष्ठरोग निर्मूलन अभियान, नर्मदा बचाव आंदोलन, पर्यावरण, आदिवासी हक्क इत्यादी असंख्य सामाजिक चळवळींमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या कामात पत्नी साधनाताई यांची अनमोल साथ त्यांना मिळाली. कुष्ठरोग्यांच्या सेवेसोबतच, त्यांच्या पुनर्वसन आणि स्वयंपूर्णतेकडेही त्यांनी विशेष लक्ष दिले.

सामाजिक कार्यासोबतच, त्यांनी त्यांच्या अनुभवांवर आधारित कसदार, प्रेरणादायी व वास्तववादी साहित्यनिर्मिती केली. 'ज्वाला आणि फुले' हा त्यांचा काव्यसंग्रह याचे उत्तम उदाहरण. बाबा आमटे यांनी आपल्या पुढच्या पिढीला नि:स्वार्थ समाजकार्याचा वारसा दिला. डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे यांनी आदिवासींसाठी लोकबिरादरी प्रकल्प, वन्यजीव संरक्षण आणि आरोग्य सेवा यामध्ये मोलाचे योगदान दिले. तर डॉ. विकास व भारती आमटे यांनी आनंदवनाचा विस्तार करण्यात भरीव कामगिरी केली. बाबांना रॅमन मॅगसेसे, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण यांसारखे विविध प्रतिष्ठित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

तसं पाहिलं, तर क्षणभरच असतं माणसाचं आयुष्य. त्यातही बहुतेक जण स्वतःपुरतेच जगत असतात; पण बाबा आमटे यांसारखी काही थोर माणसं एका आयुष्यातच हजारो जिवांना एक नवीन जीवन देऊन जातात. खरंच, आधार नसलेल्यांचे आभाळ बनण्यासाठी मन आकाशाएवढे विशाल असावे लागते. ९ फेब्रुवारी २००८ रोजी या महात्म्याने जगाचा निरोप घेतला. माझ्या मते, बाबा आमटे यांचा संपूर्ण जीवनप्रवास दररोज हजारो लोकांना लाखोवेळा प्रेरणा देतो. आयुष्यात सर्वोत्तम आनंद म्हणजे स्वतःच्या हितासाठी नाही, तर इतरांच्या भल्यासाठी कृत्यं करणे आणि समाजाच्या कल्याणासाठी योगदान देणे हे बाबांचं जीवन खूप प्रभावीपणे शिकवून जातं! 


"कोंडलेल्या वादळांच्या

ह्या पहा अनिवार लाटा

माणसांसाठी उद्याच्या

येथूनी निघतील वाटा...!"


विनम्र अभिवादन.


-आर्य सोनवणे

Friday, January 3, 2025

ज्ञानगंगा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

भारतातील स्त्रिया आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी पार पाडत आल्या आहेत. रसायनशास्त्राच्या औषधीविषयक, विश्लेषणात्मक व सेंद्रीय अशा तिन्ही शाखांमध्ये मोठे योगदान देणाऱ्या असीमा चॅटर्जी असोत किंवा लढाऊ विमान एकट्याने चालवणाऱ्या अवनी चतुर्वेदी असोत, आता असे एकही क्षेत्र उरलेले नाही जिथे महिलांनी आपल्या कामगिरीची छाप पाडलेली नाही. महिलांना यशस्वी होण्यासाठी आणि पंख पसरून उडण्यासाठी आभाळ खुले करून देणारी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे माता सावित्रीबाई फुले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि भारतातील स्त्रियांच्या आयुष्यात शिक्षणाची ज्योत पेटवली.

माणूस हा जगातील एकमेव विचार करणारा प्राणी आहे. परंतु माणसाच्या बुद्धीला ज्ञानाची सांगड नसेल तर तो माणूस म्हणून ओळखला जाऊ शकतो का? असा प्रश्न सावित्रीबाई फुले आपल्या "त्यास मानव म्हणावे का?" या कवितेतून विचारतात. त्या म्हणतात:

ज्ञान नाही, विद्या नाही  

ते घेण्याची गोडी नाही  

बुद्धी असूनही चालत नाही  

त्यास मानव म्हणावे का?

