Thursday, October 12, 2023

तो, ती, ते..... शssss!

तो, ती, ते..... शssss!



पुण्यातील एका कार्यक्रमात पोलिसांनी तब्बल दीडशे लोकांना एका हॉलमध्ये तासाभरासाठी कोंडून ठेवलं होतं. ते देखील कुठल्याही वॉरंट शिवाय! काही कारण नसतांना या खाजगी क्लिअर पार्टी मधील लोकांना का कोंडून ठेवलं गेलं हा प्रश्न MIST LGBTQ फाउंडेशन द्वारे विचारला गेला परंतु उत्तर काही मिळाले नाही. अश्या अनेक चित्तथरारक घटना मी येथे सांगू शकते परंतु फक्त ऐकून काय होतंय...?  या सो कॉल्ड पुढारलेल्या जगात जिथे आपण कपड्यांना देखील दोन लिंगांमध्ये विभागलय, तिथे जर एखाद्या व्यक्तीला गुलाबी आणि निळा सोबत परिधान करायचा असेल तर काय हरकत आहे? 
जन्मजात जे माणसाला मिळतं ते बायोलॉजिकल सेक्स, व्यक्तीचा मानसिकतेनुसार काही सामाजिक घटकांवर आधारित असतं ते जेंडर... हा फरक जाणून घेऊन त्याला समजून घ्यावं आणि इतरांना देखील समजवावं ही आपलीच जबाबदारी आहे , कारण आपला लाडका गुगल बाबा सेक्स आणि जेंडर या दोन्ही गोष्टींना लिंग असच ट्रान्सलेट करतो. 
वयाच्या सहा-सात वर्षापर्यंत आपल्याला स्त्री पुरुष यातला फारसा काही फरक जाणवत नाही. त्यानंतर प्रत्येक व्यक्तीला कळायला लागते की आपण कुठल्या साच्यात बसतो.  साधारण १३-१४ वर्षांच्या व्यक्तीला जेव्हा हे कळून चुकतं की ते या दोन लिंगांचा साच्यात बसत नाही तेव्हा सुरू होतो त्यांचा खरा गोंधळ. मी वेगळा का? माझ्यात ते साम्य का नाही जे माझ्या वयाच्या इतर लोकांमध्ये दिसतं ? जर मी पुरुष म्हणून जन्माला आलो तर का माझे मन स्त्रियांच्या आभूषणांवर हक्क मागते? का मला तसे वस्त्र परिधान करण्याची इच्छा होते ? अशा लाखो प्रश्नांच्या गोंधळात अडकलेल्या त्या मेंदूला पहिले स्वतः समजावूनच अत्यंत अवघड जातं. पण ते समजावून ,मान्य करून पुढे उभं असतं या व्यक्तीच्या जीवनातलं मोठं संघर्ष – सर्वनाम! कारण ते सर्वनाम आपल्याला दिल्या जातं या समाजाकडून.
आयुष्यातली अनेक वर्ष आपण त्यांना चुकीच्या सर्वनामांनी संबोधित करत असतो .ज्यामुळे त्यांच्या मनात उठलेली खळबळ अजून त्रासदायक ठरते. त्यांचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा असतो समाजापेक्षा, जगापेक्षा …. या कारणामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यांच्या डोक्यात अनेक गोष्टींची चुकामुक होते . अशावेळी ते आपल्या जवळच्या माणसांना सांगतात .काही घरांमध्ये पालक ही गोष्ट स्वीकारतात पण अनेक वेळा त्यांना घराबाहेर काढलं जातं ,वाईट आरोप लावले जातात, त्यांच्या मनातून हे विचार काढून टाकायला चित्र विचित्र बाबांकडे घेऊन जातात ,शॉक ट्रीटमेंट दिली जाते !! ट्रान्सजेंडर असण हा काही गुन्हा नाही आणि तो एका ठराविक कालावधीसाठीच आहे असे देखील नाही. हे त्यांच्या जीवनाचं सत्य आहे. आई वडिलांनी स्वीकारलं तरी नातेवाईक ,शेजारी, शिक्षक, मित्र मैत्रिणी आणि इतर लोक… या सगळ्यांना स्पष्टीकरण द्यावं लागतं.
