Tuesday, September 30, 2025

शब्द म्हणजे काय असतं?

 


शब्द – हा संवादाचा पाया, विचारांचा दरवाजा आणि भावनांचा सेतू आहे. माणसाच्या जगण्यात जे काही घडलं, ते शब्दांतूनच व्यक्त झालं. ज्ञान, संस्कार, इतिहास, साहित्य – या सगळ्याची किल्ली शब्दांतच दडलेली आहे. शब्दांतूनच आपण शिकतो, समजतो आणि जगतो. संतांची वाणी, कवींची कविता, लेखकांचे विचार – हे सारे आपल्या मनापर्यंत पोहोचले ते केवळ शब्दांच्या सामर्थ्यामुळे. शब्द हे मनाचे आरसे आहेत; तेवढेच ते मनाला उभारी देणारे किंवा जखमा करणारेही असतात. म्हणूनच शब्दांचा वापर नेहमी जपून, संयमाने आणि प्रेमाने करावा लागतो.

शब्द म्हणजे काय असतं?

बालपणीचे ते बोबडेपण,
मनामध्ये नात्यांची वीण –
तोच शब्द असतो ना?

शब्द देई ऊब जिवाला,
तोच कधी दूर लोटे मनाला –
तोच शब्द असतो ना?

शब्दामुळे उमलतं प्रेम,
शब्दामुळे साधला जातो नेम –
तोच शब्द असतो ना?

संवादाने वाट खुली होते,
विसंवादाने पोकळी निर्माण होते –
तोच शब्द असतो ना?

गोड शब्द माणसाला घडवतो,
कटू शब्द माणसाला मोडतो –
तोच शब्द असतो ना?

शब्द म्हणजे ऊब – झाकून घ्यावी किती?
शब्द म्हणजे राग – सहन करावा किती?
तोच शब्द असतो ना?

शब्द म्हणजे गालावरून सरकलेले मोरपिस,
शब्द म्हणजे अचानक बसलेली चापट –
तोच शब्द असतो ना?

शब्द म्हणजे हरणीच्या बेंबीतील कस्तुरी,
सुगंध त्याचा कधीच न संपणारा,
सदैव दरवळत राहणारा… दरवळत राहणारा…

-जुईली पवार

No comments:

Post a Comment

शब्द म्हणजे काय असतं?

  शब्द – हा संवादाचा पाया, विचारांचा दरवाजा आणि भावनांचा सेतू आहे. माणसाच्या जगण्यात जे काही घडलं, ते शब्दांतूनच व्यक्त झालं. ज्ञान, संस्कार...