या ओळींतून स्पष्ट होते की माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी जर काही उपयोगी असेल, तर तो विद्या-धर्म आहे. विद्या देणारा आणि विद्या घेणारा यांच्या एकत्रिकरणातूनच एक चांगला माणूस घडतो. विद्या देणारा हा धैर्यशील असतो, तर विद्या घेणारा शक्तिशाली व शहाणा बनतो. हा विचार समाजाला पटवून देणाऱ्या माता सावित्रीबाई फुले यांचा जन्म शिक्षणाच्या अभावाच्या काळात ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. शिक्षणाच्या प्रकाशाचा अभाव असलेल्या त्या काळात सावित्रीबाईंनी भारतात स्त्री शिक्षणाचा पाया रचला. आपण बऱ्याचदा म्हणतो, "आम्ही सावित्रीच्या लेकी, सावित्रीची मुलं," परंतु खरोखरच आपण सावित्रीबाईंच्या विचारांवर चालतो का? आजच्या युवा पिढीतील प्रयत्नांची आणि संयमाची कमतरता पाहता असे वाटते की संघर्षाच्या भीतीने जर सावित्रीबाईंनी त्यांचे ध्येय अर्धवट सोडले असते, तर आज आपल्या घरात शिक्षणाची गंगा वाहिलीच नसती. त्या काळात मुलींचा जन्म नकोसा वाटत असताना सावित्रीबाईंनी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन स्त्रियांना सक्षम आणि स्वावलंबी बनवले. पण आजही काही लोक शिक्षणाप्रती असलेल्या बेजबाबदारपणामुळे आणि समाजातील समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे वाटते की सावित्रीबाईंच्या कष्टांची आणि त्यागाची आपल्याला खरोखर जाणीव आहे का?

तरीही, सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या कमलादेवी चट्टोपाध्याय, मेधा पाटकर, चित्रा नाईक, शाहीन मिस्त्री यांसारख्या अनेक प्रेरणादायी व्यक्तींनी समाजातील दुष्ट रूढी-परंपरांना नाकारले आणि ज्ञानाचा मार्ग दाखवला. त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतातील अनेकांना स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळाली. त्यामुळेच द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदावर पोहोचल्या आणि गीता गोपीनाथ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक झाल्या, तसेच मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणूनही कार्यरत राहिल्या. सावित्रीबाईंच्या विचारांनीच आज मी माझे विचार लेखणीद्वारे मुक्तपणे मांडू शकते. त्यामुळे असं वाटतं:

सावित्रीचा घेऊनी वसा, गाठतो आम्ही उंच शिखरे  

दुष्ट परंपरेचा पिंजरा तोडूनी, मुक्त झाली पाखरे


ज्ञानगंगा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला वंदन आणि शतकोटी प्रणाम!


- श्रुती शिंदे

Saturday, December 28, 2024

Free Rider’s Problem and the Tragedy of Commons


Imagine, you are sitting on a train, getting a ticket worth Rs. 120. Beside you is a man sitting with the same level of comfort without paying a penny… how fair is it? Should we allow such things in the economy? If not, how can we stop it? How can we identify thousands of such passengers in the Mumbai local daily? How will you punish so many of them?  This isn’t the problem just with trains or buses but this is also the same with natural resources. We all hear about the environmental summits carried out at global levels, be it in COP or Paris Agreement or anything else, the once paying high are not the developed nations but the developing ones because they are supposed to grow by paying for the tickets of these developed countries to the environment for decades. They have been using all the resources for free and when it's our turn to use them, suddenly everything has a price tag now.  These free riders in the internal economy not only disregard the laws and discourage the ones paying for them but also increase the burden on the government. Now they need to take measures like tax increases on public goods to fill that gap and cure the losses. Again, it leads to the loss of the one who is paying for it twice. Isn’t it some sort of inequality towards the others?

These negative effects arising due to the shared resources lead to another economic dilemma, that is the ‘Tragedy of Commons’. When an individual acts for his self-interest which ultimately leads to depletion of public resources, it creates problems. Over-fishing is the most popular example used to show the tragedy of commons. In a selective area, the fish population cannot be increased at the same pace at which it is used. But for individual profits, the fishermen choose to continue fishing in the same area till it’s all vanished and the habitat is dead for the next few weeks as there won’t be any fish in the area. This not only causes discomfort to the occupation but also to the environment, the same is seen in terms of deforestation.