ज्या व्यक्तीला आपण तो/ती ने नाही बोलवू शकत त्यांना आपण स्वतःहून त्यांचे सर्वनाम विचारले पाहिजे. आपण आज-काल बऱ्याच लोकांच्या इंस्टाग्राम बायो मध्ये शी, हर, ही, सह, तो, हे सगळं वाचतो याचं मुख्य कारण हेच आहे की जर आपण स्वतःहून आपली सर्वनामे सांगितली तर ते देखील नीःसंकोच पणे त्यांचे सांगतील.
लक्ष्मी त्रिपाठी हे नाव आपण नक्की ऐकलं असणार त्यांच्या ‘मी हिजरा, मी लक्ष्मी’ या पुस्तकात त्यांनी अशा अनेक गोष्टींबद्दल सांगितलं आहे जे त्यांना लहानपणापासून सहन करत यावा लागल्या. जेंडर दिस्फोरिया म्हणजे जेव्हा एका व्यक्तीला आपले मानसिक आणि जैविक घटक वेगळे असल्याचा असंतोष असतो आणि त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो तेव्हा ते नैराश्याला बळी पडतात LGBTQI+  समुदायातील अनेक लोक या जेंडर डिस्फोरिया यामुळे आत्महत्या करण्यासारखी कठोर पावलं उचलतात .किंवा लिंग पुनर्पुष्टिकरण शस्त्रक्रिया करून काहीजण नवीन आयुष्याची सुरुवात करतात. परंतु ती शस्त्रक्रिया देखील काही सोपी नाही . विविध सायको मॅट्रिक चाचण्या केल्या जातात, खरंच शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे की नाही हे पाहिलं जात.....
अजून एक मोठा प्रश्न असतो तो विशेष अधिकारांचा. आज आपल्या देशात या लोकांना लग्न बंधनात अडकण्यास मनाई आहे पण अर्जेंटिना ,दक्षिण ,आफ्रिका, स्वीझर्लंड, कॅनडा सारख्या काही देशांमध्ये त्याला संपूर्ण मान्यता दिल्या गेली आहे. 2014 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने नालसा जजमेंट द्वारे ट्रान्सजेंडर लोकांना भारतातील तिसरे लिंग असल्याची मान्यता दिली आहे त्यांना देखील संविधानातील प्रत्येक अधिकार आहेत याची खात्री केली गेली होती
 सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय यांच्या अंतर्गत ट्रान्सजेंडरचे कल्याण यासाठी काम केले जाते . एवढेच काय तर जोविता मंडल यांना भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर जज बनण्याची संधी दिली गेली. सरकार अनेक गोष्टींना मान्यता देते… परंतु समाज नाही! यात संपूर्ण चूक समाजाचीच आहे असे देखील नाही. कुठेतरी त्याबद्दल लोकांना माहितीच नाही. योग्य ते विचार करण्यासाठी योग्य संकल्पना असणं गरजेचं आहे .त्यासाठी जूनचा महिना ‘प्राईड मंथ’ म्हणून साजरा केला जातो व विविध ठिकाणी प्राईड परेड काढली जाते. या परेडचा हेतू असतो स्वतःला जो जसा आहे तसं मान्य करणे आणि एलजीबीटीक्यू प्लस लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी उभे राहणे.
पुण्यात देखील इंद्रधनु ही संस्था प्राईड परेड आयोजित करते. इतर समुदायातील लोक देखील त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी या परेडमध्ये भाग घेऊ शकतात. शुभमंगल जादा सावधान, बधाई दो, यासारख्या काही चित्रपटांमधून देखील जनजागृती करण्याचा प्रयत्न केला गेलाय.
 शेवटी एवढेच म्हणेल,
 ‘इंद्रधनुविना आकाश अधुरेच राही… एकरंगी फुलांनी वसंत बहरत नाही’ 
धन्यवाद !

    - अदिती भावसार.

Wednesday, October 4, 2023

.......आणि ती "ज्ञानेश्वरी" आज आपुल्या हाती आली !!!


 .......आणि ती "ज्ञानेश्वरी" आज आपुल्या हाती आली !!!



शके ११९७  युवा संवत्सर श्रावण वद्य अष्टमी गुरुवार ची मध्यरात्र..... आणि या वेळी जन्म झाला ज्ञानियांचा राजा.... न भूतो न भविष्यति l  अशा संत ज्ञानेश्वर  माऊलींचा...... आदिनाथ - मत्स्येंद्रनाथ  - गोरक्षनाथ -  गहिनीनाथ - निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर अशी चालत आलेली गुरुपरंपरा... आईवडिलांनी लहानपणीच देहांतप्रायश्चित घेतल्यानंतर पैठण ला काही काळ राहून आपल्या प्रबोधना द्वारे समाजमन जागृत करून निवृत्तीनाथ , ज्ञानेश्वर , सोपान आणि मुक्ताई ही चार ही भावंडे नेवासा येथे आली. नेवासा येथे मोहिनीराजाचे मंदिर आहे. ज्ञानोबांना मोहिनीराजाचे विशेष आकर्षण !!

मानवी मनामध्ये चाललेले दुःख  त्यांनी ओळखले होते आता समाजाचे सर्वभावे कल्याण करण्यासाठी आपले विचार ग्रंथबद्ध करावेत अशी आज्ञा ज्ञानेश्वर माउलींना त्याचे गुरु तसेच ज्येष्ठ बंधू असलेल्या निवृत्तीनाथांनी केली. कोणता ग्रंथ भाष्य करण्यासाठी निवडावा ??  असा प्रश्न उभा राहिला असता माउलींनी "भगवद्गीता" या पवित्र ग्रंथाची निवड केली. याचे कारण गीता ही महाभारताचा एक भाग आहे . भगवान ज्या अर्जुनास गीता सांगत आहेत त्या अर्जुनाचा सारथी स्वतः भगवान आहेत यावरून मनुष्य जीवनाचे सारथी हे स्वतः भगवान आहेत हे सूचित होईल. 

गीता वाचण्याचा , समजून घेण्याचा अधिकार सर्वांना आहे परंतु संस्कृत मध्ये असलेली गीता त्या काळात लोकांना वाचता व समजून घेता येत नव्हती. त्यावेळी या गीतेवर च त्या काळातील लोकांना समजेल अशा भाषेत म्हणजेच प्राकृत ( मराठी ) भाषेत टिकाभाष्य करावे असे ज्ञानेश्वर माउलींनी योजिले. पण हे भाष्य करत असताना ते लिहून घ्यायला कोणीतरी हवे ना !! मग त्या साठी.... नव्हे नव्हे... जणू काही हे भाष्य लिहिण्या साठीच ज्यांचा दुसरा जन्म  झाला होता !!! ज्यांच्या नावातच  "सत्"  म्हणजे "अस्तित्व किंवा स्वरूप" , "चिद" म्हणजे "चेतनरूप , ज्ञानरूप व प्रकाशरूप" आणि "आनंद" म्हणजे "आनंदरूप" असा सापेक्ष अर्थ  आहेत..... असे सच्चितानंदबाबा यांची निवड केली. आता भाष्य करते साक्षात ज्ञानेश्वर माऊली आणि ते भाष्य लिहून घेणारे सच्चिदानंदबाबा.. महालयाच्या मंदिरामध्ये श्रोतृवर्ग जमू लागला; आणि सद्गुरू निवृत्तिनाथ व इष्ट देवदेवतांना वंदन करून ज्ञानेश्वर माउलींनी भगवद्गीतेवर मराठीतून भाष्य सांगावयास सुरुवात केली. सच्चिदानंदबाबांनी त्यांचे भाष्य लिहून घेण्यास सुरवात केली. त्या ग्रंथाच्या रूपाने ब्रह्मविद्येचा  सुकाळ केला.  समाजजीवनाचे संवर्धन करणारे नीतिशास्त्र योग्य प्रकारे मांडून मराठीत 'अमृताशीही पैंजा जिंके' अशा साच, मवाळ, मृदू, अमृतमधुर शब्दांत एक उत्कृष्ट काव्यग्रंथ निर्माण केला. 