If we think about this problem with a selfless view, today if I have the option to travel without getting a ticket, why would I buy one? If I had the choice to earn more, why would I not? Here comes the answer! Farsightedness. I am thinking about it now. About my current benefits but I must also think about my future. If I am aware enough of its ill effects and future consequences, I might think once before traveling without a ticket. If I know that today’s extra piece of bread will keep me hungry tomorrow, I might not eat it now. 

Of course, these are just assumptions, but the individual incentives will eventually lead to the solution to such problems. No government scheme forcing you to pay extra tax is making you come out of this cycle. Thus, all we need today is a rational consumer!


-Aditi Bhavsar

Sunday, August 18, 2024

"नीट" चा निकाल नीटनेटका ?


तारीख जून,२०२४ - भारताचं पुढील ५ वर्षाच्या भविष्याचे चित्र उभं राहील, जेव्हा लोकसभेच्या निवडणूकीचा निकाल लागला. पण त्याच दिवशी लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात हरवलं, जेव्हा त्यांचा एक अनपेक्षित NEET UG परिक्षेचा निकाल लागला. हा. निकाल अनपेक्षितच होता. म्हणजे ज्या परीक्षेला कधीतरी पैकीच्या पैकी मार्क मिळवणारी मुलं असायची, तिथे ह्या वर्षी चक्क एक-दोन नव्हे, तर 67 मुलांना पैकीच्या पैकीच गुण मिळाले. एकाच परिक्षा केंद्रांत 6 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण, काही मुल उशिरा पोहोचली म्हणून त्यांना ग्रेस मार्क्स देणं, बिहार पेपर चोरीची घटना घडणं, सगळंच अगदी अनपेक्षित, आश्चर्यकारक !!

त्यानंतर काही विद्यार्थी सुप्रीम कोर्टात गेले, २५ हुन अधिक लोकांना पकडण्यात आलं, आपल्या राष्ट्रपतींनी त्यांच्या भाषणात ह्या घोटाळ्याचा उल्लेख केला, पण काही फरक पडलेला दिसत नाही.  दोन आठवड्यांपूर्वी प्राध्यापक पदासाठी घेण्या घेण्यात येणारी NET परीक्षा पेपर झाल्या नंतर त्याच्यात सुद्धा अनियमितता आढळून आली म्हणून रद्द करण्यात आली. त्यानंतर घेण्यात येणारी NEET PG परिक्षा सुद्धा रद्द केली, ती पण परिक्षेला २४ तास पण राहिले नसताना. ह्या सगळ्या परीक्षा होतात  National Testing Agency (NTA) या सरकारी संस्थेच्या देखरेखी खाली. हा प्रकार काही पहिल्यांदा घडत नाहीये. मागच्या ७ वर्षात पेपरफुटीची ७० प्रकरणं झाली आहेत, ज्या मध्ये १.७  कोटीहून जास्ती युवकांचं भविष्य असंच अंधारात हरवलं आहे. 

ह्या सगळ्याचा त्रास होतोय तो त्या मेहनती आणि योग्य विद्यार्थ्यांना, जे आपले कित्येक महिने, वर्ष घालवतात, त्यांची स्वप्ने पूर्ण करायला,  पण पदरी येते, ती निराशाच. चूक त्यांची नाहिये, मेहनत घेण्यात ते कुठेही कमी पडले नाहिये, चूक आहे ती ह्या व्यवस्थेची, जी पैसे खाऊन बसली आहे. ह्या सगळ्या व्यवस्थेचा जर सगळ्यात जास्ती कोणाला फायदा होतो, तर ते परिक्षांसाठीचं कोचिंग क्लासेसचे व्यावसायिक,  जे ह्याच मुलांच्या पालकांकडून अमाप पैसे घेतात. हे अक्षरशः एक मार्केट झालं आहे जिथे यशाचं आमिष दाखवून मुलांना आणि त्यांच्या पालकांना आकर्षित केलं जातं, स्वतःच्या 'कंपनी' कडे.  हे पालक आणि मुलं या क्लासेस कडे आकर्षित होतात, ते वाढलेल्या स्पर्धेमुळे. मुलांना शाळेत असल्या पासूनच अमूक कोचिंग तमुक क्लास लावले जातात, बऱ्याच वेळेला त्या मुलांची इच्छा नसताना सुद्धा त्या मुलांना बऱ्याच वेळेला माहीत सुद्धा नसतं, की त्यांना काय करायचय, काय बनायचय, पण ह्या वाढलेल्या स्पर्धमुळे त्यांना बळजबरीने ह्या परीक्षांच्या फेऱ्यात ढकललं जातं. आणि मग ह्याचा फायदा उचलतात हे कोचिंग क्लासेस, जे ह्या परिक्षांचा, आणि पर्यायाने शिक्षणाचा बाजार मांडतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी ह्या परिक्षा देतात,पण सीट, काही हजारच असतात. मग प्रवेश मिळण्याच्या भीती पोटी हे पालक आणि मुलं फसतात ह्या कोचिंग क्लासेस च्या 'गॅरंटिड सक्सेस' च्या आमिषा मध्ये. कोटा सारखी शहरं फॅक्टरी बनले आहेत, जिथे विद्यार्थ्यांमधील गुण न हेरता, त्यांचं एखाद्या असेंब्ली लाइन वर मास प्रोडक्शन चालू आहे,  त्यांना डॉक्टर आणि इंजिनियर बनवण्यासाठी.