या नऊ हजार पाकळ्यांचे भावकमळ म्हणजे  "भावार्थदीपिका"  ग्रंथाचा किर्तीसुगंध सगळीकडे पसरला. भगवद्गीतेतील सातशे श्लोकांवर ज्ञानेश्वर माउलींनी नऊ हजार ओव्या लिहिल्या. पुढे याच ग्रंथाचे नामकरण विश्वसंत नामदेव महाराजांनी समाधी अभंग प्रकरणात - देव निवृत्ती यानी धरिले दोन्ही कर। जातो ज्ञानेश्वर बैसावया । या अभंगात जाऊनि ज्ञानेश्वर बैसले आसनावरी । पुढे 'ज्ञानेश्वरी' ठेवियेली ॥ असे चरणात वर्णन केले आहे. त्यामुळे भावार्थदीपिकेचे नाव 'ज्ञानेश्वरी' असे रूढ झाले. 

मूलतः शुद्ध असलेली ज्ञानेश्वरी , परंतु त्याकाळी छपाई यंत्र नसल्याने ज्ञानेश्वर माउलींनी समाधी घेतल्या नंतर लोकांनी एकमेकांकडून बघून लिहून काढली. त्याच वेळी त्या लिखणामध्ये अनेक चुका नकळत झाल्या. ज्ञानेश्वर माउलींनी समाधी घेतल्या नंतर  २९४ वर्षांनी श्री एकनाथ महाराजांना दृष्टांत झाला आणि समाधी स्थळी ज्ञानेश्वरी ची शुद्ध प्रत मिळाली..... पाठांतर आणि हस्तांतरामुळे अशुद्ध झालेली प्रत एकनाथांनी पुन्हा एकदा शुद्ध केली व समजा समोर ठेवली. 

..... आणि ती ज्ञानेश्वरी आज आपुल्या हाती आली...!!!


         - कु. पूर्वा शिवप्रसाद काणे.


Sunday, October 1, 2023

लाल बहादुर शास्त्रीजी

 
लाल बहादुर शास्त्रीजी


 