मग ह्या स्पर्धेच्या जगात जर एखाधा परिक्षेत अपयश आलं; तर त्या अपयशाच्या भीतीने आत्महत्या करणाऱ्यांचं प्रमाण वाढत आहे. आता तर ह्या वाढलेल्या स्पर्धेचा ताण अगदी शाळकरी मुलांवर दिसायला लागलाय. म्हणूनच की काय आपल्या सरकारने शालेय विद्यार्थ्यांचं ओझ कमी करण्यासाठी सगळे विषय एकाच पुस्तकात समाविष्ट केले आहेत, ज्याने करून त्यांची दप्तरं हलकी होतील. पण त्याने त्यांच्या मनावरचा ताण आणि भीती कमी होणार आहे का? ते आपल्याला मोजता यायचं नाही, कारण, जसं थ्री इंडियटस् मधला रँचो म्हणतो तसं, दुदैवाने मेंदुवरचं प्रेशर मोजण्याचं यंत्र आपल्याला बनवता आलेलं नाही. बालपण, हे निरागसतेचं प्रतिक असतं, आणि बालपणाचा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे शाळा. पण आता मात्र याच निरागस मुलांची शाळा ही शिक्षणातल्या गैरप्रकारांची बाराखडी गिरवते आहे. मुलांच विकास करण्याऐवजी ह्या शाळा, ज्यांना राजकारण्यांनी, व्यवसायिकांनी फक्त त्यांच्या उत्पन्नाचं स्त्रोत बनवून ठेवलय, शाळेच नाव मोठं करण्यावर लक्ष देतात, आणि त्यासाठी ते चुकीच्या पद्धतींचा वापर करत आहेत. पैसे घेऊन मुलांना पास करणं, पबलिसिठी साठी बोर्डाच्या परिक्ष मध्ये गैरप्रकार असतील, आणि अजून किती तरी, ज्याची आपल्याला कल्पना सुध्दा नसेल. दुसऱ्या बाजूला, काही शाळा मुलांकडे बिलकुल लक्ष देत नाहीत त्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडून देतात.  मुलांना काय करावं, कसं करावं काहीच समजत नाही. आणि ह्या अश्या दोन्ही वातावरणांमध्ये वाढलेली मुलं बऱ्याच वेळा पुढे जाऊन ह्या घोटाळ्यांमध्ये, गैरप्रकारां मध्ये सामील होतात किंवा त्याला बळी पडतात.

विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल अश्या ह्या वातावरणामध्ये जेव्हा हे असे घोटाळे घडतील, तेव्हा ह्या सगळ्यांतून वाट काढणाऱ्या त्या मेहनती मुलांनी काय करायचं? आणि NEET सारख्या परिक्षा, ज्या ह्या देशाचे डॉक्टर घडवतात, त्यात जर असे घोटाळे झाले, तर हे देशाची आरोग्यव्यवस्था पोकळ नाही का करणार? येणाऱ्या काळात अश्या परिक्षांमध्ये पेपरफुटी, घोटाळे ह्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी कडक कायदे व त्यांची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे. असं नाही झालं, तर ह्या येणाऱ्या अपयशामुळे वाढणाऱ्या नैराश्याला आणि आत्महत्यांना जबाबदार कोण? ही व्यव्यवस्था, हे कोचिंग क्लासेस की ही स्पर्धा?

-Ashmit Gupte 

And Then There Was Her: The Queen of Crime

  Around a century and three decades ago, a little girl took up a voracious hobby of reading. Although her mother homeschooled her, the latt...