 लाल बहादुर शास्त्री, भारतीय इतिहास में अंकित एक नाम, सादगी, अखंडता एवं अपने राष्ट्र के कल्याण के प्रति अटूट प्रतिबद्धता के प्रतीक में खड़ा है l ऐसी दुनिया में जहां अक्सर बड़ी राजनीतिक हस्तियों का दबदबा रहता है, शास्त्री जी के विनम्र आचरण ने चरित्र की उसे उल्लेखनीय ताकत को झुठला दिया, जिसने भारत के दूसरे प्रधानमंत्री के रूप में उनके कार्यकाल को परिभाषित किया l 
          श्री लाल बहादुर शास्त्री का जन्म २ अक्टूबर, १९०४ को उत्तर प्रदेश के वाराणसी से थोड़े दूर एक छोटे से रेलवे टाउन, मुगलसराय मे हुआ था l उनके पिता एक स्कूल शिक्षक थे l जब लाल बहादुर शास्त्री डेढ़ वर्ष के थे तभी दुर्भाग्य से उनके पिता का देहांत हो गया था l पिता के देहांत पश्चात उनकी माता ने ही अपने बच्चों का संगोपन किया था l स्कूली शिक्षा पूरी होते ही उन्हें वाराणसी में चाचा के घर उच्च विद्यालय की शिक्षा प्राप्त करने हेतु भेज दिया गया l
          बहुत पहले से ही लाल बहादुर शास्त्री महात्मा गांधी द्वारा अत्यंत प्रभावित थे l गांधी जी के असहयोग आंदोलन में शामिल होने हेतु उन्होंने अपनी पढ़ाई तक छोड़ दी, तब वह केवल १६ वर्ष के थे l शास्त्री जी ब्रिटिश शासन की अवज्ञा में स्थापित किए गए कई राष्ट्रीय संस्थानों में से एक वाराणसी के काशी विद्यापीठ में शामिल हुए थे l यहां वे महान विद्वानों एवं देश के राष्ट्रवादियों के प्रभाव में आए थे l विद्यापीठ द्वारा उन्हें प्रदत्त स्नातक की डिग्री प्राप्त हुई जिसका नाम 'शास्त्री' था, लेकिन लोगों के दिमाग में यह उनके नाम के एक भाग के रूप में बस गया l
आजादी के बाद जब कांग्रेस सरकार सत्ता में आई, तब उनके सक्रिय सहभागी एवं अनुशासन को देख उन्हें अपने गृह राज्य उत्तर प्रदेश का संसदीय सचिव नियुक्त किया गया। जल्द ही उन्हें गृह मंत्री के रूप में भी नियुक्त किया गया । शास्त्री जी मानते थे कि अनुशासन और एकजुट से किए कार्य ही राष्ट्र की ताकत का असली स्रोत है । उनकी यही कड़ी मेहनत करने की क्षमता एवं दक्षता उत्तर प्रदेश में एक लोकोक्ति बन गई । १९५० के दशक के आसपास उन्हें रेल मंत्री के रूप में नियुक्त किया गया था ।उनके कार्यकाल में दो बड़ी रेल दुर्घटनाओं के बाद शास्त्री जी ने यह अपनी नैतिक जिम्मेदारी समझकर इस्तीफा दे दिया । तब नेहरू जी ने कहा कि उन्होंने लाल बहादुर शास्त्री का इस्तीफा इसलिए नहीं स्वीकार किया कि जो कुछ हुआ वह इसके जिम्मेदार है बल्कि इसलिए स्वीकार किया है क्योंकि इसे संवैधानिक मर्यादा में एक मिसाल कायम होगी।
लाल बहादुर शास्त्री भारतीय इतिहास में एक उल्लेखनीय व्यक्ति थे, जो अपनी सादगी, निष्ठा और राष्ट्र के कल्याण के प्रति समर्पण के लिए जाने जाते थे। प्रधान मंत्री के रूप में उनका कार्यकाल संक्षिप्त होते हुए भी देश पर एक अमिट छाप छोड़ गया। १९५६ के भारत-पाकिस्तान युद्ध के दौरान शास्त्री के नेतृत्व ने भारत की संप्रभुता की रक्षा के लिए उनकी अटूट प्रतिबद्धता को प्रदर्शित किया, जबकि उनका प्रसिद्ध नारा "जय जवान जय किसान" देश के विकास में सशस्त्र बलों और कृषि दोनों के महत्व का प्रतीक है।
           इसके अलावा, ताशकंद समझौते पर बातचीत में शास्त्री की भूमिका ने प्रतिकूल परिस्थितियों में भी शांतिपूर्ण कूटनीति के प्रति उनकी प्रतिबद्धता को रेखांकित किया। ताशकंद में उनका आकस्मिक और असामयिक निधन साज़िश और अटकलों का विषय बना हुआ है, जिससे भारतीय राजनीति में एक खालीपन आ गया है जिसे कई लोग आज भी श्रद्धा से याद करते हैं।
लाल बहादुर शास्त्री की विरासत नेताओं और नागरिकों की पीढ़ियों को समान रूप से प्रेरित करती है, हमें विनम्रता, ईमानदारी और राष्ट्र की सेवा के मूल्यों की याद दिलाती है। उनका जीवन और योगदान आशा की किरण और प्रगति और समृद्धि की दिशा में भारत की यात्रा में नेतृत्व और बलिदान की स्थायी भावना के प्रमाण के रूप में काम करता है।
           वह हमेशा अपनी उक्ति पर कायम रहे जो कि थी - 
"देश के प्रति निष्ठा सभी निष्ठाओं से पहले आती है l और यह पूर्ण निष्ठा है क्योंकि इसमें कोई प्रतीक्षा नहीं कर सकता की बदले में उसे क्या मिलता है l"
          ऐसे आदर्श नेता श्री लाल बहादुर शास्त्री को उनकी जयंती निमित्त हमारा शत-शत अभिवादन l

             - चैत्राली तुळजापूरकर.


Are We Still Stuck in the Past? Ancient Ideals and the Modern Man

It is estimated that Homo sapiens (today’s humans) emerged around 300,000 years ago in Africa. Homo sapiens was the most intelligent race am...